शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

३८ दिवसांनंतर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलनाला स्थगिती

By उज्वल भालेकर | Updated: November 30, 2023 20:19 IST

शासकीय सेवेत समायोजन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी २५ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले होते.

अमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३८ दिवसांनंतर गुरुवारी आपल्या काम बंद संपाला स्थगिती दिली. परंतु आठ दिवसांमध्ये जर आरोग्यमंत्री यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर १४ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर आंदोलन तीव्र करून आक्रोश मोर्चाचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

शासकीय सेवेत समायोजन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी २५ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले होते. जिल्ह्यातील जवळपास १३५२ अधिकारी, कर्मचारी या संपामध्ये सहभागी होते. त्यामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पांगळी झाली होती. यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारे आंदोलन करून शासनाचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यंदाची दिवाळीदेखील कर्मचाऱ्यांनी संप मंडपातच साजरी केली. तसेच ३१ ऑक्टोबरला मुंबई आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दहा वर्षे सेवा झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांना ३० टक्के थेट सेवा समावेशन व ७० टक्के सरळसेवा भरती प्रक्रिया राबवून धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भातील आश्वासन दिले होते. 

तसेच २९ नोव्हेंबरला आरोग्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चेनंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद संपाला काही दिवसांची स्थगिती दिली आहे. परंतु जर आरोग्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर मात्र १४ डिसेंबरला अधिवेशनावर तीव्र जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहणार असल्याचा इशारादेखील कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 

टॅग्स :Employeeकर्मचारीagitationआंदोलन