शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पदव्युत्तर शिक्षणाचे प्रवेश सहा महिने लांबणीवर, पदवी अंतिम परीक्षा अधांतरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 19:31 IST

पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात निर्णयाधीन आहे. ३० सप्टेंबरपर्यंत निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

अमरावती : पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात निर्णयाधीन आहे. ३० सप्टेंबरपर्यंत निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात परीक्षांची तयारी, विद्यार्थ्यांसोबत संपर्क, मूल्यांकन, निकाल अशी एकुणच कार्यप्रणालीसाठी तीन महिने लागतील. परिणामी नवीन वर्षात १५ जानेवारीनंतरच पदव्युत्तरचे प्रवेश होणार असून, यंदा सहा महिने प्रवेश लांबल्याचे वास्तव आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पदवी अंतिम वर्षाच्या ७० हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करावे लागणार आहे. किंबहुना सर्वोच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर रोजी परीक्षांबाबत निकाल जाहीर केला तर, ३० आॅक्टोंबरपर्यंत परीक्षांच्या तयारीसाठी लागणार आहे. विद्यार्थ्यांचे सत्र ३, ४, ५ व ६ बॅकलॉगच्या परीक्षा घ्याव्या लागतील. विद्यापीठाला तब्बल ६६ टक्के परीक्षांचे नियोजन करावे लागणार आहे. यासाठी किमान ३० नोव्हेंबर उजाळणार आहे. या परीक्षांचे मूल्यांकन व निकाल जाहीर करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत कालावधी लागणार आहे. नवीन वर्षात १५ जानेवारीनंतरच पदव्युत्तर प्रवेशाची प्रक्रिया सुरु करता येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.

पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षाबाबतचा न्यायालयाचा निर्णय महत्वाचा असेल. पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असा निर्णय विद्यापीठ घेईल. व्हॅकेशन, सिलॅबस कमी करणे हा सुद्धा पर्याय आहे. सकारात्मक निर्णयातून विद्यार्थ्यांना दिलासा दिला जाईल.- एफ.सी. रघुवंशी,अधिष्ठाता, अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस