शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

प्रशंसनीय! दिवाळीत अंध, अपंग व कुष्ठरोग्यांना 'ते' गेल्या ३२ वर्षांपासून आपुलकीने वाढतात पुरणपोळीचे मोफत भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 21:00 IST

Amravati News दिवाळीच्या दोन दिवसात शहरातील अंध, अपंग व कुष्ठरोगी नागरिकांना तसेच निराधारांना सुग्रास पुरणपोळीचे जेवण वाढण्याचा स्तुत्य उपक्रम अमरावतीतील विठ्ठलराव सोनवळकर यांनी चालविला आहे.

ठळक मुद्देविठ्ठलराव सोनवळकरांच्या पोळी भाजी केंद्रात दोन दिवस दिवाळी

अमरावती : गेल्या ३२ वर्षांपासून राष्ट्रीय तसेच भारतीय संस्कृतीतील मोठया सणांना शहरातील दीन दुबळ्यांना मोफत मिष्टान्नाचे भोजन देण्याचा विठठलराव सोनवळकर यांचा उपक्रम सुरु आहे. या वर्षी दिनांक ०२/११/२०२१ ते ०३/११/२०२१ या दोनदिवसात त्यांच्या भाजीपोळी केंद्रात पुरणपोळी चे वाटप करण्यात येणार आहे.

शहरातील अंध, अपंगांनी त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन विठ्ठलराव सोनवळकर यांनी केलेले आहे. २६ जानेवारी १९८९ ला विठ्ठलराव सोनवळकर यांनी भाजीपोळी केंद्राची स्थापना केली. आज त्याला ३२ वर्षे पूर्ण झालेली आहे. शहरातील अंध, अपंग तसेच रुग्णालयात येणारे रुग्य व त्यांच्या नातेवाईकांना अत्यल्प दरात जेवण मिळावे या उददेशाने त्यांनी सुरु केलेल्या या केंद्रात सेवेचा अखंड झरा वाहतो आहे. राष्ट्रीय सण तसेच भारतीय संस्कृतीतील मोठया सणांना शहरातील अंध अपंगांना मोफत पक्वानाचे वाटप करतात. ३२ वर्षात या सेवेत कधीच कोणताही खंड पडला नाही.

या सेवेबरोबरच शहरातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पाच रुपयात तीन पोळ्या, व वाटीभर दाळभाजी हा त्यांचा नित्याचा उपक्रम आहे. गेल्या ३२ वर्षात महागाई आकाशाला भिडली परंतु विठठलरांच्या भाजीपोळी केंद्राची चव आणि धान्याचा दर्जा बदलला नाही. अनेक सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी येऊन त्यांच्या केंद्राची पाहाणी केली. व भरभरुन कौतुक केले. अनेकांनी पुरस्कार दिले परंतु अशा समाजशील उपक्रमासाठी शहराच्या मध्यवस्तीत एखादी नझुलची १० १० ची जागा त्यांना मिळु शकली नाही. ही शोकांतीका आहे. त्यामुळे कुणी आपली दखल घेवो अगर घेऊ नये आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत हे समाजकार्य असेच पुढे नेण्याचा त्यांचा मानस आहे.

संत गाडगेबाबा विचारांनी भारावलेल्या व त्यांचे प्रत्यक्षात आचरणात आणणारे विठ्ठलराव सोनवळकर यांनी दिनांक ०२/११/२०२१ ते ०३/११/२०२१ या दोनदिवसात त्यांच्या भाजीपोळी केंद्रात पुरणपोळीचे वाटप ते करणार आहेत. या सर्व अपंगांनी सकाळी ११ ते २ या वेळात केंद्रात येऊन पुरणपोळी चे आस्वाद मोफत घेऊन आपल्याला आर्शीर्वाद देण्याचे आवाहन विठ्ठलराव सोनवळकर यांनी केले आहे.

बालपणी अन्नावाचुन उपाशी राहण्याची वेळ आपल्यावर आली. मंदिरातील देवापुढे ठेवलेला नैवेद्य खाऊन दिवस काढले. हे दिवस इतर कुणाच्याही वाटयाला येऊ नये या भावनेतुन हे सेवाकार्य सुरु केले आहे असे विठ्ठलराव सोनवळकर सांगतात. या कार्यात त्यांच्या कुटुंबाचे  सहकार्य त्यांना मिळते.

टॅग्स :foodअन्नSocialसामाजिक