शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

प्रशंसनीय! दिवाळीत अंध, अपंग व कुष्ठरोग्यांना 'ते' गेल्या ३२ वर्षांपासून आपुलकीने वाढतात पुरणपोळीचे मोफत भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 21:00 IST

Amravati News दिवाळीच्या दोन दिवसात शहरातील अंध, अपंग व कुष्ठरोगी नागरिकांना तसेच निराधारांना सुग्रास पुरणपोळीचे जेवण वाढण्याचा स्तुत्य उपक्रम अमरावतीतील विठ्ठलराव सोनवळकर यांनी चालविला आहे.

ठळक मुद्देविठ्ठलराव सोनवळकरांच्या पोळी भाजी केंद्रात दोन दिवस दिवाळी

अमरावती : गेल्या ३२ वर्षांपासून राष्ट्रीय तसेच भारतीय संस्कृतीतील मोठया सणांना शहरातील दीन दुबळ्यांना मोफत मिष्टान्नाचे भोजन देण्याचा विठठलराव सोनवळकर यांचा उपक्रम सुरु आहे. या वर्षी दिनांक ०२/११/२०२१ ते ०३/११/२०२१ या दोनदिवसात त्यांच्या भाजीपोळी केंद्रात पुरणपोळी चे वाटप करण्यात येणार आहे.

शहरातील अंध, अपंगांनी त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन विठ्ठलराव सोनवळकर यांनी केलेले आहे. २६ जानेवारी १९८९ ला विठ्ठलराव सोनवळकर यांनी भाजीपोळी केंद्राची स्थापना केली. आज त्याला ३२ वर्षे पूर्ण झालेली आहे. शहरातील अंध, अपंग तसेच रुग्णालयात येणारे रुग्य व त्यांच्या नातेवाईकांना अत्यल्प दरात जेवण मिळावे या उददेशाने त्यांनी सुरु केलेल्या या केंद्रात सेवेचा अखंड झरा वाहतो आहे. राष्ट्रीय सण तसेच भारतीय संस्कृतीतील मोठया सणांना शहरातील अंध अपंगांना मोफत पक्वानाचे वाटप करतात. ३२ वर्षात या सेवेत कधीच कोणताही खंड पडला नाही.

या सेवेबरोबरच शहरातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पाच रुपयात तीन पोळ्या, व वाटीभर दाळभाजी हा त्यांचा नित्याचा उपक्रम आहे. गेल्या ३२ वर्षात महागाई आकाशाला भिडली परंतु विठठलरांच्या भाजीपोळी केंद्राची चव आणि धान्याचा दर्जा बदलला नाही. अनेक सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी येऊन त्यांच्या केंद्राची पाहाणी केली. व भरभरुन कौतुक केले. अनेकांनी पुरस्कार दिले परंतु अशा समाजशील उपक्रमासाठी शहराच्या मध्यवस्तीत एखादी नझुलची १० १० ची जागा त्यांना मिळु शकली नाही. ही शोकांतीका आहे. त्यामुळे कुणी आपली दखल घेवो अगर घेऊ नये आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत हे समाजकार्य असेच पुढे नेण्याचा त्यांचा मानस आहे.

संत गाडगेबाबा विचारांनी भारावलेल्या व त्यांचे प्रत्यक्षात आचरणात आणणारे विठ्ठलराव सोनवळकर यांनी दिनांक ०२/११/२०२१ ते ०३/११/२०२१ या दोनदिवसात त्यांच्या भाजीपोळी केंद्रात पुरणपोळीचे वाटप ते करणार आहेत. या सर्व अपंगांनी सकाळी ११ ते २ या वेळात केंद्रात येऊन पुरणपोळी चे आस्वाद मोफत घेऊन आपल्याला आर्शीर्वाद देण्याचे आवाहन विठ्ठलराव सोनवळकर यांनी केले आहे.

बालपणी अन्नावाचुन उपाशी राहण्याची वेळ आपल्यावर आली. मंदिरातील देवापुढे ठेवलेला नैवेद्य खाऊन दिवस काढले. हे दिवस इतर कुणाच्याही वाटयाला येऊ नये या भावनेतुन हे सेवाकार्य सुरु केले आहे असे विठ्ठलराव सोनवळकर सांगतात. या कार्यात त्यांच्या कुटुंबाचे  सहकार्य त्यांना मिळते.

टॅग्स :foodअन्नSocialसामाजिक