शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
4
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
5
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
6
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
7
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
8
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
9
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
10
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
11
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
12
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
13
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
14
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
15
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
16
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
17
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
18
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
19
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
20
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...

प्रशंसनीय! दिवाळीत अंध, अपंग व कुष्ठरोग्यांना 'ते' गेल्या ३२ वर्षांपासून आपुलकीने वाढतात पुरणपोळीचे मोफत भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 21:00 IST

Amravati News दिवाळीच्या दोन दिवसात शहरातील अंध, अपंग व कुष्ठरोगी नागरिकांना तसेच निराधारांना सुग्रास पुरणपोळीचे जेवण वाढण्याचा स्तुत्य उपक्रम अमरावतीतील विठ्ठलराव सोनवळकर यांनी चालविला आहे.

ठळक मुद्देविठ्ठलराव सोनवळकरांच्या पोळी भाजी केंद्रात दोन दिवस दिवाळी

अमरावती : गेल्या ३२ वर्षांपासून राष्ट्रीय तसेच भारतीय संस्कृतीतील मोठया सणांना शहरातील दीन दुबळ्यांना मोफत मिष्टान्नाचे भोजन देण्याचा विठठलराव सोनवळकर यांचा उपक्रम सुरु आहे. या वर्षी दिनांक ०२/११/२०२१ ते ०३/११/२०२१ या दोनदिवसात त्यांच्या भाजीपोळी केंद्रात पुरणपोळी चे वाटप करण्यात येणार आहे.

शहरातील अंध, अपंगांनी त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन विठ्ठलराव सोनवळकर यांनी केलेले आहे. २६ जानेवारी १९८९ ला विठ्ठलराव सोनवळकर यांनी भाजीपोळी केंद्राची स्थापना केली. आज त्याला ३२ वर्षे पूर्ण झालेली आहे. शहरातील अंध, अपंग तसेच रुग्णालयात येणारे रुग्य व त्यांच्या नातेवाईकांना अत्यल्प दरात जेवण मिळावे या उददेशाने त्यांनी सुरु केलेल्या या केंद्रात सेवेचा अखंड झरा वाहतो आहे. राष्ट्रीय सण तसेच भारतीय संस्कृतीतील मोठया सणांना शहरातील अंध अपंगांना मोफत पक्वानाचे वाटप करतात. ३२ वर्षात या सेवेत कधीच कोणताही खंड पडला नाही.

या सेवेबरोबरच शहरातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पाच रुपयात तीन पोळ्या, व वाटीभर दाळभाजी हा त्यांचा नित्याचा उपक्रम आहे. गेल्या ३२ वर्षात महागाई आकाशाला भिडली परंतु विठठलरांच्या भाजीपोळी केंद्राची चव आणि धान्याचा दर्जा बदलला नाही. अनेक सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी येऊन त्यांच्या केंद्राची पाहाणी केली. व भरभरुन कौतुक केले. अनेकांनी पुरस्कार दिले परंतु अशा समाजशील उपक्रमासाठी शहराच्या मध्यवस्तीत एखादी नझुलची १० १० ची जागा त्यांना मिळु शकली नाही. ही शोकांतीका आहे. त्यामुळे कुणी आपली दखल घेवो अगर घेऊ नये आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत हे समाजकार्य असेच पुढे नेण्याचा त्यांचा मानस आहे.

संत गाडगेबाबा विचारांनी भारावलेल्या व त्यांचे प्रत्यक्षात आचरणात आणणारे विठ्ठलराव सोनवळकर यांनी दिनांक ०२/११/२०२१ ते ०३/११/२०२१ या दोनदिवसात त्यांच्या भाजीपोळी केंद्रात पुरणपोळीचे वाटप ते करणार आहेत. या सर्व अपंगांनी सकाळी ११ ते २ या वेळात केंद्रात येऊन पुरणपोळी चे आस्वाद मोफत घेऊन आपल्याला आर्शीर्वाद देण्याचे आवाहन विठ्ठलराव सोनवळकर यांनी केले आहे.

बालपणी अन्नावाचुन उपाशी राहण्याची वेळ आपल्यावर आली. मंदिरातील देवापुढे ठेवलेला नैवेद्य खाऊन दिवस काढले. हे दिवस इतर कुणाच्याही वाटयाला येऊ नये या भावनेतुन हे सेवाकार्य सुरु केले आहे असे विठ्ठलराव सोनवळकर सांगतात. या कार्यात त्यांच्या कुटुंबाचे  सहकार्य त्यांना मिळते.

टॅग्स :foodअन्नSocialसामाजिक