शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

प्रशासकराजने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला कोटींचा फटका

By जितेंद्र दखने | Updated: July 27, 2024 11:00 IST

ग्रामपंचायती मालामाल : वित्त आयोगातून 'नो फंड'

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवर प्रशासक राजवट असल्यामुळे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी केंद्र सरकारने गत तीन वर्षांपासून बंद केला आहे. या तीन वर्षांच्या कालावधीत छदामही न मिळाल्यामुळे अनेक विकासकामांना ब्रेक लागला आहे. ग्रामपंचायतींना मात्र पूर्वीप्रमाणे हा निधी दिला जात आहे. या निधीबाबत ग्रामपंचायती मालामाल, तर जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या तिजोरीत ठणठणाट झाला आहे.

जिल्हा परिषदेवर २० मार्च आणि १४ पैकी ११ पंचायत समित्यावर १३ मार्च २०२२ पासून प्रशासकराज आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांचा पंधराव्या वित्त आयोगाचा निधी केंद्र सरकारने गत तीन वर्षांपासून बंद केला आहे. या तीन वर्षांत छदामही न मिळाल्यामुळे अनेक ग्रामविकासाच्या ब्रेक लागला आहे. ग्रामपंचायतींना मात्र पूर्वीप्रमाणे हा निधी दिला जात आहे. या निधीच्या बाबतीत ग्रामपंचायती बोलबाला आहे, तर जिल्हा परिषदा व पंचायत समित्या मात्र निधीबाबत डामडोल झाल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासकराज असलेल्या पंचायतराज संस्थांना वित्त आयोगाचा निधी दिली जाणार नसल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्राच्या भूमिकेमुळे अमरावती जिल्हा परिषद व जिल्ह्यातील ११ पंचायत समित्या निधीपासून वंचित आहे. यामुळे जिल्हा परिषदा व ११ पंचायत समित्यांचे मिळून जवळपास ५० कोटी रुपयांच्या निधीला मुकावे लागले आहे.

येत्या ३१ मार्च २०२५ ला संपणार मुदतकेंद्रीय वित्त आयोगाची दर पाच वर्षानी पुनर्रचना केली जाते. यानुसार दि. १ एप्रिल २०२० पासून देशात पंधरावा वित्त आयोग सुरू झाला आहे. या आयोगाची दि. ३१ मार्च २०२५ रोजी मुदत संपणार आहे.

झेडपीचे ५० कोटींचे नुकसानप्रशासकराज असल्यामुळे जिल्हा परिषद व जिल्ह्यातील १४ पैकी ११ पंचायत समित्यांना तीन वर्षांपासून १५वा वित्त आयोगाचा निधी बंद असल्याने जिल्हा परिषदेला जवळपास ५० कोटींचा फटका बसला आहे. प्रत्येक वर्षाला १८ ते २० कोटी येणे अपेक्षित होते. आतापर्यंत जिल्ह्यातील ८४१ ग्रामपंचायतींना ३९९ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदAmravatiअमरावती