शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

वनविभागाच्या आस्थापना खर्चात ‘आयएफएस’मुळे अतिरिक्त वाढ

By गणेश वासनिक | Updated: July 4, 2024 18:57 IST

राज्य शासन अंधारात; अनावश्यक पदनिर्मितीने पदस्थापनेचे नियोजन कोलमडले, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार लक्ष देणार केव्हा?

गणेश वासनिक / अमरावती अमरावती : राज्याच्या वनविभागामध्ये गरज नसताना देखील भावसे संवर्गात अनावश्यक पदे वाढविण्यात आली आहेत. ‘आयएफएस’च्या मनमानी कारभारामुळे आता शासनाच्या तिजोरीवर व आस्थापना खर्चात ‘भावसे’मुळे अतिरिक्त वाढ झाली आहे. पदांचा दुरुपयोग करून मर्जीनुसार व काही आधिकाऱ्यांसाठी ‘आयएफएस’ची अनावश्यक पदनिर्मिती केल्याने नियोजन कोलमडले आहे. या नियमबाह्य कारभाराकडे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे.

आस्थापनेवरील खर्च कमी करावा, याबाबत राज्य शासन प्रयत्नशील असते. मात्र, वनविभागात उलट प्रक्रिया घडत आहे. काही वरिष्ठ भावसे अधिकाऱ्यांनी आवश्यकता नसतानाही भावसेची अतिरिक्त पदे वाढवून घेतली. बऱ्याच भावसे अधिकाऱ्यांना २ वर्षे इतकाच कालखंड झाला असतानाही अजूनही त्यांना पदस्थापना करण्यात आलेली नाही. मात्र, राज्य शासनावरील आस्थापना खर्चात वाढ झालेली आहे. या चुकीच्या व्यवस्थापनामुळे की जाणूनबुजून केलेल्या चुकीमुळे केंद्र सरकारकडे (यूपीएससी) भावसेची जास्तीच्या पदांची मागणी करण्यात आली. मात्र, ही झालेली चूक राज्य शासनाला कळवू दिली नाही आणि याचा तोटा राज्य शासनाला आर्थिकदृष्टया झाला. मात्र, याचाच प्रत्यक्ष, अप्रत्यपणे परिणाम राज्य सेवेतील अधिकाऱ्यांना भोगावा लागत आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक भावसे पदे असल्याने विभागीय स्तरावर मवसे अधिकाऱ्यांना पदस्थापना कधी होऊच दिली नाही, हे वास्तव आहे.

राज्य शासन अंधारात; अनावश्यक पदनिर्मितीवनविभागामध्ये आवश्यकता नसताना अनेक ‘पीसीसीएफ’, ‘एपीसीसीएफ’ची पदे विनाकारण निर्माण करण्यात आली आहेत. त्यांचा वेतन खर्चाचा भुर्दंड राज्य शासन विनाकारण सोसत आहे. याकडेसुद्धा वनमंत्रालय लक्ष देईल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ‘आयएफएस’ लॉबीने आपल्या भल्यासाठी पदांची निर्मिती केली असून विभागीय वनअधिकाऱ्यांना ना पदस्थापना, ना हक्क मिळतो, अशी आर्त हाक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे प्रस्तावाद्वारे महाराष्ट्र राज्य राजपत्रित वनअधिकारी संघटनेचे अध्यक्ष अमोल थोरात, मुख्य प्रवर्तक सुभाष डोंगरे, कार्यकारी अध्यक्ष अतुल देवकर, महासचिव आदींनी केली आहे. 

टॅग्स :forest departmentवनविभागAmravatiअमरावती