शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

'एसटी'ला विठुराया पावला, तिजोरीत एक कोटीची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 11:23 IST

पंढरपूर यात्रा : दहा दिवसांत मिळाले भरघोस उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य परिवहन महामंडळाने यंदा आषाढी एकादशीनिमित्त २१३ विशेष बसेस पंढरपूर यात्रेसाठी सोडल्या होत्या. यातून १ कोटी ११ लाख ७४ हजार ९६२ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने लालपरीला विठ्ठल पावला आहे. आषाढीसाठी जिल्ह्यातील आठ आगारांमधून ४१७ फेऱ्या झाल्या आहेत. एसटीने ४९ लाख ९३ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. तर ३७ हजार ७०४ भाविकांनी यंदाच्या वर्षी प्रवास केला असल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोणत्याही गावातून ४० प्रवासी मिळाल्यास त्या गावातून थेट बस पाठविण्याचे नियोजनही महामंडळाने केले होते. यामुळे अनेक प्रवाशांना पंढरपूरला जाण्याला सोयीचे झाले. एसटी महामंडळाने १३ ते २२ जुलै दरम्यान जादा बसेस सोडल्याने भाविकांना लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन आपले घर गाठता आले. यात्रेत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आषाढी यात्रेमध्ये पंढरपूर येथे दाखल होतात. या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या आठ बसस्थानकांतून जादा गाड्या सोडल्या होत्या.

महिला व ज्येष्ठांना प्रवास सवलतजिल्ह्यातून पंढरपूर यात्रेकरिता पंढरपूर, पुणे, आळंदी आदी ठिकाणी अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या. महिला, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ व ७५ वर्षावरील नागरिकांना ६५.९६ लाख रुपयांची सवलत योजने अंतर्गत एसटी महामंडळामार्फत देण्यात आली.

आकडे बोलतातएकूण फेऱ्या : ४१७एकूण किलोमीटर : ४९.९३ लाख एकूण उत्पन्न : १ कोटी ११ लाख ७४ हजार ९६२ रुपये एकूण प्रवासी : ३७,७०४

३७ लाखांची उत्पन्नवाढयंदा आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी एसटी बसेस सोडल्या होत्या. मागील वर्षी यात्रा महोत्सवात ७८.९२ लाखांचे उत्पन्न महामंडळाला झाले होते. यंदा १ कोटी १७ लाखांवर उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३७ लाखांचे उत्पन्न वाढले. यंदा प्रवासी संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी योगेश ठाकरे यांनी दिली. 

टॅग्स :Amravatiअमरावती