शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

‘माइंड लॉजिक्स’ला अमरावती विद्यापीठाचा पुन्हा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 19:43 IST

उन्हाळी-२०१९ च्या परीक्षेपासून ‘माइंड लॉजिक्स’कडे असलेली डिजिटल मूल्यांकनाची अधिकांश कामे काढून घेण्यात आली आहेत. परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ठाण मांडून बसलेल्या ‘माइंड लॉजिक्स’ कंपनीचे पंख छाटण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. यावर्षी उन्हाळी-२०१९ च्या परीक्षेपासून ‘माइंड लॉजिक्स’कडे असलेली डिजिटल मूल्यांकनाची अधिकांश कामे काढून घेण्यात आली आहेत. परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. 

विद्यापीठात ऑनलाइन परीक्षा प्रणालीच्या नियमनाची जबाबदारी असलेल्या ‘माइंड लॉजिक्स’ या कंपनीने विद्यापीठाच्या तिजोरीला मोठे भगदाड पाडले. मोठ्या प्रती पेपर आणि प्रती परीक्षा या घोळातून कंपनीने चांगलीच रक्कम प्राप्त केली. विद्यार्थी संघटना, प्रसार माध्यमे आणि सिनेट सभेने या विषयावर सातत्याने लक्ष वेधल्यानंतर अखेरीस कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी या कंपनीकडून परीक्षेची कामे टप्प्याटप्प्याने काढून घेण्याचे सिनेट सभेत जाहीर केले होते. त्यानुसार मागील परीक्षेपासून प्री आणि पोस्ट परीक्षेची कामे कंपनीकडून अगोदरच काढून घेण्यात आलेली आहेत. त्यानंतर कंपनीकडे ऑनलाइन प्रश्नपत्रिका वितरण आणि डिजिटल व्हॅल्यूएशनची कामे शिल्लक होती. आता उन्हाळी-२०१९ च्या परीक्षेपासून कंपनीकडून विज्ञान, विधी आणि फार्मसी या शाखांच्या परीक्षांचे डिजिटल व्हॅल्यूएशनची कामे काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता या तीनही परीक्षांसाठी जुन्या प्रकारच्या उत्तरपत्रिका वापरल्या जाणार असून, मूल्यांकन ऑफलाइन होणार आहे. परीक्षा संचालक हेमंत देशमुख यांनी माइंड लॉजिक्सला दणका देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

वर्षाकाठी ७० लाखांची बचत डिजिटल व्हॅल्युएशनसाठी प्रत्येक उत्तरपत्रिकेमागे २२ रुपये दर ‘माइंड लॉजिक्स’ आकारत होते. यामध्ये या तीनही शाखांच्या तीन लाखांपेक्षा जास्त उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन होते. त्यामुळे आता ७० लाखांच्या आसपास रक्कम वाचणार आहे, शिवाय परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत ‘माइंड लॉजिक्स’ कडून होणारी दिरंगाईदेखील कमी होणार आहे.

विद्यापीठाच्या हितासाठी उचलले पाऊलकुलगुरूंनी माइंड लॉजिक्सची गच्छंती करण्याचे आश्वासित केले. त्यानुसार आम्ही हे पाऊल उचलले आहे. यामुळे डिजिटल मूल्यांकनासाठी लागणारी रक्कमदेखील वाचणार आहे. पुढील परीक्षेपासून कंपनीकडून पूर्ण कामे काढून घेतली जातील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठexamपरीक्षाdigitalडिजिटल