शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

‘माइंड लॉजिक्स’ला अमरावती विद्यापीठाचा पुन्हा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 19:43 IST

उन्हाळी-२०१९ च्या परीक्षेपासून ‘माइंड लॉजिक्स’कडे असलेली डिजिटल मूल्यांकनाची अधिकांश कामे काढून घेण्यात आली आहेत. परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ठाण मांडून बसलेल्या ‘माइंड लॉजिक्स’ कंपनीचे पंख छाटण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. यावर्षी उन्हाळी-२०१९ च्या परीक्षेपासून ‘माइंड लॉजिक्स’कडे असलेली डिजिटल मूल्यांकनाची अधिकांश कामे काढून घेण्यात आली आहेत. परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. 

विद्यापीठात ऑनलाइन परीक्षा प्रणालीच्या नियमनाची जबाबदारी असलेल्या ‘माइंड लॉजिक्स’ या कंपनीने विद्यापीठाच्या तिजोरीला मोठे भगदाड पाडले. मोठ्या प्रती पेपर आणि प्रती परीक्षा या घोळातून कंपनीने चांगलीच रक्कम प्राप्त केली. विद्यार्थी संघटना, प्रसार माध्यमे आणि सिनेट सभेने या विषयावर सातत्याने लक्ष वेधल्यानंतर अखेरीस कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी या कंपनीकडून परीक्षेची कामे टप्प्याटप्प्याने काढून घेण्याचे सिनेट सभेत जाहीर केले होते. त्यानुसार मागील परीक्षेपासून प्री आणि पोस्ट परीक्षेची कामे कंपनीकडून अगोदरच काढून घेण्यात आलेली आहेत. त्यानंतर कंपनीकडे ऑनलाइन प्रश्नपत्रिका वितरण आणि डिजिटल व्हॅल्यूएशनची कामे शिल्लक होती. आता उन्हाळी-२०१९ च्या परीक्षेपासून कंपनीकडून विज्ञान, विधी आणि फार्मसी या शाखांच्या परीक्षांचे डिजिटल व्हॅल्यूएशनची कामे काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता या तीनही परीक्षांसाठी जुन्या प्रकारच्या उत्तरपत्रिका वापरल्या जाणार असून, मूल्यांकन ऑफलाइन होणार आहे. परीक्षा संचालक हेमंत देशमुख यांनी माइंड लॉजिक्सला दणका देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

वर्षाकाठी ७० लाखांची बचत डिजिटल व्हॅल्युएशनसाठी प्रत्येक उत्तरपत्रिकेमागे २२ रुपये दर ‘माइंड लॉजिक्स’ आकारत होते. यामध्ये या तीनही शाखांच्या तीन लाखांपेक्षा जास्त उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन होते. त्यामुळे आता ७० लाखांच्या आसपास रक्कम वाचणार आहे, शिवाय परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत ‘माइंड लॉजिक्स’ कडून होणारी दिरंगाईदेखील कमी होणार आहे.

विद्यापीठाच्या हितासाठी उचलले पाऊलकुलगुरूंनी माइंड लॉजिक्सची गच्छंती करण्याचे आश्वासित केले. त्यानुसार आम्ही हे पाऊल उचलले आहे. यामुळे डिजिटल मूल्यांकनासाठी लागणारी रक्कमदेखील वाचणार आहे. पुढील परीक्षेपासून कंपनीकडून पूर्ण कामे काढून घेतली जातील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठexamपरीक्षाdigitalडिजिटल