शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बियाणे, खतांचा साठा, दर फलक अद्ययावत नसल्यास कारवाई; कृषी सहसंचालकांची तंबी

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 12, 2024 20:22 IST

विभागातील कृषी केंद्र तपासणीचे कृषी अधिकाऱ्यांंना निर्देश

अमरावती : खरीप हंगामाला सुरुवात होत असल्याने बियाणे, खते व कीटकनाशके खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रात गर्दी करीत आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून विभागातील सर्व कृषी केंद्रांमध्ये दर्शनी भागात साठा व दर फलक अद्ययावत नसल्यास तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश विभागीय कृषी सहसंचालक के. एस. मुळे यांनी कृषी अधिकाऱ्यांना बुधवारी दिले.

कृषी केंद्रांची नियमित तपासणी करुन अनियमितता आढळल्यास कारवाई करण्याच्या सूचना यापूर्वीच वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांना दिल्याचे मुळे म्हणाले. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून कृषी निविष्ठांची खरेदी करावी व अंतिम तारीख तपासून पक्की पावती घ्यावी. शिवाय खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेष्टन, पिशवी, बॅग, टॅग पावती, कापणी होईपर्यंत जपून ठेवावी व बियाण्यांची पाकिटे सीलबंद असल्याची खात्री करावी. कमी वजनाच्या तसेच छापील किमतीपेक्षा जास्त दराने निविष्ठांची विक्री होत असल्यास १८००-२३३-४००० व ९८२२४४६६५५ या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा जवळच्या कृषी कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन मुळे यांनी केले आहे.

सोयाबीन पेरणीसाठी घरचे बियाणे उपयुक्त असल्याने बीजप्रक्रिया व उगवणशक्ती तपासून घ्यावी, याद्वारे उत्पादन खर्चात बचत होणार आहे. १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये व गावातील अनधिकृत व्यक्तीकडून बियाणे खरेदी करू नये, असे कृषी उपसंचालक म्हणाले.

बियाणे, खतांची लिंकिंग असल्यास कारवाईनिविष्ठांची खरेदीवेळी विक्रेत्यांकडून लिंकिंगची सक्ती केली जात असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी विभागाकडे तक्रार करावी. बाजारात राऊंड अप बीटी, एचटीबीटी, बीजी-३ अशा प्रकारच्या प्रतिबंधित कपाशी बियाण्यांची खासगी व्यक्तीमार्फत घरपोच विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे फसवणूक होत असल्यास खबरदारी घेणे महत्त्वाचे असल्याचे मुळे यांनी सांगितले.

या क्रमांकावर करा तक्रार

शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांबाबत अमरावती विभागासाठी संजय पाटील (९४२३१३२६२६), बुलढाणा अरुण इंगळे (८१०४७९२०६३), अकोला सतीश दांडगे (९६६६२७३५०७), वाशिम आकाश इंगोले (९४२०३५३३०९), अमरावती सागर डोंगरे (८७८८८२१७८०) व यवतमाळ जिल्ह्यात कल्याण पाटील (९४२३४४३९०८) या क्रमांकावर तक्रार करता येणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी