शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

२५ टक्के गुणवाढप्रकरणी ४५० परीक्षकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 6:00 AM

सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे नियमावली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी एकच झुंबड उडत असते. परीक्षेत मूल्यांकन व्यवस्थित झाले नाही; पेपर नीट सोडविला असताना गुण कमी का मिळाले, अशी विचारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक वर्ग विद्यापीठात गर्दी करतात.

ठळक मुद्देपाच हजारांचा दंड, सेवापुस्तिकेत नोंद : व्यवस्थापन परिषदेचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी २०१८ परीक्षेत पुनर्मूल्यांकनात २५ टक्के गुणवाढ होऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. याप्रकरणी ४५० परीक्षकांवर कारवाई प्रस्तावित केली असून, प्रतिपरीक्षक पाच हजार रुपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद केली जाणार आहे. विद्यापीठ कायद्यानुसार व्यवस्थापन परिषदेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे नियमावली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी एकच झुंबड उडत असते. परीक्षेत मूल्यांकन व्यवस्थित झाले नाही; पेपर नीट सोडविला असताना गुण कमी का मिळाले, अशी विचारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक वर्ग विद्यापीठात गर्दी करतात. हा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे परीक्षा विभागाने ‘अंडर व्हॅल्यूएशन आणि ओव्हर व्हॅल्यूएशन’ अंतर्गत पुनर्मूल्यांकनात विद्यार्थ्यांची २५ टक्के गुणवाढ झाल्यास अशा परीक्षकांवर पाच हजार रुपये दंड आणि त्यांच्या सेवापुस्तिकेत याबाबत नोंद करण्याला सुरुवात केली आहे. हिवाळी २०१८ परीक्षेत बहुतांश विद्यार्थ्यांनी पेपर व्यवस्थित सोडविले असताना, गुण कमी अथवा नापास का झालो, ही विचारणा करण्यासाठी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आणि परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांच्याकडे एकच गर्दी केली होती.विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकांची छायापत्र घेण्याची संधी आहे. त्यावरून हिवाळी २०१८ परीक्षेत २४ हजार ८५० विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकन अर्ज सादर केले होते. त्यापैकी ६२५ विद्यार्थ्यांना २५ टक्के गुणवाढ मिळाली होती. याप्रकरणी ४५० परीक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मूल्यांकनात दिरंगाई आणि दुर्लक्षाचा ठपका ठेवत प्रत्येकी पाच हजार रूपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद अशी कारवाई होणार आहे. संबंधित परीक्षकांना नोटीस बजावण्यात आली आहे.विद्यापीठाच्या हिवाळी २०१८ परीक्षेत २५ टक्क्यांपेक्षा जास्त गुणवाढ झाल्याप्रकरणी कायद्यानुसार ४५० परीक्षकांना कारवाईची नोटीस पाठविली आहे. पाच हजार रुपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद असे त्याचे स्वरूप आहे.- हेमंत देशमुखसंचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र