शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

४५ विहिरींचे अधिग्रहण, आठ गावांची तहान ११ टँकरवर

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 30, 2024 21:20 IST

गावांना कोरड : पाणीटंचाईची तीव्रता वाढली

अमरावती: एप्रिल महिन्यातील रखरखीत उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडत असल्याने अनेक गावांना कोरड लागली आहे. पाणीटंचाईची तीव्रता वाढल्याने तात्पुरत्या उपाययोजना म्हणून सद्यस्थितीत खासगी ४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले तर ११ गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करुन तहान भागविली जात आहे.

पावसाळ्यात चांदूरबाजार वगळता १३ ही तालुक्यांत पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे जमिनीचे पुनर्भरण न झाल्याने मार्च पश्चात भूजलस्तरात कमी येत आहे. त्यामुळे अनेक गावांचे जलस्त्रोत आता कोरडे पडत असल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. त्यातुलनेत करावयाच्या उपाययोजना आचारसंहितेत अडकल्याने अनेक गावे तहानली आहे. आयोगाचे निर्देशानुसार केवळ टँकर सुरु करणे व विहिरींचे अधिग्रहण यालाच मुभा असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

प्रशासनाच्या साप्ताहिक अहवालानुसार सद्यस्थितीत अमरावती तालुक्यात ७, भातकुली १, चांदूर रेल्वे ३, नांदगाव खंडेश्वर १६, अचलपूर ३, मोर्शी ११ तसेच वरुड व चिखलदरा तालुक्यात प्रत्येकी दोन खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहेत.

आठ गावांची तहान ११ टँकरवरसद्यस्थितीत चांदूर रेल्वे तालुक्यात सावंगी मग्रापूर, चिखलदरा तालुक्यात बेला (सलोना), मोथा, धामकटडोह, आकी, बहाद्दरपूर गौलखेडा बाजार येथे प्रत्येकी १ तर खडीमल येथे चार टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे अद्यापही पूर्ण झालेली नसल्याने तात्पुरती उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातAmravatiअमरावती