शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना विश्वासात न घेताच विद्यापीठासाठी जमिनींचे अधिग्रहण, उपोषणाचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 18:32 IST

आरमोरी मार्गावर असलेल्या गोगाव येथील २०० एकर जमीन विद्यापीठासाठी अधिग्रहीत करण्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र ज्या शेतक-यांची जमीन अधिग्रहित केली जात आहे त्यांना याबाबत काहीच कळविण्यात आलेले नाही.

गडचिरोली : आरमोरी मार्गावर असलेल्या गोगाव येथील २०० एकर जमीन विद्यापीठासाठी अधिग्रहीत करण्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र ज्या शेतक-यांची जमीन अधिग्रहित केली जात आहे त्यांना याबाबत काहीच कळविण्यात आलेले नाही. ९५ टक्के शेतक-यांचा जमीन देण्यास विरोध आहे. तरीही जमीन मोजमापाची कार्यवाही सुरू केली असल्याने शेतक-यांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे. काही शेतक-यांनी यासंदर्भात उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे.

गोंडवाना विद्यापीठाला एकूण २०० एकर जमिनीची आवश्यकता आहे. सर्वप्रथम चामोर्शी मार्गावरील वनविभागाची जागा त्यासाठी निश्चित केली होती. मात्र वनविभागाने सुमारे २०० एकर जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे विद्यापीठाने आपला मोर्चा आरमोरी मार्गाकडे वळवित गडचिरोलीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या गोगाव, अडपल्ली या दोन गावाजवळची जमीन निश्चित केली आहे. यामध्ये जवळपास १५० शेतक-यांची जमीन जाणार आहे. यातील बहूतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. विद्यापीठाला जमीन दिल्यास शेकडो शेतकरी भूमिहीन होणार असल्याने ९९ टक्के शेतकरी विद्यापीठाला जमीन देण्यास स्पष्ट नकार दर्शवित आहेत. 

जमीन अधिग्रहन हा अत्यंत संवेदशील मुद्दा आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक शेतक-याला विश्वासात घेऊन त्यांची परवानगी घेणे आवश्यक असताना काही निवडक शेतक-यांची सहमती घेवून जमीन अधिग्रहणाची कार्यवाही सुरू केली आहे. ९ फेब्रुवारीपासून सिमांकनही निश्चित केले जात आहे. आपल्याला विश्वासात न घेताच प्रशासन जबरदस्तीने जमीन ताब्यात घेत असल्याने याविरोधात काही शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे रेल्वे पाठोपाठ विद्यापीठाच्या जागेचा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

याबाबत विद्यापीठातील वरिष्ठ अधिका-यांना शेतक-यांनी विचारणा केली असता जमीन अधिग्रहण ही आपली जबाबदारी नसून जिल्हाधिका-यांशी संपर्क साधा, असे उत्तर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.  ''जमीन मोजमाप करणे हे भूमी अभिलेख विभागाचे काम आहे. त्याचा विद्यापीठाशी संबंध नाही. मोजमाप झाल्यानंतर शेतक-यांची सहमती मागीतली जाईल. त्यानंतरच जमीन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण केली जाईल''. - दीपक जुनघरे, प्रभारी कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

टॅग्स :Farmerशेतकरी