शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

पावसाळ्यातही १०१ खासगी विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

यावर्षी सुरुवातीपासूनच ग्रामीण भागाला पाणीटंचाईची झळ पोहोचणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई आराखडा तयार करून मंजूर करून घेतला होता. जानेवारी ते मार्च या पहिल्या टप्प्यात काही गावांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले होते. मे महिन्यात त्याची तीव्रता वाढली. परिणामी या महिन्यात २२ टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला. आता पुन्हा यात दोन टँकरची भर पडली आहे.

ठळक मुद्देटंचाईच्या झळा कायम : २४ गावांची तहान टँकरवर, ६० विंधन विहिरी; दमदार पावसाची प्रतीक्षा

जितेंद्र दखने।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाळा सुरू झाला आहे. मात्र, अद्यापही ग्रामीण भागातील १०१ गावांतील नागरिकांना अधिग्रहित खासगी विहिरी तसेच ६० विंधन विहिरींच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. २४ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यावरून पावसाळ्यातही पाणीटंचाईची जिल्ह्यातील तीव्रता स्पष्ट होते.यावर्षी सुरुवातीपासूनच ग्रामीण भागाला पाणीटंचाईची झळ पोहोचणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई आराखडा तयार करून मंजूर करून घेतला होता. जानेवारी ते मार्च या पहिल्या टप्प्यात काही गावांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले होते. मे महिन्यात त्याची तीव्रता वाढली. परिणामी या महिन्यात २२ टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला. आता पुन्हा यात दोन टँकरची भर पडली आहे. यामध्ये सर्वाधिक २१ गावे ही चिखलदरा तालुक्यातील असून, अचलपूर व चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे. विविध तालुक्यांतील १०१ खासगी, तर ६० विंधन विहिरी अधिग्रहण करू न नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. याशिवाय बोअरवेलची ३५८ पैकी २३१ कामे पूर्ण झाली आहेत. यासोबतच इतरही कामे मंजूर केली आहेत. मात्र, ही कामे अजून पूर्ण व्हायची आहेत.सदर कामे ३० जूनपूर्वी करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी आपल्या अधिनस्थ यंत्रणेमार्फत संबंधितांना दिले आहेत. सध्या तरी दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची स्थिती कायम आहे. वातावरणात काहीसा बदल जाणवत असला तरी दमदार पाऊस झाल्यानंतरच पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दरम्यान, औद्योगिक व इतर कारणांसाठी वापर कमी झाला. तरीही काही गावांमध्ये पाणीटंचाई होती. आता या गावांतील नागरिकांसह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा आहे.या गावांना विहीर अधिग्रहण, टँकरद्वारे पाणीअचलपूर तालुक्यातील पथ्रोट, चिखलदरा तालुक्यात एकझिरा, बगदरी, सोनापूर, सोमवारखेडा, खंडुखेडा, तारुबांदा, मलकापूर, आकी, धरमडोह, बहादरपूर, तोरणवाडी, खोंगडा, कोरडा (हनुमानढाणा), काला पांढरी, मोथा, मनभंग, कोयलारी, पाचडोंगरी, केली, बारलिंगा, कोरडा आणि चांदूर रेल्वेमधील सावंगी मग्रापूर या गावांना २४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.चांदूर रेल्वे तालुक्यात १९, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १८, चिखलदरा तालुक्यात १७, अमरावती तालुक्यात १३, मोर्शी व वरूड तालुक्यांमध्ये प्रत्येकी ९, तिवसा तालुक्यात ७, धारणी तालुक्यात ३, धामणगाव रेल्वे तालुक्यात ३, चांदूर बाजार तालुक्यात २, अचलपूर तालुक्यात १ अशा खासगी १०१ व ६० विंधन विहिरींचे अधिग्रहण केला गेले आहे.लॉकडाऊनच्या काळातही ज्या ठिकाणी पाणीटंचाई होती, अशा ठिकाणी टंचाईचे निवारण करून पाणीपुरवठा करण्यात आला आहे. यानंतरही काही गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाईच्या तक्रारी आहेत. अशा ठिकाणी नळाला मोटारी लावू नये, याकरिता सूचना दिल्या आहेत. नळांना तोट्या बसविण्याबाबत ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत.- राजेंद्र सावळकर, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग

टॅग्स :Waterपाणी