शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
2
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
3
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
4
"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
5
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
6
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
7
खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी
8
Sonam Kapoor : सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट; नवऱ्याची मजेशीर कमेंट
9
कूनोतून आली गुडन्यूज; भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म
10
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांना वीरमरण, जानेवारीत होणार होतं लग्न
11
आरोग्य विमा होणार स्वस्त? प्रीमियमच्या मनमानी वाढीला लगाम लागणार; सरकार उचलणार 'ही' मोठी पाऊले!
12
महिन्यात दिवस कमी असो किंवा जास्त, पगार नेहमी ३० दिवसांचाच का येतो? काय आहे कॅलक्युलेट करण्याचा फॉर्म्युला
13
VIDEO: जिममध्ये वजन उचलताना अचानक तोल गेला, मुलीच्या मानेवर पडला वजनदार बार अन् मग...
14
'आजोबा वारले, तरी इंडक्शन कॉलला हजर रहा!' कॉर्पोरेट जगात 'विषारी' वर्ककल्चरचा कळस; नेटकऱ्यांचा संताप
15
टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
16
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
17
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
18
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
19
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
20
Numerology: तुमचा जन्म ‘या’ ३ पैकी तारखांना झालाय? गूढ-रहस्य असते जीवन, केतु देतो अमाप पैसा!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही १०१ खासगी विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

यावर्षी सुरुवातीपासूनच ग्रामीण भागाला पाणीटंचाईची झळ पोहोचणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई आराखडा तयार करून मंजूर करून घेतला होता. जानेवारी ते मार्च या पहिल्या टप्प्यात काही गावांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले होते. मे महिन्यात त्याची तीव्रता वाढली. परिणामी या महिन्यात २२ टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला. आता पुन्हा यात दोन टँकरची भर पडली आहे.

ठळक मुद्देटंचाईच्या झळा कायम : २४ गावांची तहान टँकरवर, ६० विंधन विहिरी; दमदार पावसाची प्रतीक्षा

जितेंद्र दखने।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाळा सुरू झाला आहे. मात्र, अद्यापही ग्रामीण भागातील १०१ गावांतील नागरिकांना अधिग्रहित खासगी विहिरी तसेच ६० विंधन विहिरींच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. २४ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यावरून पावसाळ्यातही पाणीटंचाईची जिल्ह्यातील तीव्रता स्पष्ट होते.यावर्षी सुरुवातीपासूनच ग्रामीण भागाला पाणीटंचाईची झळ पोहोचणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई आराखडा तयार करून मंजूर करून घेतला होता. जानेवारी ते मार्च या पहिल्या टप्प्यात काही गावांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले होते. मे महिन्यात त्याची तीव्रता वाढली. परिणामी या महिन्यात २२ टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला. आता पुन्हा यात दोन टँकरची भर पडली आहे. यामध्ये सर्वाधिक २१ गावे ही चिखलदरा तालुक्यातील असून, अचलपूर व चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे. विविध तालुक्यांतील १०१ खासगी, तर ६० विंधन विहिरी अधिग्रहण करू न नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. याशिवाय बोअरवेलची ३५८ पैकी २३१ कामे पूर्ण झाली आहेत. यासोबतच इतरही कामे मंजूर केली आहेत. मात्र, ही कामे अजून पूर्ण व्हायची आहेत.सदर कामे ३० जूनपूर्वी करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी आपल्या अधिनस्थ यंत्रणेमार्फत संबंधितांना दिले आहेत. सध्या तरी दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची स्थिती कायम आहे. वातावरणात काहीसा बदल जाणवत असला तरी दमदार पाऊस झाल्यानंतरच पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दरम्यान, औद्योगिक व इतर कारणांसाठी वापर कमी झाला. तरीही काही गावांमध्ये पाणीटंचाई होती. आता या गावांतील नागरिकांसह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा आहे.या गावांना विहीर अधिग्रहण, टँकरद्वारे पाणीअचलपूर तालुक्यातील पथ्रोट, चिखलदरा तालुक्यात एकझिरा, बगदरी, सोनापूर, सोमवारखेडा, खंडुखेडा, तारुबांदा, मलकापूर, आकी, धरमडोह, बहादरपूर, तोरणवाडी, खोंगडा, कोरडा (हनुमानढाणा), काला पांढरी, मोथा, मनभंग, कोयलारी, पाचडोंगरी, केली, बारलिंगा, कोरडा आणि चांदूर रेल्वेमधील सावंगी मग्रापूर या गावांना २४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.चांदूर रेल्वे तालुक्यात १९, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १८, चिखलदरा तालुक्यात १७, अमरावती तालुक्यात १३, मोर्शी व वरूड तालुक्यांमध्ये प्रत्येकी ९, तिवसा तालुक्यात ७, धारणी तालुक्यात ३, धामणगाव रेल्वे तालुक्यात ३, चांदूर बाजार तालुक्यात २, अचलपूर तालुक्यात १ अशा खासगी १०१ व ६० विंधन विहिरींचे अधिग्रहण केला गेले आहे.लॉकडाऊनच्या काळातही ज्या ठिकाणी पाणीटंचाई होती, अशा ठिकाणी टंचाईचे निवारण करून पाणीपुरवठा करण्यात आला आहे. यानंतरही काही गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाईच्या तक्रारी आहेत. अशा ठिकाणी नळाला मोटारी लावू नये, याकरिता सूचना दिल्या आहेत. नळांना तोट्या बसविण्याबाबत ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत.- राजेंद्र सावळकर, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग

टॅग्स :Waterपाणी