शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

अखर्चित निधीसाठी खातेप्रमुख जबाबदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 01:24 IST

जिल्हा परिषदेतील स्वीय निधी खर्चाबाबत वारंवार सूचना देऊनही बहुतांश विभागांचा निधी ४० टक्क्यापर्यंत अखर्चित राहिला आहे. ज्या विभागाचा निधी शिल्लक आहे, त्यांनी महिनाभरात निधी खर्च शंभर टक्क््यांवर न्यावा, अन्यथा खातेप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, असा दम अध्यक्षांनी दिला.

ठळक मुद्देझेडपी अध्यक्ष कडाडले : केवळ ६० टक्केच निधी खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेतील स्वीय निधी खर्चाबाबत वारंवार सूचना देऊनही बहुतांश विभागांचा निधी ४० टक्क्यापर्यंत अखर्चित राहिला आहे. ज्या विभागाचा निधी शिल्लक आहे, त्यांनी महिनाभरात निधी खर्च शंभर टक्क््यांवर न्यावा, अन्यथा खातेप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, असा दम अध्यक्षांनी दिला. जिल्हातील दुष्काळी परिस्थिती आणि काही दिवसांवर आलेल्या लोकसभा आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षांच्या पवित्र्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.जिल्हा परिषद विविध सभा तसेच बैठकीदरम्यान विकासकामांचा आढावा अध्यक्ष नितीन गोंडाणे व पदाधिकारी वेळोवेळी घेत आहेत. यामध्ये अखर्चित निधीचा मुद्दा पुढे आला. त्याचा थेट परिणाम विकासकामांवर दिसून येत आहे. त्यामुळे ज्या विभागाकडून निधीचा विनियोग कमी आहे, त्या विभागांना संपूर्ण निधी खर्च करून विहित मुदतीत कामे पूर्ण करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. आर्थिक वर्ष संपण्याची प्रतीक्षा न करता, त्यापूर्वीच येत्या महिनाभरात विकासकामांवर शंभर टक्के निधी खर्च करण्यासाठी सूचना नितीन गोंडाणे यांनी दिल्या. त्यासाठी कारवाईचा इशारादेखील दिला आहे.अनेक वेळा सूचना देऊनही जिल्हा परिषदेचे बरेच विभाग खर्चात मागे आहेत. काही विभागांचा खर्च ५० टक्केदेखील झालेला नाही. निधी असूनही जिल्ह्याच्या विकासकामांवर तो खर्च होत नसल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निधी खर्च करण्याबाबत हात आखडता घेणाऱ्या खातेप्रमुखांवर कारवाईची मागणी सदस्यांनी केली. त्यानुसार अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी खातेप्रमुखांना येत्या महिनाभरात याबाबत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. निधी अखर्चित राहिल्यास संबंधित खातेप्रमुखांना जबाबदार धरले जाईल. याशिवाय त्यांच्याविरुद्ध कारवाईचा विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. यात कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही गोंडाणे यांनी दिला आहे. चौदाव्या वित्त आयोगातील निधीच्या खर्चाचा तालुकानिहाय आढावा घेतला जात आहे. बहुतांश ग्रामपंचायतींचा निधी शिल्लक आहे. तो वेळेत खर्च झाला पाहिजे, यासंदर्भात पंचायत विभागामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत.दुष्काळग्रस्त भागात बैठकाजिल्ह्यातील अनेक गावांत भीषण दुष्काळ आहे. तेथे दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी गटविकास अधिकाºयांनी प्रत्येक आठवड्याला ग्रामसेवकांच्या बैठकी घेऊन आढावा घ्यावा. जिल्हा परिषद, पंचायत समितीसह लोकप्रतिनिधींना बैठकीला बोलविण्याचे सूचना द्यावी, असे आदेश अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी खातेप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.आगामी लोकसभा निवडणूकीची आचारसंहीता व आर्थिक वर्षाचा अखरे लक्षात घेता विविध विभागाकडे विकास कामांचा उपलब्ध असलेला निधी मुदतीत खर्च करावा अन्यथा निधी अखर्चित राहील संबंधित खातेप्रमुखांना दोषी ठरवून कारवाई केली जाईल- नितीन गोंडाणेअध्यक्ष, जिल्हा परिषद

टॅग्स :zpजिल्हा परिषद