शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मातंग समाजाचा विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश; लोटांगण आंदोलन करून शासनापुढे मांडल्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2022 18:13 IST

आक्रोश आंदोलनामध्ये महाविकास आघाडी सरकारचे प्रतिकात्मक प्रेतयात्रा देखील काढण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. 

अमरावती : राज्यात मांतग समाजावरील वाढत्या अत्याचार तसेच मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालावर लहुजी शक्ती सेनेच्यावतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. लोटांगण आंदोलनातून मातंग समाजाने सरकारवर रोष व्यक्त करीत विविध मागण्यांचे निवेदन मंगळवारी विभागीय आयुक्तांना देण्यात आले.

राज्यात वर्षभरात मातंग समाजावरील अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा लहुजी शक्ती सेनेचा आक्षेप आहे. वाढत्या अत्याचाराविरोधात अनेकवेळा निवेदन, आंदोलन करूनही मातंग समाजाला न्याय मिळत नसल्याचे  आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. गर्ल्स हायस्कूल चौकातून या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. सुरुवातीला हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार होते. परंतु या ठिकाणी पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त असल्याने हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी मातंग समाजाच्या बांधवांनी लोटांगण आंदोलन करून सरकारचे विविध मागण्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

महाविकास आघाडीची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मांतग समाजावरील जातीय द्वेषातून होणारे अन्याय अत्याचार वाढल्याचे लहुजी शक्ती सेनेचा आरोप आहे. त्यामुळे आक्रोश आंदोलनामध्ये महाविकास आघाडी सरकारचे प्रतिकात्मक प्रेतयात्रा देखील काढण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. 

या आहेत मातंग समाजाच्या मागण्या

राज्यातील मातंग समाजावरील वाढते अत्याचार थांबवा, अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाच्या अ, ब, क, ड नुसार मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये मागेल त्याला विना जामीनदार कर्ज देण्यात यावे, डॉ. संतुजी लाड आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, कोरेाना काळात उपासमारी सहन केलेल्या मातंग समाजातील बँन्ड व्यवसायीकांना २ लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे. आदी विविध मागण्यांचा समावेश आहे. त्याच बरोबर वाल्मिकी समाज तसेच चर्मकार समाजाचेही प्रश्न या आंदोलनातून मांडण्यात आले.

टॅग्स :agitationआंदोलनAmravatiअमरावती