शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पावसाळ्याला महिनाभर उलटला, अद्यापही पाणीसाठा नाही वाढला

By जितेंद्र दखने | Updated: July 10, 2024 17:40 IST

Amravati : जिल्ह्यांतील ५६ प्रकल्पांत ३७ टक्केच जलसाठा

अमरावती : यावर्षी पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरी वरुणराजाची म्हणावी तशी कृपा झालेली नाही. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील जलसाठ्यावरील संकट तसेच्या तसे आहेत. जिल्ह्यातील मोठ्या व ७ मध्यम, आणि ४८ लघु अशा ५६ प्रकल्पांमध्ये ७ जुलैअखेर केवळ ३७.१७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मागील वर्षाच्या पावसाळ्यात यावेळी बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. पण, काही धरणाचा पाणीसाठा कमीच होता. यावर्षी जून महिन्यातच पावसाला सुरुवात होईल. अशी अपेक्षा होती. मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. जूनमध्ये झालेल्या अगदी तुरळक पावसाने या धरणांमधील पाणी साठ्यात कोणतीच वाढ झालेली नाही. हा पाऊस सर्वत्र मुसळधार झाला तर पाण्याचा प्रश्न सुटेल अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मूळ परवडता धरणाचा साठा ४४.६५ टक्के आहे. जिल्ह्यात एक मोठा ७ मध्यम व ४८ लघु प्रकल्पांमध्ये एकूण जलसाठा १०४७.३० दलघमी असतो मात्र आजच्या घडीला केवळ ३८९.२५ टक्के दलघमी जलसाठा आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पामध्ये पाणीसाठा खूप कमी झाला आहे. यामध्ये २९.६६ टक्के जलसाठा शिल्लक आहे तसेच ४६ लघु प्रकल्पात २७.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जून महिन्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्याने धरणांमध्ये नव्याने पाण्याची आवक झाली नाही.

प्रकल्पांची स्थितीप्रकल्प -            पाणीसाठा                टक्केअप्पर वर्धा -        २५१.८५                    ४४.६५शहानुर -             १३.३३                       २८.९५चंद्रभागा-            २१.९४                       ५३.१८सपन-                 १८.५९                       ४८.१६पूर्णा-                   १८.५१                       ५२.३२पंढरी-                 १०.२०                        १८.०९बोर्डी नाला           १.२२                          १०.०७

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातAmravatiअमरावती