शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अखेर अमरावती ग्रामीण पोलिस मुख्यायातून ‘ते’ शासकीय वाहन हटविले 

By गणेश वासनिक | Updated: April 9, 2024 21:04 IST

निवडणूक विभागाने घेतली दखल, मोर्शी सामाजिक वनीकरणाच्या आरएफओंचा प्रताप उघड

अमरावती : सामाजिक वनीकरण विभागाच्या मोर्शी आरएफओंच्या ताब्यातील वाहन हे अमरावती येथील ग्रामीण पोलिस मुख्यालयात ‘शासकीय वाहन लपविले, आयोगाच्या हातावर दिल्या तुरी’ या आशयाचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने छायाचित्रासह प्रकाशित करताच हे वाहन आरएफओंनी त्वरेने तेथून हटविले आहे. मात्र हे शासकीय वाहन आता कुठे नेले? या प्रश्न अनुत्तरीत आहे. परंतु, या गंभीर प्रकरणाची निवडणूक विभागाने दखल घेतली असून याबाबत सामाजिक वनीकरणाला जाब विचारला जाणार असल्याची माहिती आहे.

सामाजिक वनीकरण मोर्शी परिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्राधिकारी शीतल घुटे यांच्याकडे असलेले एमएच २७, एए ०४९७ या क्रमांकाचे वाहन निवडणूक विभागाच्या तावडीतून वाचविण्यासाठी त्यांचे पती कार्यरत असलेल्या मोटार परिवहन विभागाच्या ग्रामीण मुख्यालय येेथे १२ दिवसांपूर्वी आणून लपविले होते. निवडणूक विभागाच्या डोळ्यात धुळफेक करीत मोर्शी आरएफओंनी शक्कल लढविली. तर दुसरीकडे हे वाहन नादुरूस्त असल्याचा बनाव करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कार्यात वाहन आवश्यक असल्याने हे वाहन अधिग्रहीत करण्यासाठ सामाजिक वनीकरणाचे विभागीय वनाधिकारी शरद करे यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र हे वाहन निवडणूक विभागाला नादुरूस्त आणि चालक नसल्याचे कारण सांगून देण्याचे टाळले. मात्र वाहन सुस्थितीत असताना केवळ निवडणूक कामासाठी वाहन देण्याचे टाळून चक्क ते आरएफओंनी अमरावतीच्या ग्रामीण पोलिस मुख्यालयात आणून ठेवले. तथापि, पोलिस मुख्यालयात पोलिसांचीच वाहने ठेवली जात असताना सामाजिक वनीकरणाचे वाहन कशासाठी ठेवले, हा प्रश्न कायम आहे.

सामाजिक वनीकरणाचे विभागीय अधिकारी अनभिज्ञमोर्शी आरएफओंनी परस्पर शासकीय वाहन ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयात आणून ठेवल्याच्या या धक्कादायक प्रकारापासून सामाजिक वनीकरण विभागीय अधिकारी शरद करे हे अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. सामाजिक वनीकरण, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अथवा प्रादेशिक वन विभागात मुबलक जागा असताना ग्रामीण पोलिस मुख्यालयात शासकीय वाहन कशासाठी ठेवण्यात आले, याची चौकशी होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

पोलिस मुख्यालयातून वाहन हलविलेमोर्शी आरएफओंनी वरिष्ठांची परवानगी न घेता शासकीय वाहन हे ग्रामीण मुखयालयात आणून लपविले होते. ही बाब लोकमतनेउजेडात आणताच बुधवारी हे वाहन हलविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हे वाहन कुठे नेले, याबाबत संशय निर्माण हाेत आहे. गत १२ दिवसांपासून हे शासकीय वाहन लपवून ठेवले असताना आता मोर्शी आरएफओंच्या वाहनांचे लॉग बुक तपासणी करणे हे गरजचे आहे. चालक नसताना हे वाहन मोर्शी येथून अमरावतीपर्यत कोणी चालवित आणले, हा विषय संशोधनाचा आहे. आता एक-दोन दिवसात हे वाहन खासगी गॅरेजमध्ये दिसून आल्यास नवल वाटू नये, असे बोलले जात आहे.