शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात दरदिवशी एक शेतकरी आत्महत्या; कृषिमंत्री घेणार कारणांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2022 13:14 IST

विभागाची संपूर्ण यंत्रणा डेरेदाखल, ठरविणार प्रभावी धोरण

गजानन मोहोड

अमरावती : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असणाऱ्या अमरावती जिल्ह्यात खुद्द कृषिमंत्री गुरुवारी आपल्या विभागाच्या सर्व यंत्रणेसह बळीराजासोबत दिवसभर राहणार आहेत. जिल्ह्यात दरदिवशी एक शेतकरी आत्महत्या होत आहे. शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य का मात करीत आहे व यामधून शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत, याची कारणमीमांसा करून प्रभावी असे कृषी धोरण ठरविणार आहे.

दोन दशकांपासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात दरदिवसाला व विभागात दर आठ तासात एक शेतकरी मृत्यूचा घोट घेत आहे. पाच वर्षांमध्ये तत्कालीन दोन्ही शासनानी थकबाकीदार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला. साधारणपणे १,८०० कोटींची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली. तरीही आत्महत्या वाढत्याच आहेत. याची पहिल्यांदाच शासनस्तरावर दखल घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कृषिमंत्र्यांना त्यांच्या संपूर्ण यंत्रणेसह एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून यामागची कारणे शोधण्याचे व प्रभावी धोरण तयार करण्याचे आदेश दिल्याची माहिती ना. सत्तार यांनी अमरावती जिल्ह्यात २० ऑगस्टच्या दौऱ्यात दिली होती.

प्रत्येक शासनाने या दशकात शेतकरी आत्महत्याबहुल जिल्ह्यांना योजनांमध्ये झुकते माप दिले होते. मात्र, प्रशासकीय वाळवीने या योजनाच पोखरल्या. गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळालाच नाही. या अनुभवावरुन शासन आता काय धोरण ठरविते, याकडे शेतकरी आत्महत्याग्रस्त १३ जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.

दोन दशकांमध्ये १८,२७५ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

शेतकरी आत्महत्यांची नोंद जिल्हास्तरावर सन २००१पासून घेतली जाते. या कालावधीत अमरावती विभागात १८,२७५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये ८,३४३ प्रकरणात शासन मदत देण्यात आलेली आहे. यापेक्षा जास्त ९,७०५ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. अद्याप २२७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

१६ वर्षांपूर्वीच्या मदतीच्या निकषात करणार का बदल?

शेतकरी आत्महत्या प्रकरणात वारसाला देण्यात येणाऱ्या मदतीचे निकष २३ जानेवारी २००६मधील आहेत. यामध्ये ३० हजारांचा धनादेश व ७० हजार पोस्ट किंवा बँकेच्या मासिक प्राप्ती योजनेत मृत शेतकऱ्याच्या वारसाच्या नावे ठेवले जातात. याशिवाय प्रकरण मंजूर करण्यालाही कित्येक महिने लागतात.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAbdul Sattarअब्दुल सत्तारAmravatiअमरावती