शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अमरावती जिल्ह्यात दरदिवशी एक शेतकरी आत्महत्या; कृषिमंत्री घेणार कारणांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2022 13:14 IST

विभागाची संपूर्ण यंत्रणा डेरेदाखल, ठरविणार प्रभावी धोरण

गजानन मोहोड

अमरावती : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असणाऱ्या अमरावती जिल्ह्यात खुद्द कृषिमंत्री गुरुवारी आपल्या विभागाच्या सर्व यंत्रणेसह बळीराजासोबत दिवसभर राहणार आहेत. जिल्ह्यात दरदिवशी एक शेतकरी आत्महत्या होत आहे. शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य का मात करीत आहे व यामधून शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत, याची कारणमीमांसा करून प्रभावी असे कृषी धोरण ठरविणार आहे.

दोन दशकांपासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात दरदिवसाला व विभागात दर आठ तासात एक शेतकरी मृत्यूचा घोट घेत आहे. पाच वर्षांमध्ये तत्कालीन दोन्ही शासनानी थकबाकीदार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला. साधारणपणे १,८०० कोटींची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली. तरीही आत्महत्या वाढत्याच आहेत. याची पहिल्यांदाच शासनस्तरावर दखल घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कृषिमंत्र्यांना त्यांच्या संपूर्ण यंत्रणेसह एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून यामागची कारणे शोधण्याचे व प्रभावी धोरण तयार करण्याचे आदेश दिल्याची माहिती ना. सत्तार यांनी अमरावती जिल्ह्यात २० ऑगस्टच्या दौऱ्यात दिली होती.

प्रत्येक शासनाने या दशकात शेतकरी आत्महत्याबहुल जिल्ह्यांना योजनांमध्ये झुकते माप दिले होते. मात्र, प्रशासकीय वाळवीने या योजनाच पोखरल्या. गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळालाच नाही. या अनुभवावरुन शासन आता काय धोरण ठरविते, याकडे शेतकरी आत्महत्याग्रस्त १३ जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.

दोन दशकांमध्ये १८,२७५ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

शेतकरी आत्महत्यांची नोंद जिल्हास्तरावर सन २००१पासून घेतली जाते. या कालावधीत अमरावती विभागात १८,२७५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये ८,३४३ प्रकरणात शासन मदत देण्यात आलेली आहे. यापेक्षा जास्त ९,७०५ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. अद्याप २२७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

१६ वर्षांपूर्वीच्या मदतीच्या निकषात करणार का बदल?

शेतकरी आत्महत्या प्रकरणात वारसाला देण्यात येणाऱ्या मदतीचे निकष २३ जानेवारी २००६मधील आहेत. यामध्ये ३० हजारांचा धनादेश व ७० हजार पोस्ट किंवा बँकेच्या मासिक प्राप्ती योजनेत मृत शेतकऱ्याच्या वारसाच्या नावे ठेवले जातात. याशिवाय प्रकरण मंजूर करण्यालाही कित्येक महिने लागतात.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAbdul Sattarअब्दुल सत्तारAmravatiअमरावती