लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉकडाऊनच्या शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. १०० दिवसांत ९६१ व तीन दिवसांत १६६ संक्रमितांची नोंद झाल्याने चिंतेत भर पडली. सोमवारी ४७ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ९६१ झाली, तर चौघे दगावल्याने मृतांची संख्या ३४ झाली.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षक प्रयोगशाळाद्वारे प्राप्त अहवालानुसार, अतुलनगरातील २६ वर्षीय, एलआयसी कॉलनीतील ४९ वर्षीय, अंजनगाव सुर्जीतील ६५ वर्षीय, संजय गांधीनगरातील २१ वर्षीय, राजुरा बाजार येथील २६ वर्षीय व ४८ वर्षीय, भारतनगरातील ४३ वर्षीय, शेगाव नाका येथील ३० वर्षीय, मांगीलाल प्लॉट येथील १९ वर्षीय, बिच्छुटेकडी येथे ५० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. श्रीरामनगरातील २७ वर्षीय, वलगाव येथील ५३ वर्षीय, गाडगेनगर, सुकळी, हनुमाननगरातील प्रत्येकी २५ वर्षीय, शेगाव नाका येथील ६८ वर्षीय, प्रियंका कॉलनीतील ४५ वर्षीय, छत्रसाल नगरातील १६ वर्षीय, गुरुकृपा कॉलनीतील ४९ वर्षीय, दर्यापूर येथील ४५ वर्षीय, सिद्धार्थनगरातील ४६ वर्षीय, वाकी रायपूर येथील ३० वर्षीय, वल्लभनगरातील २० वर्षीय, वडाळीतील ३०, अंबा कॉलनीततील ५५ वर्षीय, सराफा लाईन येथील ३० वर्षीय, अचलपुरातील ५० वर्षीय, मोर्शी व यशोदानगरातील ४० वर्षीय, माधवनगरातील ४४ वर्षीय, बिच्छुटेकडी येथील ४९ वर्षीय व चांदूर रेल्वे येथील ५८ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सायंकाळच्या अहवालात अंजनगाव सुर्जी येथील ५० वर्षीय, श्रीकृष्ण पेठ येथील ३३ वर्षीय, श्रीकृष्ण पेठेतील २३ वर्षीय, पंजाबराव कॉलनीतील २० व ५३ वर्षीय, शेगाव नाका येथील ६२ वर्षीय, राहुलनगरात ४९, ५४ व ५९ वर्षीय, बिच्छुटेकडी येथील ३२ वर्षीय पुरुष व श्रीकृष्ण पेठेतील २५ वर्षीय, नंदनवन कॉलनीतील ४५ वर्षीय व्यक्ती, अप्पर वर्धा कॉलनीतील १३ वर्षीय बालिका व १८ वर्षीय तरुणी व अशोकनगरातील ५२ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.मृतांची संख्या ३४साबणपुरा येथील ५८ वर्षीय पॉझिटिव्ह व्यक्तीचा १९ जूनला व चपराशीपुऱ्यातील ८ जुलै रोजी पॉझिटिव्ह आलेल्या ७० वर्षीय व्यक्तीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. प्रवीणनगरातील ५५ वर्षीय महिला व चांदूर बाजार तालुक्यातील थुगाव येथील ५२ वर्षीय व्यक्तींचे सारीने निधन झाले. मात्र, त्यांचा सोमवारी पॉझिटिव्ह अहवाल आल्याने मृतांची संख्या ३४ झालेली आहे.आणखी एका खासगी रुग्णालयास परवानगी४० बेडच्या आणखी एका खासगी रुग्णालयास कोविड-१९ चे उपचार करण्यास शासनाने परवानगी दिली. डॉ. ढोले हॉस्पिटल, वलगाव येथील केंद्र व पीडीएमसी येथेही व्यवस्था केली जाईल. स्थिती बिकट झाल्यास सुपर स्पेशालिटीमध्ये फक्त क्रिटिकल रुग्णांवरच उपचार केले जातील, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
१०० दिवसांत ९६१ संक्रमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 5:00 AM
शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. १०० दिवसांत ९६१ व तीन दिवसांत १६६ संक्रमितांची नोंद झाल्याने चिंतेत भर पडली. सोमवारी ४७ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ९६१ झाली, तर चौघे दगावल्याने मृतांची संख्या ३४ झाली.
ठळक मुद्दे७२ तासांत १६६ : सोमवारी ४७ पॉझिटिव्ह, चौघांचा मृत्यू