शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

९०० आरएफओं आरपारच्या लढाईत, ११ मार्चपासून कामबंद

By गणेश वासनिक | Updated: March 8, 2024 22:02 IST

आंदोलनाचा ईशारा : वनसचिवांच्या एककल्ली धाेरणाला कडाडून विरोध

अमरावती: आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मग्रारोहयो योजनेची रसमिसळ करुन अभिसरण (टाॅप ऑप माॅडल) आणणाऱ्या वनसचिवांच्या धोरणाला वनविभागात कडाडून विरोध होत आहे. ‘टाॅप ऑप’ नकोच या भूमिकेतून वनपरिक्षेत्र अधिकारी आरपारच्या लढाईत दिसत आहे. येत्या ११ मार्चपासून कामबंद करण्याचा इशारा दिला आहे.

राज्याच्या वनविभागात वनसंरक्षण आणि संवर्धनाची कामे ही राज्य योजनेच्या माध्यमातून केली जातात. कारण मग्रारोहयो अंतर्गत मजुरांना कामावर लावण्याबाबत काही निकष असतात. महसूल विभागाकरिता मग्रारोहयो लोकांना रोजगार देण्यासाठी असून वनविभाग राज्य योजनेसह मोठ्या प्रमाणात मग्रारोहयोची कामे घेवून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देत असताना वनविभागाचे प्रधान वनसचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी तिसरीचं अर्धवट योजना वनकर्मचाऱ्यांच्या माथी मारलेली आहे. कुठलाही अभ्यास न करता. वनसचिवांनी ‘टाॅपॲप’ ही योजना सक्तीने राबविण्यास फर्मान सोडलेले आहे. यामध्ये वनविभागातील एक अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वनप्रशासनावर दडपण आणत असल्याने ‘टाॅपॲप माॅडल’ ला कडाडून विरोध होत आहे.

समितीच्या शिफारसीचं कायवनविभागात टाॅपॲप याेजना राबविताना अर्धे वेतन मग्रारोहयोच्या माध्यमातून तर उर्वरित राज्य योजनेच्या माध्यमातून दिले जाईल. ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरुवात न करता सरसकट राबविण्यावर भर दिला जात आहे. याला विरोध झाल्यानंतर एक समिती गठीत करण्यात आली. वनबलप्रमुखांनी तशी शिफारस केल्यानंतर सुविधा न पुरविता वनसचिव यावरुन आणखीचं आक्रमक झाले आहेत. अभिसरण याेजना आंध्र प्रदेशातील असून त्यांना ही पद्धत महाराष्ट्रात लागू करायची आहे. समितीने केलेल्या शिफारशी केराच्या टोपलीमध्ये टाकण्यात आल्या आहेत.अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांचा दरारावनविभागाला सध्या वनसचिव आणि एक अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक चालवित असल्याची चर्चा आहे. ‘टाॅप ॲप माॅडेल’ न राबविल्यास कारवाईची भाषा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक बोलत आहेत. या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकाला मंत्रालयातून पाठबळ असल्याने राज्यातील अन्य आयएफएस चुप्पी साधून आहेत. केवळ आरएफओ या लढाईत सहभागी असताना आयएफएस लाॅबी शांत आहे. ही योजना राबविण्यावर भर दिला जात असताना ‘टाॅपॲप माॅडेल’चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले नाही. अनुदानाची टंचाई कायम आहे.वनपरिक्षेत्राधिकारी संघटनांकडून अभिसरण योजनेला विरोध असल्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. ११ मार्चपासून कामबंद आंदाेलनाचाआरएफओंनी ईशारा दिला आहे. यासंदर्भात शासनाला माहिती कळविण्यात आली आहे.- शैलेंद्र टेभुर्णींकर, वनबल प्रमुख, नागपूर

टॅग्स :Amravatiअमरावतीforestजंगल