शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

९०० आरएफओं आरपारच्या लढाईत, ११ मार्चपासून कामबंद

By गणेश वासनिक | Updated: March 8, 2024 22:02 IST

आंदोलनाचा ईशारा : वनसचिवांच्या एककल्ली धाेरणाला कडाडून विरोध

अमरावती: आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मग्रारोहयो योजनेची रसमिसळ करुन अभिसरण (टाॅप ऑप माॅडल) आणणाऱ्या वनसचिवांच्या धोरणाला वनविभागात कडाडून विरोध होत आहे. ‘टाॅप ऑप’ नकोच या भूमिकेतून वनपरिक्षेत्र अधिकारी आरपारच्या लढाईत दिसत आहे. येत्या ११ मार्चपासून कामबंद करण्याचा इशारा दिला आहे.

राज्याच्या वनविभागात वनसंरक्षण आणि संवर्धनाची कामे ही राज्य योजनेच्या माध्यमातून केली जातात. कारण मग्रारोहयो अंतर्गत मजुरांना कामावर लावण्याबाबत काही निकष असतात. महसूल विभागाकरिता मग्रारोहयो लोकांना रोजगार देण्यासाठी असून वनविभाग राज्य योजनेसह मोठ्या प्रमाणात मग्रारोहयोची कामे घेवून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देत असताना वनविभागाचे प्रधान वनसचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी तिसरीचं अर्धवट योजना वनकर्मचाऱ्यांच्या माथी मारलेली आहे. कुठलाही अभ्यास न करता. वनसचिवांनी ‘टाॅपॲप’ ही योजना सक्तीने राबविण्यास फर्मान सोडलेले आहे. यामध्ये वनविभागातील एक अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वनप्रशासनावर दडपण आणत असल्याने ‘टाॅपॲप माॅडल’ ला कडाडून विरोध होत आहे.

समितीच्या शिफारसीचं कायवनविभागात टाॅपॲप याेजना राबविताना अर्धे वेतन मग्रारोहयोच्या माध्यमातून तर उर्वरित राज्य योजनेच्या माध्यमातून दिले जाईल. ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरुवात न करता सरसकट राबविण्यावर भर दिला जात आहे. याला विरोध झाल्यानंतर एक समिती गठीत करण्यात आली. वनबलप्रमुखांनी तशी शिफारस केल्यानंतर सुविधा न पुरविता वनसचिव यावरुन आणखीचं आक्रमक झाले आहेत. अभिसरण याेजना आंध्र प्रदेशातील असून त्यांना ही पद्धत महाराष्ट्रात लागू करायची आहे. समितीने केलेल्या शिफारशी केराच्या टोपलीमध्ये टाकण्यात आल्या आहेत.अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांचा दरारावनविभागाला सध्या वनसचिव आणि एक अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक चालवित असल्याची चर्चा आहे. ‘टाॅप ॲप माॅडेल’ न राबविल्यास कारवाईची भाषा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक बोलत आहेत. या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकाला मंत्रालयातून पाठबळ असल्याने राज्यातील अन्य आयएफएस चुप्पी साधून आहेत. केवळ आरएफओ या लढाईत सहभागी असताना आयएफएस लाॅबी शांत आहे. ही योजना राबविण्यावर भर दिला जात असताना ‘टाॅपॲप माॅडेल’चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले नाही. अनुदानाची टंचाई कायम आहे.वनपरिक्षेत्राधिकारी संघटनांकडून अभिसरण योजनेला विरोध असल्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. ११ मार्चपासून कामबंद आंदाेलनाचाआरएफओंनी ईशारा दिला आहे. यासंदर्भात शासनाला माहिती कळविण्यात आली आहे.- शैलेंद्र टेभुर्णींकर, वनबल प्रमुख, नागपूर

टॅग्स :Amravatiअमरावतीforestजंगल