शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

बाधित कपाशीच्या भरपाईसाठी हवेत ९०० कोटी! बुलडाणा जिल्ह्यामुळे विभागाचा प्रस्ताव रखडला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 16:05 IST

यंदाच्या खरिपात विभागातील १० लाख ७१ हजार हेक्टर कपाशी क्षेत्रापैकी किमान ९ लाख हेक्टरमधील कपाशीचे बोंडअळीमुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यासाठी किमान ९०० कोटींची मदत ‘एनडीआरएफ’मधून अपेक्षित आहे.

- गजानन मोहोड अमरावती - यंदाच्या खरिपात विभागातील १० लाख ७१ हजार हेक्टर कपाशी क्षेत्रापैकी किमान ९ लाख हेक्टरमधील कपाशीचे बोंडअळीमुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यासाठी किमान ९०० कोटींची मदत ‘एनडीआरएफ’मधून अपेक्षित आहे. विभागातील चार जिल्ह्यांचे संयुक्त अहवाल प्राप्त असताना बुलडाणा जिल्ह्याचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे. त्यामुळे शासनाला मदतीची मागणी करावयाचा विभागाचा प्रस्ताव रखडला आहे.  अमरावती विभागात यंदाच्या खरिपात ८ लाख ६० हजार शेतकºयांनी १० लाख ७१ हजार १९  हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी केली. मात्र, आॅक्टोबर महिण्यात आलेल्या गुलाबी बोंड अळीच्या संकटाने एकूण क्षेत्राच्या तुलनेत ९० टक्के म्हणजेच ९ लाख  हेक्टर क्षेत्रात कपाशीचे ३३ टक्कयांवर नुकसान झाले आहे. प्राप्त चार जिल्ह्यांतील संयुक्त अहवालानुसार यामध्ये जिरायती कपाशीचे ७ लाख २६ हजार ७७ हेक्टर तर बागायती कपाशीचे एक लाख ३४ हजार ३५८ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये जिरायतीन क्षेत्रासाठी हेक्टरी ६८०० रूपये या प्रमाणे ५०१ कोटी ८२ लाख २९ हजार तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रूपये प्रति हेक्टरप्रमाणे १८० कोटी ८७ लाख १४ हजारांची मदत आवश्यक आहे. हे नुकसान केंद्राच्या नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी पात्र आहे. बियाणे कंपन्यांकडून भरपाई व ‘एनडीआरएफ’ची मदत मिळावी, यासाठी  गुलाबी बोंडअळीने बाधित क्षेत्राच्या पंचनाम्याचे आदेश ७ डिसेंबरला विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी पाचही जिल्ह्यधिकाºयांना देऊन अहवाल मागविला. ५ डिसेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कपाशी पीकबाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करून केंद्राच्या एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या अनुषंगाने कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व तुडतुड्यांमुळे बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाचे उपसचिव सु.ह. उमरीकर यांनी दिले होते. या अनुषंगाने पाचही जिल्हाधिकाºयांनी संबंधित तहसीलदार, बीडीओ व तालुका कृषी अधिकाºयांना संयुक्त अहवाल मागविला होता. सद्यस्थितीत बुलडाणा वगळता सर्व जिल्ह्यांचे संयुक्त अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास प्राप्त आहेत.

 विभागातील कपाशीचे नुकसान, आवश्यक मदत- अमरावती जिल्ह्यात २,२०,२६५ शेतकºयांच्या १,९९,१७३ हेक्टरमधील कपाशीचे  नुकसान झाले. यासाठी १८२.६० कोटींची मदत अपेक्षित आहे.- अकोला जिल्ह्यात १,३३,६६८ शेतकºयांच्या १,४३,४८१ हेक्टरमधील कपाशीचे नुकसान झाले, यासाठी १३५.५१ कोटींची मदत अपेक्षित आहे.-  यवतमाळ जिल्ह्यात ३,५८,४८५ शेतकºयांच्या ४,९४,५७५ हेक्टरमधील कपाशीचे नुकसान झाले, यासाठी ३४९.१७ कोटींची भरपाई अपेक्षित आहे.-  वाशिम जिल्ह्यात २२,५११ शेतकºयांच्या २३,२०७ हेक्टरमधील कपाशी बोंडअळीने बाधित झाल्याने १५.४० कोटींची मदत आवश्यक आहे.