शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
4
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
5
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
6
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
7
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
8
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
9
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
10
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
11
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
12
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
13
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
14
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
15
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
16
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
17
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
18
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
19
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
Daily Top 2Weekly Top 5

बाधित कपाशीच्या भरपाईसाठी हवेत ९०० कोटी! बुलडाणा जिल्ह्यामुळे विभागाचा प्रस्ताव रखडला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 16:05 IST

यंदाच्या खरिपात विभागातील १० लाख ७१ हजार हेक्टर कपाशी क्षेत्रापैकी किमान ९ लाख हेक्टरमधील कपाशीचे बोंडअळीमुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यासाठी किमान ९०० कोटींची मदत ‘एनडीआरएफ’मधून अपेक्षित आहे.

- गजानन मोहोड अमरावती - यंदाच्या खरिपात विभागातील १० लाख ७१ हजार हेक्टर कपाशी क्षेत्रापैकी किमान ९ लाख हेक्टरमधील कपाशीचे बोंडअळीमुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यासाठी किमान ९०० कोटींची मदत ‘एनडीआरएफ’मधून अपेक्षित आहे. विभागातील चार जिल्ह्यांचे संयुक्त अहवाल प्राप्त असताना बुलडाणा जिल्ह्याचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे. त्यामुळे शासनाला मदतीची मागणी करावयाचा विभागाचा प्रस्ताव रखडला आहे.  अमरावती विभागात यंदाच्या खरिपात ८ लाख ६० हजार शेतकºयांनी १० लाख ७१ हजार १९  हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी केली. मात्र, आॅक्टोबर महिण्यात आलेल्या गुलाबी बोंड अळीच्या संकटाने एकूण क्षेत्राच्या तुलनेत ९० टक्के म्हणजेच ९ लाख  हेक्टर क्षेत्रात कपाशीचे ३३ टक्कयांवर नुकसान झाले आहे. प्राप्त चार जिल्ह्यांतील संयुक्त अहवालानुसार यामध्ये जिरायती कपाशीचे ७ लाख २६ हजार ७७ हेक्टर तर बागायती कपाशीचे एक लाख ३४ हजार ३५८ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये जिरायतीन क्षेत्रासाठी हेक्टरी ६८०० रूपये या प्रमाणे ५०१ कोटी ८२ लाख २९ हजार तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रूपये प्रति हेक्टरप्रमाणे १८० कोटी ८७ लाख १४ हजारांची मदत आवश्यक आहे. हे नुकसान केंद्राच्या नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी पात्र आहे. बियाणे कंपन्यांकडून भरपाई व ‘एनडीआरएफ’ची मदत मिळावी, यासाठी  गुलाबी बोंडअळीने बाधित क्षेत्राच्या पंचनाम्याचे आदेश ७ डिसेंबरला विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी पाचही जिल्ह्यधिकाºयांना देऊन अहवाल मागविला. ५ डिसेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कपाशी पीकबाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करून केंद्राच्या एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या अनुषंगाने कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व तुडतुड्यांमुळे बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाचे उपसचिव सु.ह. उमरीकर यांनी दिले होते. या अनुषंगाने पाचही जिल्हाधिकाºयांनी संबंधित तहसीलदार, बीडीओ व तालुका कृषी अधिकाºयांना संयुक्त अहवाल मागविला होता. सद्यस्थितीत बुलडाणा वगळता सर्व जिल्ह्यांचे संयुक्त अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास प्राप्त आहेत.

 विभागातील कपाशीचे नुकसान, आवश्यक मदत- अमरावती जिल्ह्यात २,२०,२६५ शेतकºयांच्या १,९९,१७३ हेक्टरमधील कपाशीचे  नुकसान झाले. यासाठी १८२.६० कोटींची मदत अपेक्षित आहे.- अकोला जिल्ह्यात १,३३,६६८ शेतकºयांच्या १,४३,४८१ हेक्टरमधील कपाशीचे नुकसान झाले, यासाठी १३५.५१ कोटींची मदत अपेक्षित आहे.-  यवतमाळ जिल्ह्यात ३,५८,४८५ शेतकºयांच्या ४,९४,५७५ हेक्टरमधील कपाशीचे नुकसान झाले, यासाठी ३४९.१७ कोटींची भरपाई अपेक्षित आहे.-  वाशिम जिल्ह्यात २२,५११ शेतकºयांच्या २३,२०७ हेक्टरमधील कपाशी बोंडअळीने बाधित झाल्याने १५.४० कोटींची मदत आवश्यक आहे.