शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पाच जिल्ह्यांतील ८ हजार ८७ पाणी नमुने रसायनयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 18:30 IST

: रासायनिक, अनुजीव तपासणीचा अहवाल - वैभव बाबरेकर अमरावती : विभागाच्या पाच जिल्ह्यांतील पाणी तपासणीच्या अहवालात यवतमाळ जिल्ह्याचे पाणीनमुने सर्वाधिक दूषित आढळून आले असून, अमरावती दुसºया क्रमांकावर आहे. यवतमाळातील ६ हजार ७९२ पाणीनमुन्यांची रासायनिक तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये तब्बल ४ हजार ३६२ नमुने दूषित आढळले आलेट. अमरावतीमधील ५ हजार ४८८ पाणी ...

: रासायनिक, अनुजीव तपासणीचा अहवाल - वैभव बाबरेकर अमरावती : विभागाच्या पाच जिल्ह्यांतील पाणी तपासणीच्या अहवालात यवतमाळ जिल्ह्याचे पाणीनमुने सर्वाधिक दूषित आढळून आले असून, अमरावती दुसºया क्रमांकावर आहे. यवतमाळातील ६ हजार ७९२ पाणीनमुन्यांची रासायनिक तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये तब्बल ४ हजार ३६२ नमुने दूषित आढळले आलेट. अमरावतीमधील ५ हजार ४८८ पाणी नमुन्यांच्या तपासणीत २ हजार ४२५ नमुने दूषित आढळले आहेत.  सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस सुरू असून, या कालावधीत दूषित पाणीपुरवठा सर्वाधिक होतो. पाण्यात रासायनिक तत्त्व असल्यास, ते पाणी दूषित असल्याचे स्पष्ट होते. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने १ एप्रिल ते ३० जुलै दरम्यान पाच जिल्ह्यांतील पाणीनमुन्यांची रासायनिक तपासणी केली.  त्यात पाचही जिल्ह्यांतून तब्बल १९ हजार २७४ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी तब्बल ८ हजार ८७ नमुने दूषित (अनफिट) आढळून आले. रसायनयुक्त पाणी पिण्यास अयोग्य असून, या रसायनयुक्त पाण्याचे घातक परिणाम मानवी शरीरावर होते. वारंवार हे दूषित पाणी पिण्यात आल्यास किडनी व लिव्हरवर परिणाम होते. सोबत अशा दूषित पाण्यामुळे दात खराब होणे, हाडे ठिसूळ होणे व त्वचारोग होण्याची दाट शक्यता असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांचे आहे. अशा दूषित पाण्यामुळे विभागातील पाचही जिल्ह्यांत विविध आजारांचे रुग्ण वाढले असून, शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णांचा ओघ सुरू असल्याचे आढळून आले आहे. दूषित पाण्यावर उपाययोजनेसाठी प्रशासनाचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे चित्र पाचही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. 

पाणी नमुन्यात तपासली जातात ही रसायने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे प्राप्त झालेल्या पाणीनमुन्यात नायट्रेट, टीडीएस (टोटल डिझॉल्व्ह्ड सॉलिड), क्लोराइड, फ्लोराइड, टोटल हार्डनेस, अल्कनिटी, पीएच, आर्यन, सल्फेटचे अवशेष आहेत का, हे तपासले जाते. यापैकी कोणतेही रसायन आढळल्यास ते पाणी दूषित (अनफिट) ठरविले जाते. वर नमूद केलेल्या दूषित पाण्यात यापैकी काही रसायने आढळून आली आहे. त्यामध्ये पाण्यात नायट्रेटचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती जीएसडीने दिली आहे. 

दूषित पाण्यात यवतमाळ अव्वलविभागातील पाच जिल्ह्यांतील १९ हजार २७४ पाणी नमुन्यांपैकी ८ हजार ८७ नमुने दूषित आढळले. त्यामध्ये अमरावतीमधील ५ हजार ४८८ पाणीनमुन्यांच्या तपासणीत २ हजार ४२५ दूषित आहेत. त्याच प्रमाणे अकोला येथील १ हजार ८७८ नमुन्यांपैकी तब्बल १ हजार २८ नमुने दूषित, यवतमाळातील ६ हजार ७९२ पैकी २ हजार ४४०, वाशिम येथील ८४८ पैकी २१५, तर बुलडाणा येथील ४ हजार २६८ पैकी १ हजार ९८९ नमुने दूषित आढळले. 

रसायनयुक्त पाणी किडनी व लिव्हरवर परिणाम करते. मध्यंतरी यवतमाळात किडनीचे रुग्ण वाढले होते. अशा दूषित पाण्यामुळे किडनी स्टोन हे एक कारण असू शकते. अशा रुग्णांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. - श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, इर्विन रुग्णालय.

टॅग्स :WaterपाणीAmravatiअमरावती