शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

प्रक्रियेअभावी शेतकऱ्यांचे ६९ कोटी शासनाकडे पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 15:03 IST

Amravati : शेतकऱ्यांशी संपर्क करण्याचे दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क धामणगाव रेल्वे : आपत्तीच्या काळात शासनाद्वारे बाधित शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जातो. यामध्ये सन २०२२ पासून १२ वेळा शासनाने मदतनिधी उपलब्ध केला आहे. परंतु, ८५ हजार शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक (व्हीके) प्राप्त असतानाही त्यांनी ई केवायसी केलेली नाही. त्यामुळे ६९ कोटींचा निधी शासनाकडे पडून आहे. या शेतकऱ्यांशी संपर्क करून त्यांना शासन निधीचा लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

ई-केवायसी झाल्यानंतरच नुकसान भरपाईची रक्कम संबंधित शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रलंबित ई-केवायसीचे काम मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी आढावा बैठकीत दिले आहेत.

अतिवृष्टी, गारपीट, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाते. भरपाईची रक्कम डीबीटीद्वारे संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येते. अनेक शेतकऱ्यांचे खाते आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी नसल्याने सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे महसूल व कृषी यंत्रणेद्वारे संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क करून प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

या कारणांमुळे ई- केवायसी प्रलंबितअमरावती विभागात २४,४२,२८४ शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली असून, ७४,८०८ शेतकऱ्यांची ई-केवायसी विविध कारणांमुळे प्रलंबित आहे. बोटांचे ठसे न उमटणे, मृत शेतकरी, ठिकाण बदलून गेलेले शेतकरी, आदी तांत्रिक कारणांमुळे ई-केवायसी होणे बाकी आहे, अशा शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात येणार आहे.

प्रक्रियेअभावी प्रलंबित शासन निधीजून व जुलै २०२२ मधील पावसाचे नुकसान १०.६६ कोटी, ३१ मार्च २०२३ मधील अवकाळीचे ४.८५ लाख, ७ एप्रिल २०२३ रोजी अवकाळी १२.७० लाख, ८ ते ३० एप्रिल २०२३ अवकाळीचे १.०६ कोटी, में २०२३ अवकाळीचे ८९ लाख, सप्टेंबर २०२२ अतिवृष्टीचे ७० लाख, मार्च २०२३ अवकाळीचे ३० लाख, सप्टेंबर २०२३ अतिवृष्टीचे ३.२४ कोटी, जून व जुलै २०२२ अतिवृष्टीचे १.५९ कोटी, नोव्हेंबर २०२३ अवकाळीचे ३२.८१ कोटी, जुलै २०२३ अतिवृष्टीचे ६.३४ कोटी, २०२२ फळपीक अनुदानाचे ५.८७ कोटी पडून आहेत. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावती