शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

वर्षभरात ६२ हजार ५१ मजुरांच्या हाताला कामे मिळाले

By admin | Updated: April 2, 2016 00:07 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्र्रामीण रोजगार हमी योजनेची जिल्ह्यात सन २०१५ मध्ये १०७ टक्के कामे झाली आहेत.

उद्दिष्ट्यपूर्ती : प्रशासनाने गाठले १०७ टक्के लक्ष्यअमरावती : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्र्रामीण रोजगार हमी योजनेची जिल्ह्यात सन २०१५ मध्ये १०७ टक्के कामे झाली आहेत. या माध्यमातून वर्षभरात जिल्ह्यात ६२ हजार ५१ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. निमिर्तीच्या सुमारे ४८.५२ मनुष्यदिवसांच्या उद्दिष्टांपैकी सद्य:स्थितीत ५३.६५ लक्ष मनुष्यदिवसाची निर्मिती गाठण्यात प्रशासनाला यश आले आहे.रोजगार नसलेल्यांसाठी वर्षातील किमान ठराविक दिवस रोगजार हमी देणारी ही योजना रोजगार पुरविणारी योजना म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या व प्रभावीपणे चालविलेल्या योजनांपैकी ही एक योजना आहे. योजनेंतर्गत केंद्र शासन १०० दिवस प्रतिकुटंूब रोजगाराची हमी देते. १०० दिवस प्रती कुटंूब मजुरांच्या खर्चासाठी निधी पुरवते. प्रतीकुटंूब शंभर दिवसावरील प्रत्येक मजुरांच्या खर्चाचा आर्थिक भार राज्य शासन उचलते. या महत्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात झालेल्या कामावरून लक्षात येते. रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने जिल्ह्यात चांगले काम झाले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्ह्यात रोहयो अंतर्गत सिंचन विहिरी, बंधारे, मातीनाला बांध, शेततळे, नाला सरळीकरण व खोलीकरणासह अन्य कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आली आहेत. यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. रोहयो खर्चात जिल्हा आघाडीवररोजगार हमी योजनेंतर्गत ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात सुमारे १३९ कोटी १४ लाख इतका खर्च करण्यात आला आहे. मागील वर्षी सन २०१४-१५ मध्ये हाच खर्च जिल्ह्यात १०५ कोटी रूपये करण्यात आला होता. यामध्ये यंदा वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्हाधिकारी, रोहयो उपजिल्हाधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार हमी योजनेचे अचूक नियोजन केल्याने हे शक्य झाले आहे. चालू वर्षातही अशीच कामे करण्याचा आमचा मानस आहे. नागरिकांनी कामे निवडून ग्रामसेभतून मंजूर कामाचे प्रस्ताव सादर करावे. यासर्व कामासाठी सर्वाचे सहकाऱ्यांची ही फलश्रुती आहे.- उन्मेश देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, रोहयो विभाग जि.प.