शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

जिल्ह्यातील ६२ तलाव कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2016 00:08 IST

यंदा सरासरीपेक्षा अल्प झालेल्या पावसामुळे उन्हांचा पारा वाढण्यापूर्वीच जिल्ह्यातील ६२ सिंचन तालव कोरडे पडले आहेत़ ....

दुष्काळाची झळ : गुरे, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती मोहन राऊ त धामणगाव रेल्वेयंदा सरासरीपेक्षा अल्प झालेल्या पावसामुळे उन्हांचा पारा वाढण्यापूर्वीच जिल्ह्यातील ६२ सिंचन तालव कोरडे पडले आहेत़ त्यांत पाणीच नसल्यामुळे चरायला गेलेली गुरे व वण्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे़ ही स्थिती मार्च एंडिंग असल्यामुळे आगामी मे महिन्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे़जिल्ह्यात जिल्हा परिषदेंतर्गत ६५ सिंचन तलाव आहेत़ या तलावांची खोली सरासरी अडीच मीटर ते चार मीटरपर्यंत करण्यात आली आहे़ यंदाच्या पावसाळ्यात ११ तलाव केवळ १०० टक्के भरले होते, तर १७ तलाव ६० टक्क्यांवर तसेच २० तलावांत ५० टक्के जलसाठा, ८ तलावांत २५ टक्के व ४ तलावांत १० टक्केच जलसाठा नोव्हेंबर महिन्यापर्यंत होता. आता या तलावांतील जलसाठा पूर्णत: संपला असून सध्या यातील अनेक तलाव कोरडे पडले आहेत़ गावातील जनावरे सकाळी चरायला गेल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी या तलावाचा मोठा आधार त्यांना मिळत असत. विशेषत: जंगलातील वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता. आता तलावात पाणीच नसल्यामुळे या वन्यप्राण्यांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे़धारणी तालुक्यात असलेल्या १९तलावापैकी केवळ चार तलावात २० टक्के पाणीसाठा आहेत़, तर दुसऱ्या क्रमांकाचे तिवसा तालुक्यात असलेल्या ११ तलावांपैकी केवळ दिवाणखेड या तलावात एक मीटर जलसाठा आहे़ अमरावती, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील प्रत्येकी पाच तलावांतील पाणीसाठा संपला तर चांदूरबाजार मोर्शी या तालुक्यातील प्रत्येकी तीन लघु सिंचन तलावात केवळ दीड टक्के जलसाठा, वरूड तालुक्यातील सहा लघु सिंचन तलावांचीदेखील हीच स्थिती असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे़