शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

जिल्ह्यातील ६२ तलाव कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2016 00:08 IST

यंदा सरासरीपेक्षा अल्प झालेल्या पावसामुळे उन्हांचा पारा वाढण्यापूर्वीच जिल्ह्यातील ६२ सिंचन तालव कोरडे पडले आहेत़ ....

दुष्काळाची झळ : गुरे, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती मोहन राऊ त धामणगाव रेल्वेयंदा सरासरीपेक्षा अल्प झालेल्या पावसामुळे उन्हांचा पारा वाढण्यापूर्वीच जिल्ह्यातील ६२ सिंचन तालव कोरडे पडले आहेत़ त्यांत पाणीच नसल्यामुळे चरायला गेलेली गुरे व वण्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे़ ही स्थिती मार्च एंडिंग असल्यामुळे आगामी मे महिन्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे़जिल्ह्यात जिल्हा परिषदेंतर्गत ६५ सिंचन तलाव आहेत़ या तलावांची खोली सरासरी अडीच मीटर ते चार मीटरपर्यंत करण्यात आली आहे़ यंदाच्या पावसाळ्यात ११ तलाव केवळ १०० टक्के भरले होते, तर १७ तलाव ६० टक्क्यांवर तसेच २० तलावांत ५० टक्के जलसाठा, ८ तलावांत २५ टक्के व ४ तलावांत १० टक्केच जलसाठा नोव्हेंबर महिन्यापर्यंत होता. आता या तलावांतील जलसाठा पूर्णत: संपला असून सध्या यातील अनेक तलाव कोरडे पडले आहेत़ गावातील जनावरे सकाळी चरायला गेल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी या तलावाचा मोठा आधार त्यांना मिळत असत. विशेषत: जंगलातील वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता. आता तलावात पाणीच नसल्यामुळे या वन्यप्राण्यांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे़धारणी तालुक्यात असलेल्या १९तलावापैकी केवळ चार तलावात २० टक्के पाणीसाठा आहेत़, तर दुसऱ्या क्रमांकाचे तिवसा तालुक्यात असलेल्या ११ तलावांपैकी केवळ दिवाणखेड या तलावात एक मीटर जलसाठा आहे़ अमरावती, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील प्रत्येकी पाच तलावांतील पाणीसाठा संपला तर चांदूरबाजार मोर्शी या तालुक्यातील प्रत्येकी तीन लघु सिंचन तलावात केवळ दीड टक्के जलसाठा, वरूड तालुक्यातील सहा लघु सिंचन तलावांचीदेखील हीच स्थिती असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे़