शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

जिल्ह्यातील ६२ सिंचन तलाव 'ओव्हरफ्लो'

By admin | Updated: July 19, 2016 00:25 IST

यंदा दोन दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टी व सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने जिल्ह्यातील ६२ सिंचन ओव्हर फ्लो झाले आहेत़ ...

अतिवृष्टीचा परिणाम : प्राणीमात्रांना दिलासामोहन राऊत अमरावतीयंदा दोन दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टी व सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने जिल्ह्यातील ६२ सिंचन ओव्हर फ्लो झाले आहेत़ या तलावांतील पाण्याचा लाभ आगामी काळात सिंचन व जनावराची तहान भागविण्यासाठी होणार आहे़जिल्ह्यात जिल्हापरिषद अंतर्गत ६५ सिंचन तलाव आहेत़ या तलावाची खोली सरासरी अडीच मीटर ते चार मीटर पर्यंत आहे़ गतवर्षी पाऊस कमी पडल्यामुळे केवळ पावसाळ्यात अकरा तलाव १०० टक्के भरले होते, तर १७ तलाव ६० टक्क्यांवर तसेच २० तलावांत ५० टक्के, ८ तलावांत २५ टक्के व ४ तलावांत १० टक्के जलसाठा होता़ या तलावातील जलसाठा नोव्हेंबर महिन्यातच पूर्णत: संपला होता़ त्यानंतर तलाव कोरडे होऊन मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती़ परिणामी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळी आली होती.मागील आठवड्यात जिल्ह्यातील चिखलदरा, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, दर्यापूर या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला़ त्यामुळे या भागातील सिंचनाचे तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत़ या भागातील गावातील जनावरे सकाळी चरायला गेल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी या तलावाचा मोठा आधार मिळणार आहे़ विशेषत: जंगलातील वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होणार आहे़धारणी तालुक्यात असलेल्या १९ तलावांच्या पाण्याची पातळी वाढली आहे़, तर दुसऱ्या क्रमांकावर तिवसा तालुक्यात असलेल्या ११ तलावात अधिक जलसाठा निर्माण झाला आहे़ अमरावती, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील प्रत्येकी पाच तलावातील पाणीसाठा वाढला तर चांदूर बाजार मोर्शी या तालुक्यातील प्रत्येकी तीन लघुसिंचन तलावात अधिक जलसाठा निर्माण झाला आहे़ वरूड तालुक्यातील सहा लघुसिंचन तलावाची हीच स्थिती असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे.