शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

सौर ऊर्जेद्वारा ६२ एकरात सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:50 IST

मेळघाटातील दिया गावात जलसंपदा विभागाच्यावतीने एक आगळावेगळा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला. यामध्ये सौर ऊर्जेवर सिपना नदीचे पाणी पंपाच्या साहाय्याने टेकडीवरील शेततळ्यात नेण्यात आले व येथून पाइप लाइनने शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचविले. संरक्षित सिंचनाच्या यशस्वी प्रयोगामुळे शेतकरी उन्हाळी हंगामातही पीक घेत आहेत.

ठळक मुद्देप्रकल्प यशस्वी : टेकडीवर नेले पाणी, आदिवासी बांधवांनी केली पेरणी

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटातील दिया गावात जलसंपदा विभागाच्यावतीने एक आगळावेगळा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला. यामध्ये सौर ऊर्जेवर सिपना नदीचे पाणी पंपाच्या साहाय्याने टेकडीवरील शेततळ्यात नेण्यात आले व येथून पाइप लाइनने शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचविले. संरक्षित सिंचनाच्या यशस्वी प्रयोगामुळे शेतकरी उन्हाळी हंगामातही पीक घेत आहेत.दिया येथे २३ लाखांच्या या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी निवडक आदिवासी व दारिद्ररेषेखालील लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. पाणी वापर संस्था स्थापन करून टेकडी व उतारपाट शेती कसणाºया या शेतकºयांच्या छोट्या गटासाठी टेकडीवर शेततळे तयार करण्यात आले. सौर ऊर्जा युनिट स्थापित झाल्यानंतर गावाजवळून वाहणाºया सिपना नदीतून पाइप लाइनने ते पाणी अपलिफ्ट करून शेततळ्यात साठविले. निवडलेल्या आदिवासी शेतकºयांच्या शेतीसाठी टेकडीवरून पाइप लाइनने सिंचनासाठी पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे आदिवासी शेतकºयांना उन्हाळ्यातही पेरणी करता आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरूड तालुक्याला नुकत्याच दिलेल्या भेटीदरम्यान दिया गावात राबविण्यात आलेल्या प्रकल्पाचा भाषणात आवर्जून उल्लेख केला होता, हे विशेष!जिल्हाधिकाऱ्यांनी दिली पाच प्रकल्पांना मंजुरीजेथे पाण्याचा स्रोत आहे, तेथून सौर ऊर्जेचा वापर करून पंपाने पाणी उंच टेकडीवर नेणे, या ठिकाणी शेततळे तयार करून त्यामध्ये पाणी सोडणे, गुरूत्वबलाने पाइप लाइनने ते आदिवासी बांधवांच्या शेतापर्यंत नेऊन शेतीला संरक्षित सिंचन देण्यात येते. कढाव (२९.३२ लाख), उतावली (२७.३५ लाख), गौलखेडा (२८.०४ लाख), गोंडवाडी (२६.९३ लाख), मोनाबर्डी (२९.२० लाख) अशा पाच प्रकल्पांना जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी मंजुरी दिली आहे.दिया गावाचा प्रकल्प यशस्वी झाला. यामुळे ६२ एकर शेतीला सिंचन मिळणार आहे. असे पाच गावात सौर ऊर्जेवर प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याकरिता जिल्हाधिकाºयांनी मंजुरी दिली आहे.- रमेश ढवळे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग