शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

६० कोटींचे दुष्काळी अनुदान वाटप बाकी

By admin | Updated: March 17, 2017 00:16 IST

खरीप २०१५ मध्ये अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या टंचाई स्थितीची भरपाई करण्यासाठी शासनाने कपाशी

खरीप २०१५ साठी मदत : चांदूरबाजार तालुक्यात १०० टक्के वाटप अमरावती : खरीप २०१५ मध्ये अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या टंचाई स्थितीची भरपाई करण्यासाठी शासनाने कपाशी व सोयाबीन पिकांचा विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना विमा जाहीर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात मदत देण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने जिल्ह्यात जानेवारी २०१७ मध्ये १०९ कोटी उपलब्ध केले. मात्र यापैकी ६० कोटीचा निधी अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेला नाही. अमरावती जिल्ह्यात पीक विमा न काढलेल्या एक लाख ९६ हजार ९०८ कपाशी व सोयाबीन उत्पादकांसाठी दोन लाख ४७ हजार ८९६ क्षेत्रासाठी १०९ कोटी ३६ लाख रुपये १० जानेवारीला वितरित केले होते. दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समितींची सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महसूलची यंत्रणा कार्यरत होती. त्यामुळे निधी वाटप रखडले. मात्र या आठवड्यात हा दुष्काळ निधी वाटपाचा वेग वाढला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारपर्यंत जिल्ह्यात ६५ हजार ४१७ शेतकऱ्यांना ३९ हजार ८० हेक्टर क्षेत्रासाठी ४९ कोटी ९४ लाख ३३ हजार ५०६ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ७२४७ शेतकऱ्यांना ५ कोटी १४ लाख ८० हजार, भातकुली ६५१२ शेतकऱ्यांना ३ कोटी ३७ लाख ८८ हजार, तिवसा ५०१९ शेतकऱ्यांना ४ कोटी ३७ लाख ९३ हजार, नांदगाव ८९५६ शेतकऱ्यांना ६ कोटी ४८ लाख ३० हजार, चांदूररेल्वे ५२९६ शेतकऱ्यांना ७ कोटी ७० लाख, धामणगाव ४६१९ शेतकऱ्यांना दोन कोटी ३६ लाख, मोर्शी ५६१२ शेतकऱ्यांना ४ कोटी ४५ लाख, वरूड ४६७ शेतकऱ्यांना १८ लाख ७१ हजार, अचलपूर २८६० शेतकऱ्यांना २ कोटी ५६ लाख ७६ हजार, चांदूरबाजार ३९७८ शेतकऱ्यांना २ कोटी १४ लाख १२ हजार, दर्यापूर ३६५९ शेतकऱ्यांना २ कोटी ४ लाख ३१ हजार, अंजनगाव सुर्जी २९८७ शेतकऱ्यांना ४ कोटी ६२ लाख ५८ हजार, धारणी ४२८७ शेतकऱ्यांना २ कोटी ६ लाख १९ हजार व चिखलदरा तालुक्यात ३९१८ शेतकऱ्यांना २ कोटी ४१ लाख ६२ हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) अनुदान वाटपाचा ४५.६६ टक्का सद्यस्थितीत अनुदान वाटपाचा टक्का ४५.६६ आहे. यामध्ये चांदूरबाजार तालुक्यात १०० टक्के अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. अमरावती तालुक्यात ३९ टक्के, भातकुली २६, तिवसा ६२, नांदगाव ३७, चांदूररेल्वे ६३, धामणगाव २८, मोर्शी ५६, वरूड ५१, अचलपूर ६२, दर्यापूर ४५.१३, अंजनगाव सुर्जी ७७, धारणी २७ व चिखलदरा तालुक्यात ४७ टक्के वाटप करण्यात आले आहे.