शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

६० कोटींचे दुष्काळी अनुदान वाटप बाकी

By admin | Updated: March 17, 2017 00:16 IST

खरीप २०१५ मध्ये अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या टंचाई स्थितीची भरपाई करण्यासाठी शासनाने कपाशी

खरीप २०१५ साठी मदत : चांदूरबाजार तालुक्यात १०० टक्के वाटप अमरावती : खरीप २०१५ मध्ये अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या टंचाई स्थितीची भरपाई करण्यासाठी शासनाने कपाशी व सोयाबीन पिकांचा विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना विमा जाहीर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात मदत देण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने जिल्ह्यात जानेवारी २०१७ मध्ये १०९ कोटी उपलब्ध केले. मात्र यापैकी ६० कोटीचा निधी अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेला नाही. अमरावती जिल्ह्यात पीक विमा न काढलेल्या एक लाख ९६ हजार ९०८ कपाशी व सोयाबीन उत्पादकांसाठी दोन लाख ४७ हजार ८९६ क्षेत्रासाठी १०९ कोटी ३६ लाख रुपये १० जानेवारीला वितरित केले होते. दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समितींची सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महसूलची यंत्रणा कार्यरत होती. त्यामुळे निधी वाटप रखडले. मात्र या आठवड्यात हा दुष्काळ निधी वाटपाचा वेग वाढला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारपर्यंत जिल्ह्यात ६५ हजार ४१७ शेतकऱ्यांना ३९ हजार ८० हेक्टर क्षेत्रासाठी ४९ कोटी ९४ लाख ३३ हजार ५०६ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ७२४७ शेतकऱ्यांना ५ कोटी १४ लाख ८० हजार, भातकुली ६५१२ शेतकऱ्यांना ३ कोटी ३७ लाख ८८ हजार, तिवसा ५०१९ शेतकऱ्यांना ४ कोटी ३७ लाख ९३ हजार, नांदगाव ८९५६ शेतकऱ्यांना ६ कोटी ४८ लाख ३० हजार, चांदूररेल्वे ५२९६ शेतकऱ्यांना ७ कोटी ७० लाख, धामणगाव ४६१९ शेतकऱ्यांना दोन कोटी ३६ लाख, मोर्शी ५६१२ शेतकऱ्यांना ४ कोटी ४५ लाख, वरूड ४६७ शेतकऱ्यांना १८ लाख ७१ हजार, अचलपूर २८६० शेतकऱ्यांना २ कोटी ५६ लाख ७६ हजार, चांदूरबाजार ३९७८ शेतकऱ्यांना २ कोटी १४ लाख १२ हजार, दर्यापूर ३६५९ शेतकऱ्यांना २ कोटी ४ लाख ३१ हजार, अंजनगाव सुर्जी २९८७ शेतकऱ्यांना ४ कोटी ६२ लाख ५८ हजार, धारणी ४२८७ शेतकऱ्यांना २ कोटी ६ लाख १९ हजार व चिखलदरा तालुक्यात ३९१८ शेतकऱ्यांना २ कोटी ४१ लाख ६२ हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) अनुदान वाटपाचा ४५.६६ टक्का सद्यस्थितीत अनुदान वाटपाचा टक्का ४५.६६ आहे. यामध्ये चांदूरबाजार तालुक्यात १०० टक्के अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. अमरावती तालुक्यात ३९ टक्के, भातकुली २६, तिवसा ६२, नांदगाव ३७, चांदूररेल्वे ६३, धामणगाव २८, मोर्शी ५६, वरूड ५१, अचलपूर ६२, दर्यापूर ४५.१३, अंजनगाव सुर्जी ७७, धारणी २७ व चिखलदरा तालुक्यात ४७ टक्के वाटप करण्यात आले आहे.