शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
4
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
5
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
6
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
7
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
8
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
9
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
10
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
11
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
12
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
13
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
14
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
15
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
16
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
17
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
18
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
19
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
20
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून खोदल्या ६० बोअरवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 01:27 IST

गाव पातळीवर पाणी समस्येचे निराकरण करण्याकरिता गटागटाने एकत्र येऊन लोकांनी लोकांकरिता, लोकसहभागातून गावात चक्क ६० हून अधिक बोअरवेलची निर्मिती केली आहे. यातून स्वत:ची पाणी समस्या त्यांनी स्वत:च सोडवली आहे. गावात इतरांनाही ती सहायक ठरली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । पाणीटंचाईवर अशीही मात, स्वत:च बनविली पाणी वापर संहिता

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : गाव पातळीवर पाणी समस्येचे निराकरण करण्याकरिता गटागटाने एकत्र येऊन लोकांनी लोकांकरिता, लोकसहभागातून गावात चक्क ६० हून अधिक बोअरवेलची निर्मिती केली आहे. यातून स्वत:ची पाणी समस्या त्यांनी स्वत:च सोडवली आहे. गावात इतरांनाही ती सहायक ठरली आहे. लोकसहभागातून काय करणे शक्य आहे, याचे उत्तम उदाहरण शिंदीवासीयांनी समाजासमोर ठेवले आहे.अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. या आठ हजार लोकसंख्येच्या गावात लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तीनही बोअरवेलची पाणी पातळी खोल गेली आहे. मागील काही वर्षांपासून ही पाणी समस्या कायम आहे. यातून मार्ग काढण्याकरिता गावकरी स्वत: पुढे आलेत. १० ते १५ लोकांचा एक गट या प्रमाणे त्यांनी गट केलेत. प्रत्येक गटाने बोअरवेलकरिता आपसात स्वतंत्र वर्गणी केली. बोअरवेल पूर्ण करून घराघरांत पाणी घेताना येणारा खर्च वाटून घेतला.तीन ते चार वर्षांपासून या गटनिर्मितीतून बोअरवेल निर्मितीच्या प्रक्रियेने शिंदी बु. मध्ये वेग पकडला. यातून ५ हजार लोक आत्मियतेने जुळले गेले. ज्यांच्याकडे जागा असेल त्यांच्या अंगणात आणि ज्या गटाकडे जागा नसेल त्यांनी रस्त्याच्या कडेला घराशेजारी सामूहिक बोअरवेल घेतल्या आहेत.अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. येथे लोकसहभागातील ६० बोअरवेल आहेत. यात सरासरी १५ लोकांच्या एका गटाने एका बोअरवेलची निर्मिती केली. गावातील ६० बोअरवेलने गावातील पाच हजाराहून अधिक लोकांना पाणी उपलब्ध करून दिले आहे.पाणी वापर संहितापाणीटंचाईवर मात करण्यारिता लोकसभागातून ग्रामस्थांनी बोअरवेल खोदून पाणी उपलब्ध करून घेतले असते. परंतु या बोअरवेलचे पाणी वापरण्याकरिता त्यांनी स्वत: पाणी वापर संहिता अंगिकारली आहे. यात गरजेपूरताच पाण्याचा वापर करत आहेत. ठरल्याप्रमाणे आठवड्यातून ते एकदिवस, कोरडा दिवसही पाळत आहेत.उत्कृष्ट व्यवस्थापनगटागटाने निर्मित या बोअरवेलचे व्यवस्थापन सामंजस्य व गरजेवर आधारित आहे. गटात सहभागी प्रत्येकाच्या घरी त्या बोअरवेलचा केबल आणि कॉकसह पाईप देण्यात आला. ज्याला पाण्याची गरज आहे, तो घरूनच बोअरवेलची बटन दाबतो. बोअरवेल सुरु करून पाणी घेतो. पाणी भरणे झाले की कॉक, बटन बंद करतो. यासाठी वेळ आणि दिवसही वाटून घेतले आहेत. वीज केबल प्रत्येकाच्या मीटरपर्यंत गेल्यामुळे वीज बिलाचाही प्रश्न नाही. वापरानुसार रक्कम वीजदेयकात समाविष्ट होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई