शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

लोकसहभागातून खोदल्या ६० बोअरवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 01:27 IST

गाव पातळीवर पाणी समस्येचे निराकरण करण्याकरिता गटागटाने एकत्र येऊन लोकांनी लोकांकरिता, लोकसहभागातून गावात चक्क ६० हून अधिक बोअरवेलची निर्मिती केली आहे. यातून स्वत:ची पाणी समस्या त्यांनी स्वत:च सोडवली आहे. गावात इतरांनाही ती सहायक ठरली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । पाणीटंचाईवर अशीही मात, स्वत:च बनविली पाणी वापर संहिता

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : गाव पातळीवर पाणी समस्येचे निराकरण करण्याकरिता गटागटाने एकत्र येऊन लोकांनी लोकांकरिता, लोकसहभागातून गावात चक्क ६० हून अधिक बोअरवेलची निर्मिती केली आहे. यातून स्वत:ची पाणी समस्या त्यांनी स्वत:च सोडवली आहे. गावात इतरांनाही ती सहायक ठरली आहे. लोकसहभागातून काय करणे शक्य आहे, याचे उत्तम उदाहरण शिंदीवासीयांनी समाजासमोर ठेवले आहे.अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. या आठ हजार लोकसंख्येच्या गावात लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तीनही बोअरवेलची पाणी पातळी खोल गेली आहे. मागील काही वर्षांपासून ही पाणी समस्या कायम आहे. यातून मार्ग काढण्याकरिता गावकरी स्वत: पुढे आलेत. १० ते १५ लोकांचा एक गट या प्रमाणे त्यांनी गट केलेत. प्रत्येक गटाने बोअरवेलकरिता आपसात स्वतंत्र वर्गणी केली. बोअरवेल पूर्ण करून घराघरांत पाणी घेताना येणारा खर्च वाटून घेतला.तीन ते चार वर्षांपासून या गटनिर्मितीतून बोअरवेल निर्मितीच्या प्रक्रियेने शिंदी बु. मध्ये वेग पकडला. यातून ५ हजार लोक आत्मियतेने जुळले गेले. ज्यांच्याकडे जागा असेल त्यांच्या अंगणात आणि ज्या गटाकडे जागा नसेल त्यांनी रस्त्याच्या कडेला घराशेजारी सामूहिक बोअरवेल घेतल्या आहेत.अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. येथे लोकसहभागातील ६० बोअरवेल आहेत. यात सरासरी १५ लोकांच्या एका गटाने एका बोअरवेलची निर्मिती केली. गावातील ६० बोअरवेलने गावातील पाच हजाराहून अधिक लोकांना पाणी उपलब्ध करून दिले आहे.पाणी वापर संहितापाणीटंचाईवर मात करण्यारिता लोकसभागातून ग्रामस्थांनी बोअरवेल खोदून पाणी उपलब्ध करून घेतले असते. परंतु या बोअरवेलचे पाणी वापरण्याकरिता त्यांनी स्वत: पाणी वापर संहिता अंगिकारली आहे. यात गरजेपूरताच पाण्याचा वापर करत आहेत. ठरल्याप्रमाणे आठवड्यातून ते एकदिवस, कोरडा दिवसही पाळत आहेत.उत्कृष्ट व्यवस्थापनगटागटाने निर्मित या बोअरवेलचे व्यवस्थापन सामंजस्य व गरजेवर आधारित आहे. गटात सहभागी प्रत्येकाच्या घरी त्या बोअरवेलचा केबल आणि कॉकसह पाईप देण्यात आला. ज्याला पाण्याची गरज आहे, तो घरूनच बोअरवेलची बटन दाबतो. बोअरवेल सुरु करून पाणी घेतो. पाणी भरणे झाले की कॉक, बटन बंद करतो. यासाठी वेळ आणि दिवसही वाटून घेतले आहेत. वीज केबल प्रत्येकाच्या मीटरपर्यंत गेल्यामुळे वीज बिलाचाही प्रश्न नाही. वापरानुसार रक्कम वीजदेयकात समाविष्ट होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई