शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

एकाच दिवसाच्या पावसाने बसला ५९ पुलांना तडाखा, चार मार्ग वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2022 11:47 IST

२० जुलै रोजी अतिवृष्टी, पुलांच्या अतिआवश्यक कामासाठी ५ कोटींची गरज

अमरावती : २० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी, सततच्या पुरामुळे लहान-मोठ्या ५९ पुलांना तडाखा बसला असून कोट्यवधीच्या शासकीय मालमत्तेची हानी झाली आहे. त्यामुळे पुलाच्या पुनर्बांधणीसह अप्रोच रस्ते अतिआवश्यक दुरुस्तीसाठी ४४ कोटींचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करून तो राज्य शासनाकडे निधीसाठी पाठविला आहे.

जिल्ह्यात २० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने पुलावरून पुराचे पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे पुलाच्या अतिआवश्यक दुरुस्ती करण्यासाठी पाच कोटी निधी लागणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. एकंदरीत २०० किमी लांबीचे रस्ते अतिवृष्टीने डॅमेज झाले आहेत. त्यापैकी ७ ते ८ किमी लांबीचे रस्ते पूर्णत: डॅमेज झाले आहेत. त्यामुळे अनेक गावांना पुलावरुन ये-जा करताना वाहनचालक, नागरिकांना कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीने चार राज्यमार्ग वाहतुकीसाठी अद्यापही बंद आहे.

लहान, मोठ्या पुलांचे नुकसान

अतिवृष्टी, पुराने जिल्ह्यात लहान-मोठ्या ५९ पुलाचे नुकसान झाले आहे. यात पुलाच्या पुनर्बांधणी महत्त्वाची असणार आहे. पुलाचे संरक्षण कठडे, वाईडींग, पुलाची लांबी-रूंदी, जोडणारे अप्रोच रस्ते यासह राज्य महामार्ग, गावातील रस्त्यांची कायमस्वरूपी दुरूस्ती आणि आवश्यकतेनुसार बांधणी पुलाची कामे करण्यात येणार असून,त्यानुसार प्रस्ताव पाठविला आहे. शासनाकडून निधीची तरतूद होताच कामे केली जाईल.

अतिवृष्टीने बंद असलेले चार मार्ग 

  • शिराळा- डवरगाव (राज्यमार्ग ३०८) ५३७०० किमी
  • मोर्शी-सिंभोरा (राज्य मार्ग २९२) ७८०० किमी.
  • वलगाव-पांढरी-निंभोरा रस्ता : ४४५०० ते ४५२०० किमी.
  • धारणी ते कुसूमकोट (राज्यमार्ग २९२) १४४०० किमी.

 

७१ घरात पुराचे पाणी, ४४ जण स्थलांतरित

तीन आठवड्यांपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप अजूनही सुरू आहे. यामध्ये २४ तासांत मोर्शी व अंबाडा मंडळांमध्ये प्रत्येकी ७५ मिमी पावसाची नोंद झाली. ही अतिवृष्टी आहे. ४८ तासांपासून मोर्शी व वरुड तालुक्यात संततधार पाऊस होत आहे. वरुड तालुक्यात पुराचे पाणी ७१ घरात शिरले. यामध्ये २० कुटुंबांतील ४४ जणांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहे.

महसूल यंत्रणेद्वारा प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये वरुड तालुक्यातील १८ गावांमधील ७१ घरात पुराचे पाणी शिरले व यामुळे १६ कुटुंबातील ४० व्यक्ती व अचलपूर तालुक्यात चार गावांतील चार व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आलेले आहे. संततधार पावसाने तिवसा तालुक्यात दोन, धामणगाव तालुक्यात ३९, नांदगाव तालुक्यात पाच, मोर्शी तालुक्यात ७४, वरुड तालुक्यात १३६, दर्यापूर तालुक्यात सहा व चिखलदरा तालुक्यात सात घरांची पडझड झालेली आहे.

२,५५८ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान

दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने वरुड तालुक्यातील २,५२७ हेक्टर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १० हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय धामणगाव तालुक्यातील २१ हेक्टर शेती खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दीड लाख हेक्टर शेतीपिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे.

२० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने रस्ते, पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ४४ कोटी तर, ५९ लहान-मोठे पुलावरून जोरात पाणी वाहून गेल्याने अतिआवश्यक दुरूस्तीसाठी पाच कोटींचा निधी लागणार आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

- अरुंधती शर्मा, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

टॅग्स :GovernmentसरकारRainपाऊसfloodपूरAmravatiअमरावती