शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एकाच दिवसाच्या पावसाने बसला ५९ पुलांना तडाखा, चार मार्ग वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2022 11:47 IST

२० जुलै रोजी अतिवृष्टी, पुलांच्या अतिआवश्यक कामासाठी ५ कोटींची गरज

अमरावती : २० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी, सततच्या पुरामुळे लहान-मोठ्या ५९ पुलांना तडाखा बसला असून कोट्यवधीच्या शासकीय मालमत्तेची हानी झाली आहे. त्यामुळे पुलाच्या पुनर्बांधणीसह अप्रोच रस्ते अतिआवश्यक दुरुस्तीसाठी ४४ कोटींचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करून तो राज्य शासनाकडे निधीसाठी पाठविला आहे.

जिल्ह्यात २० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने पुलावरून पुराचे पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे पुलाच्या अतिआवश्यक दुरुस्ती करण्यासाठी पाच कोटी निधी लागणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. एकंदरीत २०० किमी लांबीचे रस्ते अतिवृष्टीने डॅमेज झाले आहेत. त्यापैकी ७ ते ८ किमी लांबीचे रस्ते पूर्णत: डॅमेज झाले आहेत. त्यामुळे अनेक गावांना पुलावरुन ये-जा करताना वाहनचालक, नागरिकांना कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीने चार राज्यमार्ग वाहतुकीसाठी अद्यापही बंद आहे.

लहान, मोठ्या पुलांचे नुकसान

अतिवृष्टी, पुराने जिल्ह्यात लहान-मोठ्या ५९ पुलाचे नुकसान झाले आहे. यात पुलाच्या पुनर्बांधणी महत्त्वाची असणार आहे. पुलाचे संरक्षण कठडे, वाईडींग, पुलाची लांबी-रूंदी, जोडणारे अप्रोच रस्ते यासह राज्य महामार्ग, गावातील रस्त्यांची कायमस्वरूपी दुरूस्ती आणि आवश्यकतेनुसार बांधणी पुलाची कामे करण्यात येणार असून,त्यानुसार प्रस्ताव पाठविला आहे. शासनाकडून निधीची तरतूद होताच कामे केली जाईल.

अतिवृष्टीने बंद असलेले चार मार्ग 

  • शिराळा- डवरगाव (राज्यमार्ग ३०८) ५३७०० किमी
  • मोर्शी-सिंभोरा (राज्य मार्ग २९२) ७८०० किमी.
  • वलगाव-पांढरी-निंभोरा रस्ता : ४४५०० ते ४५२०० किमी.
  • धारणी ते कुसूमकोट (राज्यमार्ग २९२) १४४०० किमी.

 

७१ घरात पुराचे पाणी, ४४ जण स्थलांतरित

तीन आठवड्यांपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप अजूनही सुरू आहे. यामध्ये २४ तासांत मोर्शी व अंबाडा मंडळांमध्ये प्रत्येकी ७५ मिमी पावसाची नोंद झाली. ही अतिवृष्टी आहे. ४८ तासांपासून मोर्शी व वरुड तालुक्यात संततधार पाऊस होत आहे. वरुड तालुक्यात पुराचे पाणी ७१ घरात शिरले. यामध्ये २० कुटुंबांतील ४४ जणांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहे.

महसूल यंत्रणेद्वारा प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये वरुड तालुक्यातील १८ गावांमधील ७१ घरात पुराचे पाणी शिरले व यामुळे १६ कुटुंबातील ४० व्यक्ती व अचलपूर तालुक्यात चार गावांतील चार व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आलेले आहे. संततधार पावसाने तिवसा तालुक्यात दोन, धामणगाव तालुक्यात ३९, नांदगाव तालुक्यात पाच, मोर्शी तालुक्यात ७४, वरुड तालुक्यात १३६, दर्यापूर तालुक्यात सहा व चिखलदरा तालुक्यात सात घरांची पडझड झालेली आहे.

२,५५८ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान

दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने वरुड तालुक्यातील २,५२७ हेक्टर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १० हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय धामणगाव तालुक्यातील २१ हेक्टर शेती खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दीड लाख हेक्टर शेतीपिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे.

२० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने रस्ते, पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ४४ कोटी तर, ५९ लहान-मोठे पुलावरून जोरात पाणी वाहून गेल्याने अतिआवश्यक दुरूस्तीसाठी पाच कोटींचा निधी लागणार आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

- अरुंधती शर्मा, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

टॅग्स :GovernmentसरकारRainपाऊसfloodपूरAmravatiअमरावती