शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

विदर्भातील ५११ प्रकल्पांमध्ये ५८.२८ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 10:58 IST

Amravati News विदर्भातील नऊ मोठे, २५ मध्यम व ४७७ असे एकूण ५११ प्रकल्पांमध्ये सरासरी ५८.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देनऊ मोठ्या प्रकल्पामध्ये ५९.६७ टक्के पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : नऊ मोठे, २५ मध्यम व ४७७ असे एकूण ५११ प्रकल्पांमध्ये सरासरी ५८.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या काही ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. मात्र, शंभर टक्के प्रकल्प भरण्याकरिता दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

५ ऑगस्टपर्यंतच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार ५११ सिंचन प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ३२८३.६० दलघमी आहे. त्यापैकी आजचा उपयुक्त पाणीसाठा हा १९१३.६८ दलघमी असून, त्याची टक्केवारी ५८.२८ आहे.

पाऊस थांबल्यामुळे फक्त यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा मध्यम प्रकल्पाचे दोन दरवाजे फक्त उघडण्यात आले आहेत. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. मात्र प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा साचला, तर रबी पिकांना सदर प्रकल्पातून पाणी देता येणार आहे. त्यामुळे सिंचनाची सोय होणार आहे.

नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती

अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ५९.१४ टक्के पाणीसाठा झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात १०० टक्के, अरुणावती ७२.५६ टक्के, बेंबळा ६८.५४ टक्के, अकोला जिल्ह्याील काटेपूर्णा प्रकल्पात ७४.६७ टक्के, वान प्रकल्पात ५४.२८ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा २८.१७ टक्के, पेनटाकळी ३३.४० टक्के, खडकपूर्णा सर्वांत कमी १३.६६ टक्के पाणीसाठा आहे. काही प्रकल्पात अपेक्षित पाणीसाठा साचला असून काही प्रकल्पांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे.

चार प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा

यवतमाळ जिल्ह्यातील पूस हा मोठा प्रकल्प शंभर टक्के भरला असून, याच जिल्ह्यताील सायखेडा मध्यम प्रकल्पातसुद्धा शंभर टक्के पाणीसाठा साचला आहे. वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी व बुलडाणा जिल्ह्यतील कोराडी मध्यम प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :Waterपाणी