शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

५८ हजार एकर सिंचनाचे पाणी ‘सोफियाला’ !

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असताना जिल्ह्यात मात्र, पेयजल आणि सिंचनाच्या तुलनेत सोफिया विद्युत प्रकल्पाला पाणी वाटपात झुकतेमाप दिले जात आहे.

पक्षपात : पिण्यासाठी ६८.१६, विद्युत प्रकल्पाला ८८ दलघमी प्रदीप भाकरे अमरावतीमार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असताना जिल्ह्यात मात्र, पेयजल आणि सिंचनाच्या तुलनेत सोफिया विद्युत प्रकल्पाला पाणी वाटपात झुकतेमाप दिले जात आहे. ऊर्ध्व वर्धा धरणातून पिण्यासाठी ६८.१६ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित असताना एकट्या सोफियासाठी ८७.६० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आल्याने जलवितरणात पक्षपात केल्याच्या आरोपाला बळ मिळत आहे. तुर्तास उर्ध्व वर्धा (अप्पर वर्धा) प्रकल्पात केवळ ३१ टक्केच जलसाठा शिल्लक असल्याने सोफियासाठी आरक्षित पाण्याचा प्रश्न चर्चिला जात आहे. २८ लाख लोकसंख्येच्या जिल्ह्याचा पाणीपुरवठा एकीकडे तर सोफियासाठी आरक्षित पाणी दुसरीकडे, अशी सध्याची स्थिती आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी यंदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ४४ दशलक्ष घनमीटर पाण्याची मागणी केली आहे. त्या खालोखाल २४ दशलक्ष घनमीटर पाणी एकट्या सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी लागणार आहे.शहरापेक्षा अधिक पाणी सोफियालाअमरावती : जिल्ह्यासाठी अप्परवर्धा प्रकल्पातून ६८.१६ दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित असले तरी २८ लाख लोकसंख्येच्या अमरावती जिल्ह्यासाठी आरक्षित पाण्यापेक्षा अधिक अर्थात ८७.६० दलघमी पाणी सोफियासाठी आरक्षित करण्यात आले आहे. अमरावती शहरासाठी जीवन प्राधिकरणाने ऊर्ध्व वर्धा धरणातून ५८.४७ द.ल.घ.मी. पाण्याचे आरक्षण नोंदविले आहे. त्यापैकी सन २०१५-१६ मध्ये मजिप्राकडून ४४ द.ल.घ.मी. पाण्याची मागणी करण्यात आली. त्या तुलनेत एकट्या सोफिया पॉवर कं. लि. ला ८७.६० द.ल.घ.मी.पाण्याचे आरक्षण मंजूर आहे. त्यापैकी यंदा २४ द.ल.घ.मी.पाणी त्यांना लागणार आहे. सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्पाला शासन निर्णयानुसारच पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाला २३२.१८ कोटी सोफियाकडून घ्यावयाचे होते. त्यापैकी ११६ कोटी रूपये प्राप्त झाल्यानंतर कंपनीने कराराचा भंग केला आहे. - अविनाश कोठाळे, सहाय्यक अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग, अमरावती.२३,२१८ हेक्टर सिंचनाचे पाणी सोफियालाऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून ८७.६० दलघमी पाणी २२ फेब्रुवारी २००८ च्या निर्णयान्वये सोफियासाठी आरक्षित करण्यात आले. या जलसाठ्यातून जिल्ह्यात तब्बल २३,२१८ हेक्टर अर्थात ५८,०४५ एकर जमिनीचे सिंचन होऊ शकले असते. मात्र, लाखो शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी शासनाच्या या निर्णयामुळे सोफियाच्या वाट्याला आले आहे. आंदोलन पेटण्याचे संकेतयंदा प्रथमच ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी झाला आहे. १० मार्च २०१६ च्या आकडेवारीनुसार तुर्तास अप्पर वर्धा प्रकल्पामध्ये १८०.१४ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. त्या तुलनेत सन २०११ मध्ये ३४१.८७, सन २०१२ मध्ये २१८.०६, सन २०१३ मध्ये २२६.४४, सन २०१४ मध्ये २६५.०७ तर सन २०१५ मध्ये २२०.८४ दलघमी पाणी होते. यंदा अप्पर वर्धा धरणात निम्मेच पाणी शिल्लक असल्याने सोफियाच्या पाण्यावरून आंदोलनाचे संकेत आहेत. या गावांना होतो पाणीपुरवठाअप्पर वर्धा धरणातून पिण्यासाठी ६८.१६ दलघमी पाणी आरक्षित आहे. यातून अमरावती शहर, मोर्शी, वरुड, मोर्शी तालुक्यातील ७० गावे पाणीपुरवठा योजना, लोणी व १४ गावे पाणीपुरवठा योजना, हिवरखेड व ११ गावे योजना, आष्टी, पेठ, अहमदपूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि पांढुर्णा नगरपरिषद भागात पाणीपुरवठा होतो. त्यापेक्षा अधिक पाणी सोफियासाठी आरक्षित केले आहे. सोफियाचे पाणी आरक्षण अद्यापही कायम आहे. शासनाने द्राविडीप्राणायाम बंद करावा. पाण्याचे आरक्षण रद्द करावे. आमच्या आंदोलनामुळे सोफियाला एकच जलवाहिनी कार्यान्वित करता आली. पाणी आरक्षण रद्द न झाल्यास आंदोलन उभारले जाईल.-संजय कोल्हे, निमंत्रक, किसान एकता मंच.