शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

५६ गावांना लागले आसेगाव तालुका निर्मितीचे वेध

By admin | Updated: March 8, 2015 00:16 IST

अमरावती जिल्ह्यात नियोजित एकूण १७ तालुक्यांमध्ये १५ वा तालुका म्हणून आसेगाव तालुका निर्मितीच्या प्रस्तावाची वार्ता पसरल्यापासून परिसरातील ५६ गावांतील ....

आसेगाव (पूर्णा) : अमरावती जिल्ह्यात नियोजित एकूण १७ तालुक्यांमध्ये १५ वा तालुका म्हणून आसेगाव तालुका निर्मितीच्या प्रस्तावाची वार्ता पसरल्यापासून परिसरातील ५६ गावांतील नागरिकांना आसेगाव तालुका निर्मितीची प्रतीक्षा लागली आहे.आसेगाव हे अमरावती ते परतवाडा आणि दर्यापूर ते चांदूरबाजार या चार शहरांना जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असून येथे परिसरातील ३० ते ३५ गावांचा रोजचा संपर्क होतो. आसेगावच्या भोवताल अचलपूर, चांदूरबाजार, भातकुली व दर्यापूर या तालुक्यात अंतर्भूत असलेल्या गावांच्या सीमारेषा आहेत. हाकेच्या अंतरावरील पोहरा या गावासह पूर्णानगर वातोंडा, हिंमतपूर, अंचलवाडी, उमरटेक, वाकी, रायपूर, निरुळगंगामाई, मार्की, रामा आदी गावे भातकुली तालुक्यात समाविष्ट असून भातकुलीचे अंतर लांब असल्याने त्यांना गैरसोयीचे वाटते. तसेच येलकी, सावळापूर, वासनी (बु.), वासनी (खुर्द), हिवरापूर्णा, खैरी, दोनोडा, सावळी, येसूर्णा ही गावे अचलपूर तालुक्याला जोडली आहेत. तर आसेगावसह टाकरखेडा, तळणी, तामसवाडी, विरूळ, चिंचोली, दहिगाव, गोविंदपूर, जगन्नाथपूर, रसुलापूर, कृष्णापूर, धानोरा, राजना, कोटगावंडी आदी गावे चांदूरबाजार तालुक्यात समाविष्ट आहेत आणि आसेगाव ते दर्यापूर रोडवरील सांगवा, घडा या गावापासून पुढे दर्यापूर तालुक्याची हद्द सुरू होते. प्रस्तावित आसेगाव तालुक्यामध्ये ५६ गावे आणि १० उजाड अशा एकूण ६६ गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन असल्याचे वृत्त पसरल्यापासून परिसरातील लोकांचे लक्ष आसेगावकडे लागले असून पुढच्या सोयीसाठी काहींनी येथे जागा वगैरे खरेदी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आता फक्त आसेगाव तालुक्याच्या निर्मितीची घोषणा होण्याची प्रतिक्षा आहे. (वार्ताहर)