शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

५५ टक्के विद्यार्थ्यांची भाषा अप्रगत

By admin | Updated: January 5, 2016 00:02 IST

जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते आठवीमधील तब्बल ५५ टक्के विद्यार्थी मराठी भाषेत अप्रगत असल्याचा खळबळजनक निष्कर्ष पायाभूत चाचणीनंतर घेतलेल्या अभ्यासातून काढण्यात आला आहे.

पायाभूत चाचणीचा प्रातिनिधिक निष्कर्ष : गणितही कच्चे, फेब्रुवारीमध्ये होणार पुन्हा एक चाचणीप्रदीप भाकरे अमरावतीजिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते आठवीमधील तब्बल ५५ टक्के विद्यार्थी मराठी भाषेत अप्रगत असल्याचा खळबळजनक निष्कर्ष पायाभूत चाचणीनंतर घेतलेल्या अभ्यासातून काढण्यात आला आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये जिल्ह्यातील खासगी, जिल्हा परिषद, मनपा, न.पा. तथा सीबीएसई, आयसीएसई माध्यमातील इयत्ता दुसरी ते आठवीमधील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर हे निष्कर्ष काढण्यात आलेत. जिल्ह्यातील ४५ टक्के विद्यार्थ्यांनाच मराठी व गणित या दोन विषयांचे बऱ्यापैकी ज्ञान आहे. गेल्या काही वर्षात राज्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत घट झाल्याने प्राथमिक शिक्षणाचा दर्जा तपासण्याचे शासनस्तरावरुन ठरविण्यात आले. त्यासाठी इयत्ता दुसरी ते आठवीमधील विद्यार्थ्यांच्या गणित व भाषा विषयामधील क्षमता जाणून घेण्यात आल्या. पायाभूत चाचणीचे संपादनअमरावती : सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या पायाभूत चाचणीमध्ये मोठे गैरप्रकारही उघड झाले होते. जिल्ह्यातील सव्वालाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेतल्यानंतर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्रतिनिधिक स्वरुपात त्यांनी दत्तक घेतलेल्या शाळांमधील पायाभूत चाचणीचे संपादन करुन निष्कर्ष नोंदविले. त्यात जिल्ह्यातील तब्बल ५५ टक्के विद्यार्थी मराठी भाषेमध्ये अप्रगत असल्याचे वास्तव उघड झाले आहे. जिल्ह्यातील केवळ ३८.१२ टक्के विद्यार्थ्यांना मजकुराचे श्रृतलेखन करता आले. तर ३१.६१ टक्के विद्यार्थी व्याकरणावर आधारीत प्रश्न सोडवू शकले. याशिवाय केवळ ३०.०२ टक्के विद्यार्थी स्वत:च्या शब्दात लेखी अभिव्यक्ती करु शकले. या निष्कर्षावरुन जिल्ह्यातील विद्यार्थी मराठी भाषेमध्ये अप्रगत असल्याचे दिसून आले आहे. २९ हजार ८९७ विद्यार्थ्यांचा अभ्यास पायाभूत चाचणी पार पडल्यानंतर जिल्हा व प्रशिक्षण संस्थेने दत्तक घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या ४६१ शाळांचा अभ्यास करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या एकूण शाळांपैकी या शाळांचे प्रमाण ३० टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण पटसंख्येच्या २५ टक्के प्रमाण असलेल्या २९,८९७ विद्यार्थ्यांचे यात निरिक्षण नोंदविले गेले. पायाभूत चाचणी झाल्यानंतर प्रातिनिधीक स्वरुपात निष्कर्ष काढण्यात आले. सर्वच माध्यमातून घेतली गेली पायाभूत चाचणीप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत सीबीएसई, आयसीएसईसह राज्य शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या दुसरी ते आठवीच्या वर्र्गातील विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी सप्टेंबर २०१५ मध्ये घेण्यात आली. राज्यात शालेय शिक्षण विभागांतर्गत ‘गुणवत्ता केंद्रबिंदू’ मानून विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. गणितात सरासरी ५० टक्के विद्यार्थी प्रगतजिल्ह्यात सप्टेंबर १५ मध्ये घेण्यात आलेल्या गणितातील पायाभूत चाचणीमध्ये सरासरी ५० टक्के विद्यार्थी प्रगत ठरले आहेत. इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची तोंडी/प्रात्यक्षिक आणि लेखीच्या माध्यमातून गणिताची पायाभूत चाचणी (बेसलाईन टेस्ट) घेण्यात आली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेव्दारे दत्तक घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या भाषा आणि गणित चाचणीतील संपादणुकीचा अभ्यास करण्यात आला. ज्या शाळा पायाभूत चाचणीत कमी पडल्यात, तेथे कृती कार्यक्रम राबविला जाईल. - पवन मानकर, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था.