शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

२० वर्षांपासून विविध दाखल्यासाठीची थांबली भटकंती; जगण्यासाठी भटकणाऱ्या कुटुंबाना हक्काची घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 12:41 IST

माजी राज्यमंत्री बच्चू कडूंचा पुढाकार

सुमित हरकूट

चांदूर बाजार (अमरावती) : विपरीत परिस्थितीत जीवन जगण्याची कला ज्यांना अवगत आहे, अशा कायम भटकणाऱ्या समाजाला आता आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे. शिरजगाव बंड हद्दीतील मौजे जमापूर येथे या संपूर्ण ५५ कुटुंबाना वैयक्तिक घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने तयारी चालविली आहे.

तालुक्यात गेल्या २० वर्षांपासून रहिवासी असलेले नाथभराडी व झिंगा भोई या समाजातील ५५ कुटुंब आपल्या जातीचा दाखल्यासह रहिवासी दाखल्याच्या नोंदीसाठी भटकत होते. अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजांपासून कोसो दूर असलेला हा समाज अशिक्षित असूनही आपल्या मेहनतीने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे. या समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने गरिबीत जन्म घेणे व गरिबीतच मरणे त्यांच्या नशिबी आले होते. यामुळे या समाजातील महिला व पुरुष मंडळी स्वतः शिक्षण घेऊ शकली नाही. मात्र आ. बच्चू कडू यांचा प्रयत्नामुळे त्यांचा कुटुंबातील ४५ ते ५० मुले शिरजगाव बंड येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळेत आज शिक्षण घेत आहे. आमदार बच्चू कडू यांनी घेतलेल्या शिबिराच्या माध्यमातून पहिल्यांदाच त्यांना जातीचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड उपलब्ध झाले आहे.

नाथभराडी समाजातील पुरुष व स्त्री ग्रामीण भागात जाऊन भजन, गाणे, ज्योतिष पाहणे व हातमजुरीसारखा व्यवसाय करतात. तर झिंगा भोई हा समाज मूळचा आंध्र प्रदेशातील असून या समाजातील पुरुष हातमजुरी करतात, तर स्त्रियांच्या घरोघरी जाऊन माळा, मणी, डबलेसारखे साहित्य विकण्याचा व केस विकत घेण्याचा व्यवसाय गावोगावी सतत फिरून करत असतात. अशा या समाजाने कधीच जवळ न केलेल्या दोन्ही समाजातील ५५ कुटुंबासाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी समाज कल्याण विभागमार्फत जमीन विकत घेऊन त्यावर हक्काचे घर बांधून देत आहेत.

५५ कुटुंबासाठी २ कोटी ६७ लाखांचा निधी मंजूर

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रयत्नांमुळे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत शिरजगाव बंड हद्दीतील मौजे जमापूर येथे ५५ कुटुंबांना वैयक्तिक घरकूल योजनेचा लाभ मिळणार आहे. यात पहिल्या टप्प्यात त्यांच्या हक्काची जागा वाटप करण्यात आली. तसेच या जागेत रस्ते, विद्युत जोडणी, पाण्याची सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर लवकरच या कुटुंबाच्या हक्काच्या घरांच्या बांधकामाला सुद्धा सुरुवात होत आहे. याकरिता २ कोटी ६७ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यामुळे पिढीजात उघड्यावर पाल टाकून संसार करणाऱ्या या समाजातील नागरिकांचेसुद्धा आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकBachhu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावती