शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांपासून विविध दाखल्यासाठीची थांबली भटकंती; जगण्यासाठी भटकणाऱ्या कुटुंबाना हक्काची घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 12:41 IST

माजी राज्यमंत्री बच्चू कडूंचा पुढाकार

सुमित हरकूट

चांदूर बाजार (अमरावती) : विपरीत परिस्थितीत जीवन जगण्याची कला ज्यांना अवगत आहे, अशा कायम भटकणाऱ्या समाजाला आता आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे. शिरजगाव बंड हद्दीतील मौजे जमापूर येथे या संपूर्ण ५५ कुटुंबाना वैयक्तिक घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने तयारी चालविली आहे.

तालुक्यात गेल्या २० वर्षांपासून रहिवासी असलेले नाथभराडी व झिंगा भोई या समाजातील ५५ कुटुंब आपल्या जातीचा दाखल्यासह रहिवासी दाखल्याच्या नोंदीसाठी भटकत होते. अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजांपासून कोसो दूर असलेला हा समाज अशिक्षित असूनही आपल्या मेहनतीने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे. या समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने गरिबीत जन्म घेणे व गरिबीतच मरणे त्यांच्या नशिबी आले होते. यामुळे या समाजातील महिला व पुरुष मंडळी स्वतः शिक्षण घेऊ शकली नाही. मात्र आ. बच्चू कडू यांचा प्रयत्नामुळे त्यांचा कुटुंबातील ४५ ते ५० मुले शिरजगाव बंड येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळेत आज शिक्षण घेत आहे. आमदार बच्चू कडू यांनी घेतलेल्या शिबिराच्या माध्यमातून पहिल्यांदाच त्यांना जातीचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड उपलब्ध झाले आहे.

नाथभराडी समाजातील पुरुष व स्त्री ग्रामीण भागात जाऊन भजन, गाणे, ज्योतिष पाहणे व हातमजुरीसारखा व्यवसाय करतात. तर झिंगा भोई हा समाज मूळचा आंध्र प्रदेशातील असून या समाजातील पुरुष हातमजुरी करतात, तर स्त्रियांच्या घरोघरी जाऊन माळा, मणी, डबलेसारखे साहित्य विकण्याचा व केस विकत घेण्याचा व्यवसाय गावोगावी सतत फिरून करत असतात. अशा या समाजाने कधीच जवळ न केलेल्या दोन्ही समाजातील ५५ कुटुंबासाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी समाज कल्याण विभागमार्फत जमीन विकत घेऊन त्यावर हक्काचे घर बांधून देत आहेत.

५५ कुटुंबासाठी २ कोटी ६७ लाखांचा निधी मंजूर

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रयत्नांमुळे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत शिरजगाव बंड हद्दीतील मौजे जमापूर येथे ५५ कुटुंबांना वैयक्तिक घरकूल योजनेचा लाभ मिळणार आहे. यात पहिल्या टप्प्यात त्यांच्या हक्काची जागा वाटप करण्यात आली. तसेच या जागेत रस्ते, विद्युत जोडणी, पाण्याची सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर लवकरच या कुटुंबाच्या हक्काच्या घरांच्या बांधकामाला सुद्धा सुरुवात होत आहे. याकरिता २ कोटी ६७ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यामुळे पिढीजात उघड्यावर पाल टाकून संसार करणाऱ्या या समाजातील नागरिकांचेसुद्धा आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकBachhu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावती