शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

२० वर्षांपासून विविध दाखल्यासाठीची थांबली भटकंती; जगण्यासाठी भटकणाऱ्या कुटुंबाना हक्काची घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 12:41 IST

माजी राज्यमंत्री बच्चू कडूंचा पुढाकार

सुमित हरकूट

चांदूर बाजार (अमरावती) : विपरीत परिस्थितीत जीवन जगण्याची कला ज्यांना अवगत आहे, अशा कायम भटकणाऱ्या समाजाला आता आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे. शिरजगाव बंड हद्दीतील मौजे जमापूर येथे या संपूर्ण ५५ कुटुंबाना वैयक्तिक घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने तयारी चालविली आहे.

तालुक्यात गेल्या २० वर्षांपासून रहिवासी असलेले नाथभराडी व झिंगा भोई या समाजातील ५५ कुटुंब आपल्या जातीचा दाखल्यासह रहिवासी दाखल्याच्या नोंदीसाठी भटकत होते. अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजांपासून कोसो दूर असलेला हा समाज अशिक्षित असूनही आपल्या मेहनतीने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे. या समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने गरिबीत जन्म घेणे व गरिबीतच मरणे त्यांच्या नशिबी आले होते. यामुळे या समाजातील महिला व पुरुष मंडळी स्वतः शिक्षण घेऊ शकली नाही. मात्र आ. बच्चू कडू यांचा प्रयत्नामुळे त्यांचा कुटुंबातील ४५ ते ५० मुले शिरजगाव बंड येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळेत आज शिक्षण घेत आहे. आमदार बच्चू कडू यांनी घेतलेल्या शिबिराच्या माध्यमातून पहिल्यांदाच त्यांना जातीचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड उपलब्ध झाले आहे.

नाथभराडी समाजातील पुरुष व स्त्री ग्रामीण भागात जाऊन भजन, गाणे, ज्योतिष पाहणे व हातमजुरीसारखा व्यवसाय करतात. तर झिंगा भोई हा समाज मूळचा आंध्र प्रदेशातील असून या समाजातील पुरुष हातमजुरी करतात, तर स्त्रियांच्या घरोघरी जाऊन माळा, मणी, डबलेसारखे साहित्य विकण्याचा व केस विकत घेण्याचा व्यवसाय गावोगावी सतत फिरून करत असतात. अशा या समाजाने कधीच जवळ न केलेल्या दोन्ही समाजातील ५५ कुटुंबासाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी समाज कल्याण विभागमार्फत जमीन विकत घेऊन त्यावर हक्काचे घर बांधून देत आहेत.

५५ कुटुंबासाठी २ कोटी ६७ लाखांचा निधी मंजूर

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रयत्नांमुळे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत शिरजगाव बंड हद्दीतील मौजे जमापूर येथे ५५ कुटुंबांना वैयक्तिक घरकूल योजनेचा लाभ मिळणार आहे. यात पहिल्या टप्प्यात त्यांच्या हक्काची जागा वाटप करण्यात आली. तसेच या जागेत रस्ते, विद्युत जोडणी, पाण्याची सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर लवकरच या कुटुंबाच्या हक्काच्या घरांच्या बांधकामाला सुद्धा सुरुवात होत आहे. याकरिता २ कोटी ६७ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यामुळे पिढीजात उघड्यावर पाल टाकून संसार करणाऱ्या या समाजातील नागरिकांचेसुद्धा आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकBachhu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावती