शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

५४ हजार आॅनलाईन नोंदणी, १९ हजार शेतकऱ्यांची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:32 IST

नाफेडसोबत महाराष्ट्र स्टेट को-आोपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा तूर खरेदीचा करारनामा झाला, त्यानुसार जिल्ह्यात एकूण तूर उत्पादकतेच्या २५ टक्के प्रमाणातच तूर खरेदी करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबईस्थित सरव्यवस्थापकांनी सर्व जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिलेत.

ठळक मुद्देतूर खरेदीला निकषाची बाधा : जिल्हा उत्पादकतेच्या २५ टक्केच खरेदीचा फतवा

आॅनलाईन लोकमतअमरावती : नाफेडसोबत महाराष्ट्र स्टेट को-आोपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा तूर खरेदीचा करारनामा झाला, त्यानुसार जिल्ह्यात एकूण तूर उत्पादकतेच्या २५ टक्के प्रमाणातच तूर खरेदी करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबईस्थित सरव्यवस्थापकांनी सर्व जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिलेत. यामुळेच जिल्ह्यात सद्यस्थितीत ५४,७१८ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली असली तरी, प्रत्यक्षात १९७४७ शेतकऱ्यांची तीन लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे.जिल्ह्यातील १२ केंद्रांवर नाफेडद्वारा शासकीय सुरू आहे. गतवर्षी तुरीची सरासरी उत्पादकता हेक्टरी १५ क्विंटल ग्राह्य धरण्यात आली होती. त्यातुलनेत यंदा मात्र १० क्विंटलच ग्राह्य धरण्यात आल्यामुळे अधिक उत्पन्न घेणाºया शेतकºयांवर मात्र अन्याय झाल्याची भावना आहे. आता जिल्हा उत्पादकतेच्या म्हणजेच १२ लाख क्विंटलच्या तुलनेत केवळ चार लाख क्विंटलच तूर खरेदी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्यस्थितीत डीएमओद्वारा अमरावती, अचलपूर, धारणी ,दर्यापूर, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, तिवसा, नांदगाव खंडेश्वर व अंजनगाव सूर्जी येथे तर व्हीसीएमएफद्वारा मोर्शी, वरूड व धामणगाव या केंद्रांवर खरेदी सुरू आहे. दरम्यान सर्वच १२ केंद्रावर तुरीची आॅनलाइन नोंदणी सुरू आहे. आतापर्यत ५४ हजार ७१८ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केलेली आहे.शासनाच्या निर्देशाप्रमाणे यंदा नाफेडच्या केंद्रावर १८ एप्रिल २०१८ पर्यंत तूर खरेदीला मान्यता देण्यात आलेली आहे. केंद्र शासनाने तूर खरेदीचे दिलेले लक्षांक पूर्ण होईतोवर ही खरेदी सुरू राहणार आहे.जर नाफेडकडून तूर खरेदी बंद करण्याचे निर्देश आल्यास केंद्र त्वरित बंद करण्यात येणार आहे. सातबारावर निर्देशित केल्याप्रमाणे तुरीची खरेदी करण्यात येणार असली तरी एका दिवशी एका शेतकºयांकडून प्रति ५० किलोचे ५० पोत्यांचीच खरेदी करण्याचे आदेश आहेत.अशी आहे केंद्रनिहाय नोंदणीसद्यस्थितीत अचलपूर केंद्रावर ८११२, अमरावती ७१६२, अंजनगाव सुर्जी २४८१, चांदूरबाजार ४,०१८, चांदूर रेल्वे ३८१४, दर्यापूर ५३४५, धारणी ७८२, नांदगाव खंडेश्वर ३०५०, तिवसा २१८७, मोर्शी ६३८१, धामणगाव रेल्वे ४७८६ व वरूड तालुक्यात ६५९४ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.अशी आहे केंद्रनिहाय खरेदीसद्यस्थितीत अचलपूर केंद्रावर २७,८८८ अमरावती ४६६०३, अंजनगाव सुर्जी, १७,५४७ चांदूरबाजार २३५४६, चांदूररेल्वे २३९९५, दर्यापूर ५०३६८, धारणी ७०१२, नांदगाव खंडेश्वर १४,४९७, तिवसा १५६०६ ,धामणगाव २०५२५, मोर्शी ३०२७८ व वरुड तालुक्यात २८८३१ क्विंटल खरेदी करण्यात आली.