शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

जिल्ह्यातील ५४ तलाव कोरडे

By admin | Updated: March 29, 2017 00:27 IST

यंदा सरासरीपेक्षा अल्प झालेल्या पावसामुळे उन्हाचा पारा वाढण्यापूर्वीच जिल्ह्यातील ५४ सिंचन तलाव कोरडे पडले आहेत़

दुष्काळाची झळ : गुरे, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती, मार्चअखेरची स्थिती धामणगाव रेल्वे : यंदा सरासरीपेक्षा अल्प झालेल्या पावसामुळे उन्हाचा पारा वाढण्यापूर्वीच जिल्ह्यातील ५४ सिंचन तलाव कोरडे पडले आहेत़ या तलावात पाणीच नसल्यामुळे गावातील शेतात चरायला गेलेले गुरे व वण्यप्राणी यांची पाण्यासाठी भटकंती करण्याची पाळी आली आहे़ ही स्थिती मार्च महिन्याच्या अखेर असल्यामुळे आगामी मे महिन्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता आहे़जिल्ह्यात जिल्हापरिषद अंतर्गत ६५ सिंचन तलाव आहेत़ या तलावाची खोली सरासरी अडीच मीटर ते चार मीटरपर्यंत आहे़ यंदा या पावसाळ्यात २२ तलाव केवळ १०० टक्के भरले होते, तर ११ तलाव ६० टक्क्यावर तसेच २० तलावात ५०टक्के, ८ तलावांत २५ टक्के व ४ तलावांत १० टक्के जलसाठा नोव्हेंबर महिन्यापर्यंत होता. आता या तलावातील जलसाठा पूर्णत: संपला असून सध्या यातील अनेक तलाव कोरडे पडले आहेत़ गावातील जनावरे सकाळी चरायला गेल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी या तलावाचा मोठा आधार मिळत असत विशेषत:जंगलातील वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता. आता तलावात पाणीच नसल्यामुळे या वन्यप्राण्यांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे़धारणी तालुक्यात असलेल्या १९तलावापैकी केवळ चार तलावात २० टक्के पाणीसाठा आहेत़ दुसऱ्या क्रमांकाचे तिवसा तालुक्यात असलेल्या ११ तलावांपैकी ३ तलावांत एक मीटर जलसाठा आहे़ अमरावती,अचलपूर, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील प्रत्येकी पाच तलावांतील पाणीसाठा संपला तर चांदूर बाजार मोर्शी या तालुक्यातील प्रत्येकी तीन लघुसिंचन तलावात केवळ दिड टक्के जलसाठा वरूड तालुक्यातील सहा लघुसिंचन तलावाची हीच स्थिती असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिलीत़ (तालुका प्रतिनिधी)तापमानवाढ कारणीभूत तलावांमध्ये पाणीसंचय पातळी कमी असते. त्यातच गेल्या दोन आठवड्यांपासून दिवसाच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. त्यामुळे तलावांची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. बहुतांश तलावांत केवळ मृतसाठाच शिल्लक आहे.