शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
2
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
4
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
5
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
6
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
7
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
8
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
9
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
10
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
12
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
13
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
14
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
15
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
16
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
17
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
18
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
19
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
20
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?

जिल्ह्यातील ५४ तलाव कोरडे

By admin | Updated: March 29, 2017 00:27 IST

यंदा सरासरीपेक्षा अल्प झालेल्या पावसामुळे उन्हाचा पारा वाढण्यापूर्वीच जिल्ह्यातील ५४ सिंचन तलाव कोरडे पडले आहेत़

दुष्काळाची झळ : गुरे, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती, मार्चअखेरची स्थिती धामणगाव रेल्वे : यंदा सरासरीपेक्षा अल्प झालेल्या पावसामुळे उन्हाचा पारा वाढण्यापूर्वीच जिल्ह्यातील ५४ सिंचन तलाव कोरडे पडले आहेत़ या तलावात पाणीच नसल्यामुळे गावातील शेतात चरायला गेलेले गुरे व वण्यप्राणी यांची पाण्यासाठी भटकंती करण्याची पाळी आली आहे़ ही स्थिती मार्च महिन्याच्या अखेर असल्यामुळे आगामी मे महिन्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता आहे़जिल्ह्यात जिल्हापरिषद अंतर्गत ६५ सिंचन तलाव आहेत़ या तलावाची खोली सरासरी अडीच मीटर ते चार मीटरपर्यंत आहे़ यंदा या पावसाळ्यात २२ तलाव केवळ १०० टक्के भरले होते, तर ११ तलाव ६० टक्क्यावर तसेच २० तलावात ५०टक्के, ८ तलावांत २५ टक्के व ४ तलावांत १० टक्के जलसाठा नोव्हेंबर महिन्यापर्यंत होता. आता या तलावातील जलसाठा पूर्णत: संपला असून सध्या यातील अनेक तलाव कोरडे पडले आहेत़ गावातील जनावरे सकाळी चरायला गेल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी या तलावाचा मोठा आधार मिळत असत विशेषत:जंगलातील वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता. आता तलावात पाणीच नसल्यामुळे या वन्यप्राण्यांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे़धारणी तालुक्यात असलेल्या १९तलावापैकी केवळ चार तलावात २० टक्के पाणीसाठा आहेत़ दुसऱ्या क्रमांकाचे तिवसा तालुक्यात असलेल्या ११ तलावांपैकी ३ तलावांत एक मीटर जलसाठा आहे़ अमरावती,अचलपूर, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील प्रत्येकी पाच तलावांतील पाणीसाठा संपला तर चांदूर बाजार मोर्शी या तालुक्यातील प्रत्येकी तीन लघुसिंचन तलावात केवळ दिड टक्के जलसाठा वरूड तालुक्यातील सहा लघुसिंचन तलावाची हीच स्थिती असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिलीत़ (तालुका प्रतिनिधी)तापमानवाढ कारणीभूत तलावांमध्ये पाणीसंचय पातळी कमी असते. त्यातच गेल्या दोन आठवड्यांपासून दिवसाच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. त्यामुळे तलावांची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. बहुतांश तलावांत केवळ मृतसाठाच शिल्लक आहे.