शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शासनाकडे मागितले ५३७ कोटी, जिल्हा परिषदेला मिळाले १६५ कोटी

By जितेंद्र दखने | Updated: June 15, 2023 17:15 IST

सर्वसाधारण योजनेत ३१२ कोटी १४ लाखांच्या विकासकामांचे प्लॅनिंग

अमरावती : जिल्हा वार्षिक योजनेतून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ५३७ कोटी १७ लाखांची मागणी असताना शासनाकडून केवळ १६५ कोटी ५४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामधून जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध विभागांतील योजनांवर निधी खर्च केला जाणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण आतापासूनच ३१२ कोटी १४ लाखांच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु विशेष घटक व आदिवासी उपयोजनेतील आराखड्याला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही.

जिल्हा परिषद ही जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विविध योजना व विकासकामे केली जातात. त्यामुळे दरवर्षी शासनाकडून वार्षिक योजनेतून कोट्यवधींचा निधी दिला जातो. या निधीच्या खर्चाला दोन वर्षांची मुदतदेखील दिली. जिल्हा परिषदकडून शासनाकडे निधीची मागणी केली जाते.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत हा निधी जिल्हा परिषदेला मंजूर केला जातो. अशातच यंदा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेकरिता १२० कोटी ६१ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यामधून ३४ कोटी ४१ लाख रुपयांची तरतूद केली आहे. विशेष घटक योजनेत ५९ कोटी ६३ लाखांपैकी ३८ कोटी ८९ लाख रुपये मंजूर आहेत, तर सर्वसाधारण योजनेकरिता ३५६ कोटी ९३ लाख ७० हजार रुपयांची मागणी शासनाकडे केली होती.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAmravatiअमरावती