शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने ५२३ हेक्टरमधील पिके मातीमोल; पाच तालुक्यात नुकसान

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 8, 2023 16:39 IST

११२ घरांची पडझड, दोन गुरे मृत

अमरावती : महिनाभरात तिसऱ्यांदा जोरदार वादळासह अवकाळीने नुकसान केले आहे. शुक्रवारी २४ तासांत सरासरी १३.६ मिमी पावसाची नोंद झाली. या आपत्तीमध्ये पाच तालुक्यातील ५२३ हेक्टरमधील पिके मातीमोल झाली आहेत. याशिवाय ११२ घरांची पडझड झाली. यामध्ये एक व्यक्ती मृत तर दोन जखमी झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी एक नंतर वादळ विजांसह तासभर पावसाने दणका दिल्यानंतरही सायंकाळनंतर पुन्हा पावसाची रिपरिप सुरुच होती. जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाची नोंद झाली असली तरी पाच तालुक्यात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस झाल्याने गहू, कांदा, मिरची, लिंबू, संत्रा, आंबा, हरभरा व भाजीपाला पिकांचे ५२३ हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे. याशिवाय वीज पडून एकाचा मृत्यू व दोघे जखमी झाले आहेत. दोन जनावरे आपत्तीमध्ये मृत झाली आहेत.जोरदार वाऱ्यासह आलेला पाऊस व काही ठिकाणी झालेली गारपीट, यामुळे १११ घरांचे अंशत: व एक घर पुर्णत: नष्ट झाले आहे. याशिवाय दोन गोठ्याचेही नुकसान झाले आहे.अमरावती, अंजनगाव सुर्जीत सर्वाधिक नुकसान

जोरदार वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने अंजनगाव सुर्जी तालुक्यात २८८ हेक्टर व अमरावती तालुक्यात १६० हेक्टरमधील रबी पिके व फळपिकांचे नुकसान झाले. याशिवाय भातकुली तालुक्यात ३४,८० हेक्टर, दर्यापूर १२ हेक्टर व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात २८ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे.

टॅग्स :weatherहवामानRainपाऊसAmravatiअमरावती