शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

51 फुटांच्या रावण पुतळ्याचे अंबानगरीत दहन, अमरावतीकरांनी केली तोबागर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 20:33 IST

विजयादशमीच्या शुभपर्वावर अंबानगरीत ५१ फुटाच्या दहातोंडी रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले. २८ वर्षांनंतर  शनिवारी झालेल्या रावण दहनाला अमरावतीकरांनी तोबागर्दी केली.  

अमरावती : विजयादशमीच्या शुभपर्वावर अंबानगरीत ५१ फुटाच्या दहातोंडी रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले. २८ वर्षांनंतर  शनिवारी झालेल्या रावण दहनाला अमरावतीकरांनी तोबागर्दी केली.   विश्व हिंदू महासंघाचे अध्यक्ष तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष महंत मुकेशनाथ व महामंत्री हेमेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्हाध्यक्ष आशीष राठी यांनी रावण दहनाचा कार्यक्रम यशस्वी केला. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी प्रत्यंचा ताणून रावणाच्या दिशेने बाण सोडला आणि क्षणार्धात रावण दहन झाले.   यावेळी मंचावर कार्यक्रम अध्यक्ष नितीन धांडे, प्रमुख अतिथी महंत मुकेशनाथजी, हेमेंद्र जोशी, आ. सुनिल देशमुख, नितीन देशपांडे, महापौर संजय नरवणे, महापालिका आयुक्त हेमंत पवार, माजी आमदार जगदीश गुप्ता, शिवसेनेचे सुनिल खराटे, सरिता सोनी, राजु राठी, पदमा खानझोडे, प्रदिप शिगोंरे, सिमेश श्राफ, विनोद लखोटिया, राजाभाऊ खारकर, किशोर जाधव, विशाल कुळकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सुनील अग्रवाल, तर संचालन माधुरी छावसरीया यांनी केले. नियोजनबध्द बंदोबस्त-रावण दहन कार्यक्रमास काही महिला संघटनांनी विरोध दर्शविला होता. कार्यक्रमस्थळी विरोध होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी बंदोबस्ताचे विशेष नियोजन केले होते. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या नेत्तृत्वात ठाणेदार मनीष ठाकरे, अर्जुन ठोसरे, पंजाब वंजारी यांच्यासह पोलिसांनी सुनियोजीत बंदोबस्त लावल्याने अतिशय  उत्साहात रावण दहन पार पडले. रावण दहन विरोधी संघर्ष समितीच्या महानंदा टेकाम यांच्यासह २० ते २५ महिलांनी रावण दहनाला विरोध दर्शवून जयस्तंभ चौकाजवळ घोषणाबाजी केली. त्यामुळे शहर कोतवाली पोलिसांनी कार्यक्रम संपेपर्यंत महिलांना ताब्यात घेतले होते.