शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पाणी चिंता मिटली; पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत ६८.२० टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 20:33 IST

दोन मोठे प्रकल्प १०० टक्के : पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटला

संदीप मानकर/अमरावती : गेल्या दोन आठवड्यात झालेल्या सार्वत्रिक तथा दमदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ  झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्प शंभर टक्के भरला असून, १२ सेंमीने ११ दारे उघडण्यात आली आहेत. 

यवतमाळ जिल्ह्यतील बेंबळा प्रकल्पातसुद्धा शंभर टक्के पाणीसाठा साचला असून, २५ सेंमीने दोन दारे उघडण्यात आली असून, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे. दोन दिवसांपासून पावसाने उसंत दिली आहे. २२ सप्टेंबरला सकाळी ७ वाजेपर्यंत जलसंपदा विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ६८.२० टक्के पाणीसाठा असल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी काही प्रकल्पांत अद्यापही अपेक्षित पाणीसाठा जमा झालेला नाही. परतीच्या पावसात प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ७५.९१ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ४९.७२ टक्के पाणीसाठा आहे. अरुणावती प्रकल्पात  सर्वात कमी १३.९१ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ३४.३३ टक्के, वान ९६.६२ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ४६.४४ टक्के, पेनटाकळी ९७.१० टक्के, खडकपूर्णा ४९.७८ टक्के पाणीसाठा साचला आहे. वान प्रकल्पाचे १५ सेंमीने दोन दारे उघडण्यात आली आहेत. ४६९ लघु प्रकल्पांचाही पाणीसाठा वाढत असून ५४.७० टक्के पाणीसाठा साचला आहे. ५०२ प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३१७४.११ दलघमी एवढा असून आजचा  उपयुक्त पाणीसाठा हा २१६४.७५ दलघमी आहे. 

२४ मध्यम प्रकल्पांत सरासरी ७४.१४ टक्के पाणीसाठाअमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात ९५ टक्के पाणीसाठा साचला आहे. चंद्रभागा प्रकल्पात ९५.४७ टक्के,  पूर्णा प्रकल्पात ९२.७९ टक्के, सपन ९६.२७ टक्के  पाणीसाठा साचला असून, जिल्ह्यातील चारही प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस प्रकल्पात ९९.१६ टक्के  पाणीसाठा आहे. सायखेडा १०० टक्के, गोकी ५३.०६ टक्के, वाघाडी ८४.४२  टक्के, बोरगांव १०० टक्के, नवरगाव १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा ६१.८७ टक्के, मोेर्णा ५१.०६ टक्के, घुंगशी बॅरेज २.०८ टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पात ३१ टक्के, सोनल ५२.६० टक्के, एकबुर्जी ५४.८७ टक्के, बुलडाणा जिल्ह्यतील ज्ञानगंगा १०० टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोराडी शून्य टक्के, मन ७३.१४  टक्के, तोरणा १०० टक्के, उतावळी ९८.१३  टक्के पाणीसाठा साचला आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भwater shortageपाणीकपात