शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

पाणी चिंता मिटली; पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत ६८.२० टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 20:33 IST

दोन मोठे प्रकल्प १०० टक्के : पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटला

संदीप मानकर/अमरावती : गेल्या दोन आठवड्यात झालेल्या सार्वत्रिक तथा दमदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ  झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्प शंभर टक्के भरला असून, १२ सेंमीने ११ दारे उघडण्यात आली आहेत. 

यवतमाळ जिल्ह्यतील बेंबळा प्रकल्पातसुद्धा शंभर टक्के पाणीसाठा साचला असून, २५ सेंमीने दोन दारे उघडण्यात आली असून, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे. दोन दिवसांपासून पावसाने उसंत दिली आहे. २२ सप्टेंबरला सकाळी ७ वाजेपर्यंत जलसंपदा विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ६८.२० टक्के पाणीसाठा असल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी काही प्रकल्पांत अद्यापही अपेक्षित पाणीसाठा जमा झालेला नाही. परतीच्या पावसात प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ७५.९१ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ४९.७२ टक्के पाणीसाठा आहे. अरुणावती प्रकल्पात  सर्वात कमी १३.९१ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ३४.३३ टक्के, वान ९६.६२ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ४६.४४ टक्के, पेनटाकळी ९७.१० टक्के, खडकपूर्णा ४९.७८ टक्के पाणीसाठा साचला आहे. वान प्रकल्पाचे १५ सेंमीने दोन दारे उघडण्यात आली आहेत. ४६९ लघु प्रकल्पांचाही पाणीसाठा वाढत असून ५४.७० टक्के पाणीसाठा साचला आहे. ५०२ प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३१७४.११ दलघमी एवढा असून आजचा  उपयुक्त पाणीसाठा हा २१६४.७५ दलघमी आहे. 

२४ मध्यम प्रकल्पांत सरासरी ७४.१४ टक्के पाणीसाठाअमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात ९५ टक्के पाणीसाठा साचला आहे. चंद्रभागा प्रकल्पात ९५.४७ टक्के,  पूर्णा प्रकल्पात ९२.७९ टक्के, सपन ९६.२७ टक्के  पाणीसाठा साचला असून, जिल्ह्यातील चारही प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस प्रकल्पात ९९.१६ टक्के  पाणीसाठा आहे. सायखेडा १०० टक्के, गोकी ५३.०६ टक्के, वाघाडी ८४.४२  टक्के, बोरगांव १०० टक्के, नवरगाव १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा ६१.८७ टक्के, मोेर्णा ५१.०६ टक्के, घुंगशी बॅरेज २.०८ टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पात ३१ टक्के, सोनल ५२.६० टक्के, एकबुर्जी ५४.८७ टक्के, बुलडाणा जिल्ह्यतील ज्ञानगंगा १०० टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोराडी शून्य टक्के, मन ७३.१४  टक्के, तोरणा १०० टक्के, उतावळी ९८.१३  टक्के पाणीसाठा साचला आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भwater shortageपाणीकपात