शहरं
Join us  
Trending Stories
1
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
4
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
5
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
6
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
7
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
8
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
9
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
10
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
11
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
12
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
13
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
14
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
15
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
16
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
17
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
18
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
19
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
20
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 

सोयाबीन उत्पादकांचे ५०० कोटींवर नुकसान

By admin | Updated: October 30, 2014 22:43 IST

सिंचनाचे संरक्षित क्षेत्र वगळता जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरमधील सोयाबीन क्षेत्रात शेतकऱ्यांना ५०० कोटींपेक्षा अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

संकटांची मालिका : शेंगा पोचट, दाणा बारीक, एकरी उतारा सरासरी दोन पोतेगजानन मोहोड - अमरावतीसिंचनाचे संरक्षित क्षेत्र वगळता जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरमधील सोयाबीन क्षेत्रात शेतकऱ्यांना ५०० कोटींपेक्षा अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. दीड महिना उशिरा झालेली पेरणी, निकृष्ट बियाणे, रोगांचा प्रादुर्भाव, सोयाबीन फुलोरावर व शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पावसाने दिलेली दडी यामुळे सोयाबीनच्या शेंगा पोचट राहिल्या, दाणे बारीक झालेत. करपलेली रोपे शेतातच सडली. परिणामी मळणीनंतर शेतकऱ्यांचा अर्धा उत्पादन खर्चदेखील निघालेला नाही. दोन वर्षांपासून सोयाबीन पीक धोक्यात येत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कपाशीवर वारंवार बोंडअळी व अन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने उत्पादन खर्चही पदरी पडत नाही. त्यामुळे गेल्या दशकापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मूग, उडदासारखेच अल्पकालावधीमधील सोयाबीन पेरण्यास सुरुवात केली. यंदा खरीप हंगामात ७ लाख १४ हजार एकूण पेरणीक्षेत्रापैकी ३ लाख १९ हजार ९८५ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. मात्र, जून महिन्यापासून दीड महिन्यापर्यंत पावसाने दडी दिली. जुलैच्या अखेरच्या आठवड्यापासून पेरणीला सुरुवात झाली. मात्र, पुन्हा पावसाचा खंड पडल्याने तसेच उगवणशक्ती कमी असणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे दुबार पेरणीची वेळ आली. पेरणीचा कालावधी संपल्यानंतरच्या पेरणीमुळे सोयाबीनच्या वाढीसाठी पुरेसा अवधी मिळाला नाही. निकृष्ट बियाणे, दिवसाचे उष्ण तापमान, रात्रीची थंडी व जमिनीत नसलेली आर्द्रता यामुळे पिकावर पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव झाला. तसेच करप्या रोगामुळे रोपे शेतात सडू लागली. यामुळे सरासरी उत्पन्नात ५० टक्क्यांवर घट येण्याची शक्यता निर्माण झाली. पावसाच्या दृष्टीने सोयाबीन हे अतिसंवेदनशील पीक आहे. १० ते १२ दिवसांच्या अंतराने त्याला पाण्याची आवश्यकता असते. विशेषत: फुलोेर आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत पावसाची गरज असते. परंतु याच कालावधीत पाऊस बेपत्ता झाल्याने शेंगा पोचट होऊन दाणा बारीक झाला आहे. सध्या सोयाबीन कापणी व मळणीचा हंगाम सुरू आहे. एकरी १० हजारांवर उत्पादन खर्च असताना सरासरी १ किंवा २ पोत्यांचा उतारा शेतकऱ्यांना मिळत आहे.