शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

सोयाबीन उत्पादकांचे ५०० कोटींवर नुकसान

By admin | Updated: October 30, 2014 22:43 IST

सिंचनाचे संरक्षित क्षेत्र वगळता जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरमधील सोयाबीन क्षेत्रात शेतकऱ्यांना ५०० कोटींपेक्षा अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

संकटांची मालिका : शेंगा पोचट, दाणा बारीक, एकरी उतारा सरासरी दोन पोतेगजानन मोहोड - अमरावतीसिंचनाचे संरक्षित क्षेत्र वगळता जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरमधील सोयाबीन क्षेत्रात शेतकऱ्यांना ५०० कोटींपेक्षा अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. दीड महिना उशिरा झालेली पेरणी, निकृष्ट बियाणे, रोगांचा प्रादुर्भाव, सोयाबीन फुलोरावर व शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पावसाने दिलेली दडी यामुळे सोयाबीनच्या शेंगा पोचट राहिल्या, दाणे बारीक झालेत. करपलेली रोपे शेतातच सडली. परिणामी मळणीनंतर शेतकऱ्यांचा अर्धा उत्पादन खर्चदेखील निघालेला नाही. दोन वर्षांपासून सोयाबीन पीक धोक्यात येत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कपाशीवर वारंवार बोंडअळी व अन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने उत्पादन खर्चही पदरी पडत नाही. त्यामुळे गेल्या दशकापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मूग, उडदासारखेच अल्पकालावधीमधील सोयाबीन पेरण्यास सुरुवात केली. यंदा खरीप हंगामात ७ लाख १४ हजार एकूण पेरणीक्षेत्रापैकी ३ लाख १९ हजार ९८५ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. मात्र, जून महिन्यापासून दीड महिन्यापर्यंत पावसाने दडी दिली. जुलैच्या अखेरच्या आठवड्यापासून पेरणीला सुरुवात झाली. मात्र, पुन्हा पावसाचा खंड पडल्याने तसेच उगवणशक्ती कमी असणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे दुबार पेरणीची वेळ आली. पेरणीचा कालावधी संपल्यानंतरच्या पेरणीमुळे सोयाबीनच्या वाढीसाठी पुरेसा अवधी मिळाला नाही. निकृष्ट बियाणे, दिवसाचे उष्ण तापमान, रात्रीची थंडी व जमिनीत नसलेली आर्द्रता यामुळे पिकावर पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव झाला. तसेच करप्या रोगामुळे रोपे शेतात सडू लागली. यामुळे सरासरी उत्पन्नात ५० टक्क्यांवर घट येण्याची शक्यता निर्माण झाली. पावसाच्या दृष्टीने सोयाबीन हे अतिसंवेदनशील पीक आहे. १० ते १२ दिवसांच्या अंतराने त्याला पाण्याची आवश्यकता असते. विशेषत: फुलोेर आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत पावसाची गरज असते. परंतु याच कालावधीत पाऊस बेपत्ता झाल्याने शेंगा पोचट होऊन दाणा बारीक झाला आहे. सध्या सोयाबीन कापणी व मळणीचा हंगाम सुरू आहे. एकरी १० हजारांवर उत्पादन खर्च असताना सरासरी १ किंवा २ पोत्यांचा उतारा शेतकऱ्यांना मिळत आहे.