शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

एसटीत मामा, मामीजी फुकट अन् सुनेला हाफ तिकीट..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 14:49 IST

मेळघाटच्या तीनशेपैकी केवळ ८० पाड्यांतच पोहोचते एसटी : परतवाडा आगारात ७२ पैकी ५७ बस गाड्या सुस्थितीत

नरेंद्र जावरे 

परतवाडा (अमरावती) : शासनाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत दिली. त्याचा फायदा शहरी नागरिकांना घेता येत असला तरी मेळघाटसह जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात बसफेऱ्या जात नसल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. मेळघाटच्या ३०० पैकी तब्बल २२० पाड्यांत एसटी पोहोचत नसल्याचे गंभीर चित्र आहे. परिणामी, योजनेच्या फायद्यासाठी बस गाड्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागात परिवहन मंडळाचे सर्वांत मोठे आगार परतवाडा आहे. मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर असलेल्या या आगारातून अमरावती, अकोला जिल्हास्तरावर, तर अचलपूर, धारणी, चिखलदरा, चांदूर बाजार, अंजनगाव, दर्यापूर, वरूड, मोर्शी येथे दिवसभर फेऱ्या होतात. भंगार बसचे आगार म्हणून आता याची ओळख झाली आहे. शासनाच्या मोफत आणि अर्ध्या सवलतीची तिकीट योजना यामुळे प्रवासी संख्या वाढली आहे. ‘सासू-सासरे मोफत, सुनेला हाफ तिकीट’ अशी स्थिती झाली आहे. तथापि, खासगी वाहनांकडे वळलेला प्रवासी वर्ग एसटीकडे वळला तरी बस गाड्या भंगार आणि अल्प प्रमाणात असल्याचे चित्र आहे.

चार हजार हाफ तिकीट, दोन हजार फुकट

७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास योजनेचा लाभ एकट्या परतवाडा आगारात दररोज दोन हजार नागरिक घेत आहेत. पाच दिवसांपूर्वी महिलांना ५० टक्के तिकिटाचा लाभ चार ते साडेचार हजारांपर्यंत गेला असून, येत्या दिवसांत तो वाढणार आहे.

अमरावती, अकोलासह अनेक फेऱ्या बंद

जिल्ह्यात ग्रामीण भागातील मोठे आगार परतवाडा आहे. अमरावतीसाठी १६ तर अकोल्यासाठी १२ अशा २८ व ग्रामीण भागासह मेळघाटातील अनेक फेऱ्या बस गाड्यांअभावी बंद आहेत. परिणामी, प्रवाशांना खासगी आणि इतर वाहनांचा आश्रय घ्यावा लागत आहे.

पाच लाख उत्पन्न, पंधरा बसगाड्यांची गरज

परतवाडा आगारात १४२ चालक व १२६ वाहक कार्यरत असून, पाच शिवशाही मिळून ५७ बस गाड्या आहेत. २०१९ मध्ये एकूण ७० बस गाड्या होत्या. परिणामी १५ पेक्षा अधिक बस गाड्यांची गरज आहे. त्यातील पाच अमरावती येथे दुरुस्तीसाठी पडून आहेत.

आदिवासी, ग्रामीण भाग आजही वंचितच

मेळघाटात मानव विकास अंतर्गत ११ बस गाड्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील ३०० पेक्षा अधिक पाड्यांपैकी केवळ ८० पाड्यांत धावतात. त्यामुळे हजारो आदिवासींच्या गावात आजही एसटी जात नसल्याचे वास्तव आहे. परतवाडा आगारात पुरेशा बस गाड्याच नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही.

प्रवासी संख्या वाढली आहे. अमरावती - अकोला मार्गावरील फेऱ्या कमी झाल्या आहेत. मेळघाटातील फेऱ्या बंद आहेत. नवीन बसची मागणी आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- जीवन वानखडे, आगर व्यवस्थापक, परतवाडा

टॅग्स :state transportएसटीAmravatiअमरावतीWomenमहिला