शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

पाच ग्रा.पं.ची निवडणूक घोषित

By admin | Updated: March 13, 2016 00:05 IST

जिल्ह्यात मे ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या पाच ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ७९ ग्रामपंचायतींच्या १०९ रिक्त सदस्यपदाची निवडणूक ....

आचारसंहिता लागू : १७ ला मतदान, १८ एप्रिल रोजी मतमोजणीअमरावती : जिल्ह्यात मे ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या पाच ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ७९ ग्रामपंचायतींच्या १०९ रिक्त सदस्यपदाची निवडणूक आयोगाने शुक्रवारी उशिरा जाहीर केली. या निवडणुकांसाठी १७ एप्रिल रोजी मतदान व १८ ला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांसाठी शुक्रवार १८ मार्चच्या मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू झाली आहे. अमरावती तालुक्यामधील रोहणखेड व उंबरखेड तसेच तिवसा तालुक्यामधील आखतवाडा, कवाडगव्हाण व घोटा या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व चिखलदरा तालुक्यामधील सोनापूर, टेंभूरसोडा, हतरू, रुईपठार, चिंचखेड, रायपूर, माखला, खिरपानी, सोमठाना खुर्द, अढाव, आमझरी, काकदरी, तिवसा तालुक्यामधील सार्सी, अनकवाडी, दुर्गवाडा, मोर्शी तालुक्यातील वणी, गोराळा, बेलोना, शिरुर, मायवाडी, नशिरपूर, लिहिदा, भाईपूर, पोरगव्हाण, चिंचोली गवळी, मनीमपूर, चांदूरबाजार तालुक्यातील गोविंदपूर, कल्होडी, खरपी, मासोद, मिर्झापूर, तळणीपूर्णा, धानोरापूर्णा, चांदूररेल्वे तालुक्यांमधील कळमगाव, पाथरगाव आदी ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पदासाठी ही निवडणूक होत आहे. ३० दिवसांत खर्च सादर करणे बंधनकारकअमरावती : तालुक्यामधील बोरगाव धर्माळे, कुंड सर्जापूर, माहुली जहागीर, सावर्डी, काटआमला, वरूड तालुक्यामधील गणेशपूर, बेनोडा, धारणी तालुक्यामधील कुसमकोट, विरोटी, सावलीखेडा, रेहट्या, नांदुरी, खाऱ्याटेंभरू, चटवाबोळ, कुटंगा, सुसर्दा, कारादा, दादरा, हिराबंबई, काटकुंभ, अचलपूर तालुक्यातील निमदरी, बेलखेडा, पिंपळखुटा, भातकुली तालुक्यामधील बैलमारखेडा, मार्की, वातोडा, म्हैसपूर, कुमागड, धामणगाव रेल्वे तालुक्यामधील जळगाव, निंबोली, कळासी, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा शिक्रा, दर्यापूर तालुक्यातील घोडचंदी, घडा, जसापूर, सुरळी, चंद्रपूर, उमरी, पिंपळखुटा व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली खुर्द, चिंचोली बु., खोडगाव या ७९ ग्रामपंचायतींच्या १०९ रिक्त सदस्यपदांसाठी ही निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतीसाठी संबंधित परिक्षेत्रात शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्जासह पूर्ण निवडणूक प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने राबविण्यात येणार आहे व उमेदवारांना जंगम मालमत्ता, दोषसिद्धीनंतर झालेली शिक्षा व शिक्षण इत्यादीबाबत घोषणापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हे घोषणापत्र घेण्याविषयी सूचना आयोगाने दिल्या आहेत. निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना व बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनासुद्धा दैनंदिन खर्चाचा हिशोब निवडणूक निकाल जाहिर झाल्याच्या ३० दिवसाचे आत दाखल करणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)