शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

पाच ग्रा.पं.ची निवडणूक घोषित

By admin | Updated: March 13, 2016 00:05 IST

जिल्ह्यात मे ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या पाच ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ७९ ग्रामपंचायतींच्या १०९ रिक्त सदस्यपदाची निवडणूक ....

आचारसंहिता लागू : १७ ला मतदान, १८ एप्रिल रोजी मतमोजणीअमरावती : जिल्ह्यात मे ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या पाच ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ७९ ग्रामपंचायतींच्या १०९ रिक्त सदस्यपदाची निवडणूक आयोगाने शुक्रवारी उशिरा जाहीर केली. या निवडणुकांसाठी १७ एप्रिल रोजी मतदान व १८ ला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांसाठी शुक्रवार १८ मार्चच्या मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू झाली आहे. अमरावती तालुक्यामधील रोहणखेड व उंबरखेड तसेच तिवसा तालुक्यामधील आखतवाडा, कवाडगव्हाण व घोटा या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व चिखलदरा तालुक्यामधील सोनापूर, टेंभूरसोडा, हतरू, रुईपठार, चिंचखेड, रायपूर, माखला, खिरपानी, सोमठाना खुर्द, अढाव, आमझरी, काकदरी, तिवसा तालुक्यामधील सार्सी, अनकवाडी, दुर्गवाडा, मोर्शी तालुक्यातील वणी, गोराळा, बेलोना, शिरुर, मायवाडी, नशिरपूर, लिहिदा, भाईपूर, पोरगव्हाण, चिंचोली गवळी, मनीमपूर, चांदूरबाजार तालुक्यातील गोविंदपूर, कल्होडी, खरपी, मासोद, मिर्झापूर, तळणीपूर्णा, धानोरापूर्णा, चांदूररेल्वे तालुक्यांमधील कळमगाव, पाथरगाव आदी ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पदासाठी ही निवडणूक होत आहे. ३० दिवसांत खर्च सादर करणे बंधनकारकअमरावती : तालुक्यामधील बोरगाव धर्माळे, कुंड सर्जापूर, माहुली जहागीर, सावर्डी, काटआमला, वरूड तालुक्यामधील गणेशपूर, बेनोडा, धारणी तालुक्यामधील कुसमकोट, विरोटी, सावलीखेडा, रेहट्या, नांदुरी, खाऱ्याटेंभरू, चटवाबोळ, कुटंगा, सुसर्दा, कारादा, दादरा, हिराबंबई, काटकुंभ, अचलपूर तालुक्यातील निमदरी, बेलखेडा, पिंपळखुटा, भातकुली तालुक्यामधील बैलमारखेडा, मार्की, वातोडा, म्हैसपूर, कुमागड, धामणगाव रेल्वे तालुक्यामधील जळगाव, निंबोली, कळासी, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा शिक्रा, दर्यापूर तालुक्यातील घोडचंदी, घडा, जसापूर, सुरळी, चंद्रपूर, उमरी, पिंपळखुटा व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली खुर्द, चिंचोली बु., खोडगाव या ७९ ग्रामपंचायतींच्या १०९ रिक्त सदस्यपदांसाठी ही निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतीसाठी संबंधित परिक्षेत्रात शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्जासह पूर्ण निवडणूक प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने राबविण्यात येणार आहे व उमेदवारांना जंगम मालमत्ता, दोषसिद्धीनंतर झालेली शिक्षा व शिक्षण इत्यादीबाबत घोषणापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हे घोषणापत्र घेण्याविषयी सूचना आयोगाने दिल्या आहेत. निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना व बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनासुद्धा दैनंदिन खर्चाचा हिशोब निवडणूक निकाल जाहिर झाल्याच्या ३० दिवसाचे आत दाखल करणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)