शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

४८.२२ कोटींच्या पाणीपुरवठा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या दालनात

By admin | Updated: February 9, 2015 23:05 IST

भविष्यात पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नगरोत्थान योजनेतंर्गत अमरावती व बडनेरा शहरासाठी ४८.२२ कोटींच्या वाढीव पाणी पुरवठा योजना प्रस्ताव तयार केला आहे.

अमरावती : भविष्यात पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नगरोत्थान योजनेतंर्गत अमरावती व बडनेरा शहरासाठी ४८.२२ कोटींच्या वाढीव पाणी पुरवठा योजना प्रस्ताव तयार केला आहे. मात्र या योजनेची फाईल मुख्यमंत्र्यांच्या दालनात मंजुरीच्या प्रतीक्षेत असून ती लवकर मार्गी लागावी, यासाठी आमदारांच्या रेट्याची गरज आहे.नगरोत्थान अंतर्गत शासन अनुदान आणि लोकवर्गणीतून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या अनुषंगाने जीवन प्राधिकरणाने वाढीव पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव मागील दोन वर्षांपूर्वी तयार केला होता. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींचा शासन स्तरावर रेटा कमी पडल्याने ही योजना प्रलंबित राहिली. मात्र शहराचे विस्तारीकरण झपाट्याने वाढत चालल्याने नागरिकांच्या मागणीनुसार पिण्याच्या पाण्याची निकड लक्षात घेता ती पुरविण्याचा दृष्टीने जीवन प्राधिकरणाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. वाढीव पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव शासनाने मंजूर करावा, यासाठी महापालिका आमसभेत ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे. या योजनेच्या पूर्णत्वासाठी जीवन प्राधिकरणाने ३० टक्के निधी खर्च करण्याची तयारी देखील केली आहे. केवळ शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा असून नगरोत्थान अंतर्गत अनुदान सुद्धा उपलब्ध आहे. एकदा वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली की, भीषण पाणी समस्येतून नागरिकांना मुक्तता मिळेल, हे वास्तव आहे. यापुर्वी ही योजना ४४.४४ कोटी रुपयांची होती. मात्र बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने आता चालू दरानुसार ही योजना ४८.२२ कोटी रुपयांवर पोहचली आहे. ७० टक्के शासन अनुदान तर ३० टक्के लोवर्गणीतून वाढीव पाणी पुरवठ्याची योजना मार्गी लावण्याचे निकष आहे. येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने २८ जानेवारी २०१५ रोजी नगरपरिषद संचालनालयाचे उपसंचालक यांच्याकडे वाढीव पाणी पुरवठा योजनेचा सुधारीत प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अरविंद सोनार यांनी दिली.(प्रतिनिधी)