शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

४४ प्रवासी मृत्यूच्या दारात पण रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी वाचविले प्राण

By गणेश वासनिक | Updated: December 30, 2023 17:18 IST

मध्य रेल्वेत ‘मिशन जीवन रक्षक’ मोहीम, एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ दरम्यानच्या विविध घटना

अमरावती : रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) कर्मचारी मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी नेहमीच आघाडीवर आहेत. २४ तास जागरूक हे त्यांच्या कर्तव्याची उद्दिष्टे आहेत. मात्र एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या दरम्यान रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ४४ प्रवाशांचे प्राण वाचविले आहेत.मध्य रेल्वे रेल्वे सुरक्षा बलाच्या जवान ‘मिशन जीवन रक्षक’ या मोहिमेचा एक भाग म्हणून प्रवाशांच्या मदतीला धावून जातात. आरपीएफने ज्या प्रवाशांचे प्राण वाचविले, त्या घटनांचे दृष्य वृत्तपत्र वा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप लोकप्रिय झाले आणि विविध समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. या ४४ घटनांपैकी एकट्या मुंबई विभागात जीव वाचविणाच्या एकूण २१ घटनांची नोंद झाली आहे. भुसावळ विभागात १५, पुणे विभागात ४, तर नागपूर विभागात २ आणि सोलापूर विभागात दोन जीव वाचविण्याच्या घटनांची नोंद झाली आहे.रेल्वे सुरक्षा बलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत होणारा अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका तसेच रेल्वे मध्ये आणि रेल्वे परिसरात अमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळविणे आदी विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो आणि त्याप्रमाणे ते आपले लक्ष प्रवाशांच्या सुरक्षेवर केंद्रित करून असतात.धावत्या ट्रेनमध्ये चढणे, उतरणे अथवा आत्महत्येचा प्रयत्नातून जीव वाचविलेरेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेने विविध प्रकरणांमध्ये प्रवाशांचे प्राण वाचविले आहेत. यात प्रवासी काहीवेळा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोका पत्करतात. काहीवेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करतानादेखील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी लोकांचे जीव वाचविले आहे. शेवटी एखाद्याचा जीव वाचविण्याच्या या कृतीचा रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांप्रती आनंद आणि कृतज्ञता वाढवतो.ट्रेन सुटण्याच्या वेळापत्रकाच्या अगोदर स्थानकावर पोहोचण्याचा प्रयत्न करावा. प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून चढू अथवा उतरू नये व जीव धोक्यात घालू नये. रेल्वे प्रवासाचे नियोजन करावे.शिवाजी मानसपुरे,जनसंपर्क अधिकारी, भुसावळ मध्य रेल्वे

टॅग्स :railwayरेल्वे