शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

४३ नमुने निगेटिव्ह; एक पाठविला पुनर्तपासणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयाने शुक्रवारी १० व तत्पूर्वी ३४ असे ४४ नागरिकांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. शुक्रवारी तपासणीला पाठविलेल्या अहवालातील नऊ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक नमुना तपासणीसाठी तांत्रिक त्रुटीमुळे नाकारला गेला. तो पुन्हा पाठविण्यात येणार आहे. शनिवारी चार नागरिकांचे थ्रोट स्वॅब पाठविण्यात आले. त्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी । परदेशातून १४० प्रवासी परतले; १३५ जणांशी पथकाचा संपर्क

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : परदेशातून परतलेल्या नागरिकांचे शुक्रवारपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले ४३ थ्रोट स्वॅबचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता, योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. यादरम्यान अशा १४० जणांपैकी १३५ व्यक्तींशी पथकांचा संपर्क झाला आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयाने शुक्रवारी १० व तत्पूर्वी ३४ असे ४४ नागरिकांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. शुक्रवारी तपासणीला पाठविलेल्या अहवालातील नऊ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक नमुना तपासणीसाठी तांत्रिक त्रुटीमुळे नाकारला गेला. तो पुन्हा पाठविण्यात येणार आहे. शनिवारी चार नागरिकांचे थ्रोट स्वॅब पाठविण्यात आले. त्यांचा अहवाल प्रलंबित आहे.कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी, होम क्वारंटाइन आदी उपाययोजना होत आहेत. पथकांकडून प्रवाशांशी संपर्क व पाठपुरावा होत आहे. जिल्ह्यात रेल्वे, एसटी व खासगी बसमधील प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. आंतरराज्य सीमेवरही पथके नेमण्यात आली आहेत. आरोग्य विभागाकडून यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयात आससोलेशन कक्षही तयार करण्यात आला आहे. वलगाव येथे विलगीकरण क्षेत्रही तयार करण्यात आले असून, सर्व आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्या दृष्टीने विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातही आवश्यकता भासल्यास आयसोलेशन, क्वारंटाइन आदींच्या अनुषंगाने कक्ष सुसज्ज ठेवावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी येथील भेटीदरम्यान दिले.आंतरराज्य सीमा भागात वाहनांची तपासणीकोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्याशी संलग्न आंतरराज्यीय सीमेवर पोलीस व परिवहन विभागामार्फत चेकपोस्ट, तपासणी पथके तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. परराज्यांतून येणाºया वाहनांची तपासणी करावी. प्रवासी व चालक यांची सर्वसाधारण तपासणी करावी. ताप, खोकला, सर्दी व इतर लक्षणे आढळल्यास तात्काळ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना व नियंत्रण कक्षाला कळविण्याचे निर्देश देण्यात आले.शासकीय रुग्णालयांच्या २०० मीटर अंतरात दुकानबंदीजिल्ह्यात शासकीय रुग्णालयांच्या २०० मीटर हद्दीतील सर्व पानटपºया, चहा कँटीन, फेरीवाले यांची दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यामधून किराणा, दूध, भाजी, औषधविक्री दुकाने वगळली आहेत. उल्लंघन केल्यास भादंविचे कलम १८८ अन्वये कारवाई होणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस