शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
3
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
5
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
6
सारा खान झाली मिसेस पाठक! क्रिशसोबत बांधली लग्नगाठ; सासरे सुनील लहरी गैरहजर?
7
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
8
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
9
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
10
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
11
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
12
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
13
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
14
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
16
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
17
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
18
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
19
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
20
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

४३ नमुने निगेटिव्ह; एक पाठविला पुनर्तपासणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयाने शुक्रवारी १० व तत्पूर्वी ३४ असे ४४ नागरिकांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. शुक्रवारी तपासणीला पाठविलेल्या अहवालातील नऊ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक नमुना तपासणीसाठी तांत्रिक त्रुटीमुळे नाकारला गेला. तो पुन्हा पाठविण्यात येणार आहे. शनिवारी चार नागरिकांचे थ्रोट स्वॅब पाठविण्यात आले. त्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी । परदेशातून १४० प्रवासी परतले; १३५ जणांशी पथकाचा संपर्क

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : परदेशातून परतलेल्या नागरिकांचे शुक्रवारपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले ४३ थ्रोट स्वॅबचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता, योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. यादरम्यान अशा १४० जणांपैकी १३५ व्यक्तींशी पथकांचा संपर्क झाला आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयाने शुक्रवारी १० व तत्पूर्वी ३४ असे ४४ नागरिकांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. शुक्रवारी तपासणीला पाठविलेल्या अहवालातील नऊ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक नमुना तपासणीसाठी तांत्रिक त्रुटीमुळे नाकारला गेला. तो पुन्हा पाठविण्यात येणार आहे. शनिवारी चार नागरिकांचे थ्रोट स्वॅब पाठविण्यात आले. त्यांचा अहवाल प्रलंबित आहे.कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी, होम क्वारंटाइन आदी उपाययोजना होत आहेत. पथकांकडून प्रवाशांशी संपर्क व पाठपुरावा होत आहे. जिल्ह्यात रेल्वे, एसटी व खासगी बसमधील प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. आंतरराज्य सीमेवरही पथके नेमण्यात आली आहेत. आरोग्य विभागाकडून यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयात आससोलेशन कक्षही तयार करण्यात आला आहे. वलगाव येथे विलगीकरण क्षेत्रही तयार करण्यात आले असून, सर्व आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्या दृष्टीने विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातही आवश्यकता भासल्यास आयसोलेशन, क्वारंटाइन आदींच्या अनुषंगाने कक्ष सुसज्ज ठेवावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी येथील भेटीदरम्यान दिले.आंतरराज्य सीमा भागात वाहनांची तपासणीकोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्याशी संलग्न आंतरराज्यीय सीमेवर पोलीस व परिवहन विभागामार्फत चेकपोस्ट, तपासणी पथके तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. परराज्यांतून येणाºया वाहनांची तपासणी करावी. प्रवासी व चालक यांची सर्वसाधारण तपासणी करावी. ताप, खोकला, सर्दी व इतर लक्षणे आढळल्यास तात्काळ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना व नियंत्रण कक्षाला कळविण्याचे निर्देश देण्यात आले.शासकीय रुग्णालयांच्या २०० मीटर अंतरात दुकानबंदीजिल्ह्यात शासकीय रुग्णालयांच्या २०० मीटर हद्दीतील सर्व पानटपºया, चहा कँटीन, फेरीवाले यांची दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यामधून किराणा, दूध, भाजी, औषधविक्री दुकाने वगळली आहेत. उल्लंघन केल्यास भादंविचे कलम १८८ अन्वये कारवाई होणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस