शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

अमरावती जिल्ह्यातील वरूडमध्ये ४०८ घरांमध्ये पुराचे पाणी; दोन हजारांवर नागरिक स्थलांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2022 21:40 IST

Amravati News नदीनाल्यांना आलेला पुरामुळे वरुड तालुक्यातील ४०८ घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या बाधित कुटुंबांतील किमान दोन हजार व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेले आहे.

ठळक मुद्देएक व्यक्ती वाहून गेला; १५ जनावरे मृत

अमरावती : दहा दिवसांची उसंत घेतल्यानंतर पुन्हा पावसाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. २४ तासात वरुड तालुक्यातील पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. नदीनाल्यांना आलेला पुरामुळे वरुड तालुक्यातील ४०८ घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या बाधित कुटुंबांतील किमान दोन हजार व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेले आहे. पुरामध्ये एक व्यक्ती वाहून गेला व त्याचा शोध पथक घेत आहेत. याशिवाय लहान-मोठ्या १५ जनावरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

जिल्ह्यात सार्वत्रिक ३०.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये वरूड तालुक्यात सर्वाधिक ९२ मि.मी. पाऊस झाला आहे. या तालुक्यातील शेंदूरजना घाट मंडळात ११०.२५ मि.मी., पुसला ११०.२५, वरूड ९६.७५, बेनोडा ७५ व वाठोडा १००.७५ मि.मी. पावसाची नोंद झाली. दोन दिवसांपूर्वी लोणी सर्कलमध्ये व त्यापूर्वी २५ जुलै रोजी वरूड तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. या तालुक्यात सरासरीच्या १५२ टक्के पाऊस झालेला आहे.

संततधार पावसामुळे ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचा येवा वाढल्याने पाचव्यांचा १३ ही दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. विसर्ग यावेळी जास्त असल्याने नदीनाल्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले आहे. याशिवाय १४०० हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

४८० घरांची पडझड

अतिवृष्टीमुळे वरुड तालुक्यात ३४९ घरांची व मोर्शी तालुक्यात ३० घरांची पडझड झालेली आहे. याशिवाय वरुड तालुक्यात ८१ घरे पूर्णत: जमीनदोस्त झाली आहेत. या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेले आहे. नुकसानीचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी पंचनामे करीत असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

वर्धा ओव्हरफ्लो; अमरावती - वर्धा राज्यमार्ग बंद

पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचे सर्वच दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीला पूर आलेला आहे व कौंडण्यपूर येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने अमरावती व वर्धा या राज्य महामार्गावरची वाहतूक खोळंबली आहे. याशिवाय नालेदेखील दुथडी भरून वाहत आहेत.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ऊर्ध्व वर्धा, नागठाणा, पाक नदी धरण, सपण, पूर्णा, निम्न वर्धा आदी प्रकल्पांमध्ये अतिवृष्टीमुळे येवा वाढला आहे. त्यामुळे या प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले व विसर्ग सुरू असल्याने नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

टॅग्स :floodपूर