शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

अमरावती जिल्ह्यातील वरूडमध्ये ४०८ घरांमध्ये पुराचे पाणी; दोन हजारांवर नागरिक स्थलांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2022 21:40 IST

Amravati News नदीनाल्यांना आलेला पुरामुळे वरुड तालुक्यातील ४०८ घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या बाधित कुटुंबांतील किमान दोन हजार व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेले आहे.

ठळक मुद्देएक व्यक्ती वाहून गेला; १५ जनावरे मृत

अमरावती : दहा दिवसांची उसंत घेतल्यानंतर पुन्हा पावसाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. २४ तासात वरुड तालुक्यातील पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. नदीनाल्यांना आलेला पुरामुळे वरुड तालुक्यातील ४०८ घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या बाधित कुटुंबांतील किमान दोन हजार व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेले आहे. पुरामध्ये एक व्यक्ती वाहून गेला व त्याचा शोध पथक घेत आहेत. याशिवाय लहान-मोठ्या १५ जनावरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

जिल्ह्यात सार्वत्रिक ३०.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये वरूड तालुक्यात सर्वाधिक ९२ मि.मी. पाऊस झाला आहे. या तालुक्यातील शेंदूरजना घाट मंडळात ११०.२५ मि.मी., पुसला ११०.२५, वरूड ९६.७५, बेनोडा ७५ व वाठोडा १००.७५ मि.मी. पावसाची नोंद झाली. दोन दिवसांपूर्वी लोणी सर्कलमध्ये व त्यापूर्वी २५ जुलै रोजी वरूड तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. या तालुक्यात सरासरीच्या १५२ टक्के पाऊस झालेला आहे.

संततधार पावसामुळे ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचा येवा वाढल्याने पाचव्यांचा १३ ही दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. विसर्ग यावेळी जास्त असल्याने नदीनाल्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले आहे. याशिवाय १४०० हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

४८० घरांची पडझड

अतिवृष्टीमुळे वरुड तालुक्यात ३४९ घरांची व मोर्शी तालुक्यात ३० घरांची पडझड झालेली आहे. याशिवाय वरुड तालुक्यात ८१ घरे पूर्णत: जमीनदोस्त झाली आहेत. या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेले आहे. नुकसानीचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी पंचनामे करीत असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

वर्धा ओव्हरफ्लो; अमरावती - वर्धा राज्यमार्ग बंद

पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचे सर्वच दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीला पूर आलेला आहे व कौंडण्यपूर येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने अमरावती व वर्धा या राज्य महामार्गावरची वाहतूक खोळंबली आहे. याशिवाय नालेदेखील दुथडी भरून वाहत आहेत.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ऊर्ध्व वर्धा, नागठाणा, पाक नदी धरण, सपण, पूर्णा, निम्न वर्धा आदी प्रकल्पांमध्ये अतिवृष्टीमुळे येवा वाढला आहे. त्यामुळे या प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले व विसर्ग सुरू असल्याने नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

टॅग्स :floodपूर