शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

४०० शेतकऱ्यांची ‘महाबीज’कडून फसवणूक

By admin | Updated: November 22, 2014 00:00 IST

पूर्णानगर परिसरातील ४०० शेतकऱ्यांनी महाबीजचे ३३५ जातींचे वाण पेरले, हे बियाणे उगवलेच नाहीत. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या, पाहणी झाली, अहवालात बियाणे वांझोटे निघाले.

गजानन मोहोड अमरावतीपूर्णानगर परिसरातील ४०० शेतकऱ्यांनी महाबीजचे ३३५ जातींचे वाण पेरले, हे बियाणे उगवलेच नाहीत. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या, पाहणी झाली, अहवालात बियाणे वांझोटे निघाले. मात्र, महाबीजने येथील एकाही शेतकऱ्याला बियाणे किंवा रोख स्वरुपात परतावा दिला नाही. त्यामुळे ‘महाबीज’ने फसवणूक केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. खरीप-२०१४ च्या हंगामात सोयाबीन उगवले नसल्याच्या ४९८ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्यात. तक्रार निवारण पथकाव्दारा या क्षेत्राची पाहणी करण्यात आली. बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यापैकी २७० नमुन्यांमध्ये उगवणशक्तीचा अभाव असल्याचा अहवाल आहे. पूर्णानगर, वातोंडा, येलकी, अंचलवाडी, मिर्झापूर, वाकी, सावलपूर, उमरटेक गावातील शेतकऱ्यांनी पूर्णानगर येथील कृषीसेवा केंद्रामधून महाबीजचे बियाणे खरेदी केले होते. परंतु ते बियाणे वांझोटे निघाले. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्यास त्यासाठी महाबीज जबाबदार असेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दोन हजार एकरामध्ये नुकसानअमरावती : हे बियाणे वांझोटे निघाल्याचे शेतकऱ्यांचा घात झाला. पथक पाहनीला येणार म्हणून कित्येक दिवस शेत पेरणीविना राहिले. कपनीव्दारा बियाणे देण्यात येईल. या आशेवर पाणी फेरल्या गेले. महाबीजसह ईतर कंपन्यांची बियाणे किंवा रोख स्वरुपात देण्यात आलेला नाही. दुपार पेरणीला बियाणे नाही व उशीर झाल्यामुळे या शेतकऱ्यांची किमान २ हजारावर एकर क्षेत्रात खरीप पिकाचे नुकसान झाले. वांझोट्या बियाण्यांची विक्री करणाऱ्या महाबीजसह ईतर कंपन्यावर कारवाई करावी, नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी पूर्णानगर परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.२८ शेतकऱ्यांना परतावा, ५० शेतकऱ्यांना भरपाईखरीप हंगाम २०१४ मध्ये बियाणे उगवन न झालेल्या ४९८ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्यात. या प्रकरणांची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीव्दारा तपासणी करण्यात आली. यामध्ये २८ शेतकऱ्यांना ४६ क्विंटल बियाणे ५० शेतकऱ्यांना ७ लाख ३५ हजारांची मदत देण्यात आली. सर्वाधिक नुकसान झालेल्या पूर्णानगर परिसरातील एकाही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. परवाने रद्द झालेले कृषी केंद्र सुरूचसोयाबीन बियाण्यांची उगवनशक्ती नसलेले बियाणे विकण्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन पूर्णानगर येथील सुमित कृषी केंद्र व यश कृषी सेवा केंद्र यांचे बियाणे विक्रीचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. मात्र हे दोन्ही दुकान सुरू असल्याचा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे. याशिवाय कृषी विभागाशी संपर्क साधला असता, त्या दुकानदारांचे किटकनाशक व खते विक्रीचे परवाने सुरू असल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार याच विक्रेत्यांनी परिवारातील अन्य व्यक्तिंच्या नावे परवान्यासाठी अर्ज दाखल केला आहे. २१ प्रकरणात केसेस दाखलउगवनशक्ती नसलेले बियाण्यांच्या तक्रारी संदर्भात शेतकऱ्यांना अधिकाधिक मोबदला कंपनीकडून मिळावा असा, प्रयत्न कृषी विभाग करतो, असे कृषी विकास अधिकारी वरुन देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)