शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

४०० शेतकऱ्यांची ‘महाबीज’कडून फसवणूक

By admin | Updated: November 22, 2014 00:00 IST

पूर्णानगर परिसरातील ४०० शेतकऱ्यांनी महाबीजचे ३३५ जातींचे वाण पेरले, हे बियाणे उगवलेच नाहीत. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या, पाहणी झाली, अहवालात बियाणे वांझोटे निघाले.

गजानन मोहोड अमरावतीपूर्णानगर परिसरातील ४०० शेतकऱ्यांनी महाबीजचे ३३५ जातींचे वाण पेरले, हे बियाणे उगवलेच नाहीत. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या, पाहणी झाली, अहवालात बियाणे वांझोटे निघाले. मात्र, महाबीजने येथील एकाही शेतकऱ्याला बियाणे किंवा रोख स्वरुपात परतावा दिला नाही. त्यामुळे ‘महाबीज’ने फसवणूक केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. खरीप-२०१४ च्या हंगामात सोयाबीन उगवले नसल्याच्या ४९८ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्यात. तक्रार निवारण पथकाव्दारा या क्षेत्राची पाहणी करण्यात आली. बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यापैकी २७० नमुन्यांमध्ये उगवणशक्तीचा अभाव असल्याचा अहवाल आहे. पूर्णानगर, वातोंडा, येलकी, अंचलवाडी, मिर्झापूर, वाकी, सावलपूर, उमरटेक गावातील शेतकऱ्यांनी पूर्णानगर येथील कृषीसेवा केंद्रामधून महाबीजचे बियाणे खरेदी केले होते. परंतु ते बियाणे वांझोटे निघाले. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्यास त्यासाठी महाबीज जबाबदार असेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दोन हजार एकरामध्ये नुकसानअमरावती : हे बियाणे वांझोटे निघाल्याचे शेतकऱ्यांचा घात झाला. पथक पाहनीला येणार म्हणून कित्येक दिवस शेत पेरणीविना राहिले. कपनीव्दारा बियाणे देण्यात येईल. या आशेवर पाणी फेरल्या गेले. महाबीजसह ईतर कंपन्यांची बियाणे किंवा रोख स्वरुपात देण्यात आलेला नाही. दुपार पेरणीला बियाणे नाही व उशीर झाल्यामुळे या शेतकऱ्यांची किमान २ हजारावर एकर क्षेत्रात खरीप पिकाचे नुकसान झाले. वांझोट्या बियाण्यांची विक्री करणाऱ्या महाबीजसह ईतर कंपन्यावर कारवाई करावी, नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी पूर्णानगर परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.२८ शेतकऱ्यांना परतावा, ५० शेतकऱ्यांना भरपाईखरीप हंगाम २०१४ मध्ये बियाणे उगवन न झालेल्या ४९८ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्यात. या प्रकरणांची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीव्दारा तपासणी करण्यात आली. यामध्ये २८ शेतकऱ्यांना ४६ क्विंटल बियाणे ५० शेतकऱ्यांना ७ लाख ३५ हजारांची मदत देण्यात आली. सर्वाधिक नुकसान झालेल्या पूर्णानगर परिसरातील एकाही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. परवाने रद्द झालेले कृषी केंद्र सुरूचसोयाबीन बियाण्यांची उगवनशक्ती नसलेले बियाणे विकण्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन पूर्णानगर येथील सुमित कृषी केंद्र व यश कृषी सेवा केंद्र यांचे बियाणे विक्रीचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. मात्र हे दोन्ही दुकान सुरू असल्याचा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे. याशिवाय कृषी विभागाशी संपर्क साधला असता, त्या दुकानदारांचे किटकनाशक व खते विक्रीचे परवाने सुरू असल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार याच विक्रेत्यांनी परिवारातील अन्य व्यक्तिंच्या नावे परवान्यासाठी अर्ज दाखल केला आहे. २१ प्रकरणात केसेस दाखलउगवनशक्ती नसलेले बियाण्यांच्या तक्रारी संदर्भात शेतकऱ्यांना अधिकाधिक मोबदला कंपनीकडून मिळावा असा, प्रयत्न कृषी विभाग करतो, असे कृषी विकास अधिकारी वरुन देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)