शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

४०० शेतकऱ्यांची ‘महाबीज’कडून फसवणूक

By admin | Updated: November 22, 2014 00:00 IST

पूर्णानगर परिसरातील ४०० शेतकऱ्यांनी महाबीजचे ३३५ जातींचे वाण पेरले, हे बियाणे उगवलेच नाहीत. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या, पाहणी झाली, अहवालात बियाणे वांझोटे निघाले.

गजानन मोहोड अमरावतीपूर्णानगर परिसरातील ४०० शेतकऱ्यांनी महाबीजचे ३३५ जातींचे वाण पेरले, हे बियाणे उगवलेच नाहीत. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या, पाहणी झाली, अहवालात बियाणे वांझोटे निघाले. मात्र, महाबीजने येथील एकाही शेतकऱ्याला बियाणे किंवा रोख स्वरुपात परतावा दिला नाही. त्यामुळे ‘महाबीज’ने फसवणूक केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. खरीप-२०१४ च्या हंगामात सोयाबीन उगवले नसल्याच्या ४९८ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्यात. तक्रार निवारण पथकाव्दारा या क्षेत्राची पाहणी करण्यात आली. बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यापैकी २७० नमुन्यांमध्ये उगवणशक्तीचा अभाव असल्याचा अहवाल आहे. पूर्णानगर, वातोंडा, येलकी, अंचलवाडी, मिर्झापूर, वाकी, सावलपूर, उमरटेक गावातील शेतकऱ्यांनी पूर्णानगर येथील कृषीसेवा केंद्रामधून महाबीजचे बियाणे खरेदी केले होते. परंतु ते बियाणे वांझोटे निघाले. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्यास त्यासाठी महाबीज जबाबदार असेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दोन हजार एकरामध्ये नुकसानअमरावती : हे बियाणे वांझोटे निघाल्याचे शेतकऱ्यांचा घात झाला. पथक पाहनीला येणार म्हणून कित्येक दिवस शेत पेरणीविना राहिले. कपनीव्दारा बियाणे देण्यात येईल. या आशेवर पाणी फेरल्या गेले. महाबीजसह ईतर कंपन्यांची बियाणे किंवा रोख स्वरुपात देण्यात आलेला नाही. दुपार पेरणीला बियाणे नाही व उशीर झाल्यामुळे या शेतकऱ्यांची किमान २ हजारावर एकर क्षेत्रात खरीप पिकाचे नुकसान झाले. वांझोट्या बियाण्यांची विक्री करणाऱ्या महाबीजसह ईतर कंपन्यावर कारवाई करावी, नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी पूर्णानगर परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.२८ शेतकऱ्यांना परतावा, ५० शेतकऱ्यांना भरपाईखरीप हंगाम २०१४ मध्ये बियाणे उगवन न झालेल्या ४९८ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्यात. या प्रकरणांची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीव्दारा तपासणी करण्यात आली. यामध्ये २८ शेतकऱ्यांना ४६ क्विंटल बियाणे ५० शेतकऱ्यांना ७ लाख ३५ हजारांची मदत देण्यात आली. सर्वाधिक नुकसान झालेल्या पूर्णानगर परिसरातील एकाही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. परवाने रद्द झालेले कृषी केंद्र सुरूचसोयाबीन बियाण्यांची उगवनशक्ती नसलेले बियाणे विकण्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन पूर्णानगर येथील सुमित कृषी केंद्र व यश कृषी सेवा केंद्र यांचे बियाणे विक्रीचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. मात्र हे दोन्ही दुकान सुरू असल्याचा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे. याशिवाय कृषी विभागाशी संपर्क साधला असता, त्या दुकानदारांचे किटकनाशक व खते विक्रीचे परवाने सुरू असल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार याच विक्रेत्यांनी परिवारातील अन्य व्यक्तिंच्या नावे परवान्यासाठी अर्ज दाखल केला आहे. २१ प्रकरणात केसेस दाखलउगवनशक्ती नसलेले बियाण्यांच्या तक्रारी संदर्भात शेतकऱ्यांना अधिकाधिक मोबदला कंपनीकडून मिळावा असा, प्रयत्न कृषी विभाग करतो, असे कृषी विकास अधिकारी वरुन देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)