शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार भक्तांनी घेतले अमरावती जिल्ह्यातल्या बहिरमबुवाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 14:17 IST

चांदूरबाजार तालुक्यातील सुप्रसिद्ध बहिरम यात्रा सुरू होऊन एक आठवड्याचा कालावधी झाला आहे. यात्रा सुरू होताच भाविकांची अलोट गर्दी होत आहे. आठवड्यात सलग तीन दिवस सुट्या आल्याने नागरिकांनी यात्रेत प्रचंड गर्दी केली होती. रविवारी ४० हजार भाविकांनी बहिरमबुवांचे दर्शन घेतले.

ठळक मुद्देठिकठिकाणी पडल्या राहुट्यायात्रेला चढू लागला रंग

आॅनलाईन लोकमतअमरावती : चांदूरबाजार तालुक्यातील सुप्रसिद्ध बहिरम यात्रा सुरू होऊन एक आठवड्याचा कालावधी झाला आहे. यात्रा सुरू होताच भाविकांची अलोट गर्दी होत आहे. आठवड्यात सलग तीन दिवस सुट्या आल्याने नागरिकांनी यात्रेत प्रचंड गर्दी केली होती. रविवारी ४० हजार भाविकांनी बहिरमबुवांचे दर्शन घेतले.महिनाभर चालणारी ही विदर्भातील सर्वात मोठी यात्रा आहे. विदर्भासह महाराष्ट्रातील कुलदैवत असणारे भाविकही या यात्रेत आवर्जून हजेरी लावतात. मध्यंतरीचा काही काळ सोडल्यास अलिकडे बहिरम यात्रेतील गर्दी ओसंडून वाहू लागल्याचे चित्र आहे. पूर्वी तमाशा या यात्रेचे महत्त्वाचे आकर्षण होते. परंतु स्थानिक जनप्रतिनिधींच्या पुढाकाराने तमाशेबंद होऊन यात्रेत समाजप्रबोधनपर कार्यक्रमाला सुरूवात झाली. आता मात्र यात्रेला वेगळाच रंग चढला आहे. यात्रेत शेतकऱ्यांसाठी शेतीउपयोगी साहित्य विकण्यासाठी ठेवण्यात आले आहेत.सगळीकडे उभारलेल्या राहुट्या, निसर्गरम्य वातावरण व त्यातच रोडगे व मटणाच्या हंडीची पंगत हे बहिरम यात्रेचे मुख्य आकर्षण आहे. सलग तीन दिवस असलेल्या सुट्यांमुळे शाळकरी विद्यार्थी, नोकरदारवर्ग, शहरी भागांत राहणारी मंडळी आपल्या परिवारासह बहिरम यात्रेत आनंद लुटताना दिसत होते. २० डिसेंबरपासून सुरू झालेली ही यात्रा जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत चालते. मंदिराचे अध्यक्ष सुरेंद्र चौधरी यांनी मंदिराची महाआरती करून यात्रेला सुरूवात केली. गुलाबी थंडीत पर्वत रांगांच्या कुशीत वसलेल्या बहिरमबुवाच्या दर्शनासाठी भाविकांची दरवर्षी अलोट गर्दी उसळते.तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी या यात्रेला शासकीय रुप आणले होते. मात्र, सत्तापालट होताच त्याचे पडसाद या यात्रेवर उमटले. मात्र, तरीही भाविकांची श्रद्धा कमी न होता दरवर्षी उपस्थितांचा उच्चांक यात्रा गाठतच आहे. आमदार बच्चू कडू यांच्यातर्फे शासन आपल्या दारी सारख्या लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे या यात्रेत महिनाभर यात्रेकरूंना आनंदाची पर्वणीच लाभते.शामियानांनी झाकले बहिरमबहिरम यात्रेच्या वेळी कडाक्याची थंडी पडत असल्याने या यात्रेत चारही बाजूंनी झाकलेल्या राहुट्या उभारण्यात येतात. त्यामुळे थंडीचा परिणाम जाणवत नाही. तसेच या राहुटीत गालीचे, गादी तसेच सुबक अशी वऱ्हाडी बैठक तयार केल्या जातात. या राहुटीच्या बाहेर उघड्यावर शेकोटीची व्यवस्थादेखील केलेली असते. त्यामुळे येथे राहुटीत रात्र काढण्याची मजा काही औरच असते.

टॅग्स :cultureसांस्कृतिक