शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

३७४ गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:10 IST

गतवर्षी सरासरीपेक्षा ३३ टक्के पाऊस कमी झाल्याचा परिणाम आता जाणवायला लागला आहे. सद्यस्थितीत ३७४ गावांना कोरड लागली आहे.

ठळक मुद्देअपुऱ्या पावसाचा परिणाम : ३८६ उपाययोजना, १३.६० कोटींची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी सरासरीपेक्षा ३३ टक्के पाऊस कमी झाल्याचा परिणाम आता जाणवायला लागला आहे. सद्यस्थितीत ३७४ गावांना कोरड लागली आहे. यासाठी शासनाने ३८६ उपाययोजनांना प्रशासनाला मंजुरी दिलेली आहे. यावर १३ कोटी ६० लाखांच्या निधीची आवश्यकता आहे.जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ तीन टप्प्यातील कृती आराखड्यात १,४२८ गावांसाठी १,७४५ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आलेल्या होत्या. यासाठी १७ कोटी ९९ लाख ९६ हजारांच्या निधीची आवश्कता आहे. उन्हाळ्याच्या भीषणतेच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाने ३७४ गावांतील उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. यामध्ये पाणीटंचाई निवारणार्थ नवीन ७० विंधन विहिरी व ४१ कुपनलिका अशा एकूण ११ कामांना मंजुरात देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारा नवीन ४५ विंधन विहिरी व १९ कुपनलिका अशी एकूण ६४ कामे पूर्ण केलेली आहेत, तर ४७ कामे प्रगतीपथावर आहेत.जिल्हा परिषदेअंतर्गत १०१ नळ योजनांच्या विशेष दुरूस्ती व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील ७७ अशा एकूण १७८ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. जिल्हा परिषदेच्या ३२ नळ योजनांतर्गत विशेष दुरूस्तीच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. उर्वरित कामे निविदा प्रक्रियेत असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सांगितले.तात्पुरत्या पूरक नळ योजनेच्या ४८ कामांना प्रशासकीय मंजुरी प्राप्त झालेली आहे. ९ योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहे व उर्वरित कामे निविदा प्रक्रियेत आहे. सद्यस्थितीत ४३ गावांमध्ये ४९ खासगी विहीरींचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा होत नसला तरी सोमवारपासून चिखलदरा तालुक्यात पस्तलाई व भांद्री या गावांसाठी दोन टँकर सुरू करण्याचे आदेशित आहे.या उपाय योजनांना मंजुरी

सद्यस्थितीत ३७४ गावातील २८६ उपाययोजनांना मंजुरात देण्यात आली . यामध्ये १०५ गावात १११ विंधन विहीरी व कुपनलिका करण्यात येणार आहे . यावर १.०९ कोटी, १७८ गावात १७८ नळ योजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येईल यासाठी ९.८० कोटी, ४८ गावात ४८ तात्पुरत्या पुरक नळ योजना यावर २.४१ कोटी, ४३ गावात ४९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करणायत आले यावर ३० लाख, असे १३.६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.१३९ गावात १५१ उपाययोजना सुरूसद्यस्थितीत १३९ गावात १५९ उपाययोजना सुरू आहेत. यावर ३.१९ कोटींचा खर्च होणार आहे. यामध्ये ४१ गावार ४७ विंधन विहीरी, कुपनलिकांची कामे सुरू आहेत, यासाठी ५१ लाख, ३२ गावात ३२ नळ योजनांची विशेष दुरूस्ती सुरू आहे,यासाठी १.२३ कोटी, २३ गावात तात्पुरत्या पुरक नळ योजनांची कामे सुरू आहेत, यासाठी १.१५ कोटी, ४३ गावात ४९ खासगी विहीरींचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. यासाठी ३० लाखांच्या निधीची आवश्यकता आहे.