शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

३७४ गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:10 IST

गतवर्षी सरासरीपेक्षा ३३ टक्के पाऊस कमी झाल्याचा परिणाम आता जाणवायला लागला आहे. सद्यस्थितीत ३७४ गावांना कोरड लागली आहे.

ठळक मुद्देअपुऱ्या पावसाचा परिणाम : ३८६ उपाययोजना, १३.६० कोटींची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी सरासरीपेक्षा ३३ टक्के पाऊस कमी झाल्याचा परिणाम आता जाणवायला लागला आहे. सद्यस्थितीत ३७४ गावांना कोरड लागली आहे. यासाठी शासनाने ३८६ उपाययोजनांना प्रशासनाला मंजुरी दिलेली आहे. यावर १३ कोटी ६० लाखांच्या निधीची आवश्यकता आहे.जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ तीन टप्प्यातील कृती आराखड्यात १,४२८ गावांसाठी १,७४५ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आलेल्या होत्या. यासाठी १७ कोटी ९९ लाख ९६ हजारांच्या निधीची आवश्कता आहे. उन्हाळ्याच्या भीषणतेच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाने ३७४ गावांतील उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. यामध्ये पाणीटंचाई निवारणार्थ नवीन ७० विंधन विहिरी व ४१ कुपनलिका अशा एकूण ११ कामांना मंजुरात देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारा नवीन ४५ विंधन विहिरी व १९ कुपनलिका अशी एकूण ६४ कामे पूर्ण केलेली आहेत, तर ४७ कामे प्रगतीपथावर आहेत.जिल्हा परिषदेअंतर्गत १०१ नळ योजनांच्या विशेष दुरूस्ती व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील ७७ अशा एकूण १७८ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. जिल्हा परिषदेच्या ३२ नळ योजनांतर्गत विशेष दुरूस्तीच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. उर्वरित कामे निविदा प्रक्रियेत असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सांगितले.तात्पुरत्या पूरक नळ योजनेच्या ४८ कामांना प्रशासकीय मंजुरी प्राप्त झालेली आहे. ९ योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहे व उर्वरित कामे निविदा प्रक्रियेत आहे. सद्यस्थितीत ४३ गावांमध्ये ४९ खासगी विहीरींचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा होत नसला तरी सोमवारपासून चिखलदरा तालुक्यात पस्तलाई व भांद्री या गावांसाठी दोन टँकर सुरू करण्याचे आदेशित आहे.या उपाय योजनांना मंजुरी

सद्यस्थितीत ३७४ गावातील २८६ उपाययोजनांना मंजुरात देण्यात आली . यामध्ये १०५ गावात १११ विंधन विहीरी व कुपनलिका करण्यात येणार आहे . यावर १.०९ कोटी, १७८ गावात १७८ नळ योजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येईल यासाठी ९.८० कोटी, ४८ गावात ४८ तात्पुरत्या पुरक नळ योजना यावर २.४१ कोटी, ४३ गावात ४९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करणायत आले यावर ३० लाख, असे १३.६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.१३९ गावात १५१ उपाययोजना सुरूसद्यस्थितीत १३९ गावात १५९ उपाययोजना सुरू आहेत. यावर ३.१९ कोटींचा खर्च होणार आहे. यामध्ये ४१ गावार ४७ विंधन विहीरी, कुपनलिकांची कामे सुरू आहेत, यासाठी ५१ लाख, ३२ गावात ३२ नळ योजनांची विशेष दुरूस्ती सुरू आहे,यासाठी १.२३ कोटी, २३ गावात तात्पुरत्या पुरक नळ योजनांची कामे सुरू आहेत, यासाठी १.१५ कोटी, ४३ गावात ४९ खासगी विहीरींचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. यासाठी ३० लाखांच्या निधीची आवश्यकता आहे.